शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सर्वांत मोठ्या दोन तोफा भारतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:47 IST

बहामनी साम्राज्यात म्हणजे इ. स. १३२७ ते १४२४ या काळात ती तयार करण्यात आली, असं सांगण्यात येतं. ती बारा गाझी तोफ नावानं ओळखली जाते.

बहामनी साम्राज्यात म्हणजे इ. स. १३२७ ते १४२४ या काळात ती तयार करण्यात आली, असं सांगण्यात येतं. ती बारा गाझी तोफ नावानं ओळखली जाते. रशियातील झारची तोफ आतापर्यंत जगातील सर्वांत मोठी तोफ म्हणून ओळखली जात असे. पण पुरातत्त्व खात्याच्या म्हणण्यानुसार बारा गाझी तोफ त्याहून मोठी आहे. आपल्याला अनेकदा जगातील अनेक आश्चर्यांची माहिती असते. पण आपल्या शेजारी-पाजारी असलेल्या असंख्य महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसतात. याचं कारण म्हणजे त्या बाबींना हवी तशी प्रसिद्धीच मिळालेली नसते. उदाहरणेच द्यायची तर आशियातील सर्वात मोठी तोफ जशी भारतात आहे, तसंच जगातील सर्वात मोठी तोफही भारतात आहे. या दाने्ही तोफा ज्या राज्यांत आहेत, तिथं आपण कदाचित गेलेलो असू. पण त्या पाहिल्या नसतील. आशियातील सर्वात मोठी तोफ आहे राजस्थानात. जयपूरच्या जयगड किल्ल्यावर ती आहे. गंमत म्हणजे ती तयार करण्यासाठी तिथे आधी कारखाना बांधण्यात आला. ती त्या कारखान्यात तयार केली गेली. आतापर्यंत तिचा केवळ एकदाच वापर झाला आहे. तोही प्रयोगासाठी. या तोफेतून उडवलेला तोफगोळा ३५ किलोमीटर अंतरावर जाऊ न पडला. त्या आवाजानं आसपासच्या गावांत घबराट पसरली. इतकंच नव्हे, तर जिथं तो तोफगोळा पडला, तिथं इतका खोल खड्डा पडला की, तिथं चक्क पाणीच लागलं. हिचा वापर करण्यासाठी एका वेळी १00 किलो गन पावडर लागेल, असं सांगण्यात येतं. केत्यानंतर एकाही युद्धात तिचा वापर करण्यात आला नाही. ही तोफ १७२0 साली बनवण्यात आली होती. जयगड किल्ल्यावर बसवण्यात आलेल्या या तोफेला जयबाण हे नाव देण्यात आलं आहे. या तोफेचं वजन सुमारे ५0 टन आहे. जयबाण ही जगातील दहाव्या क्रमांकाची मोठी तोफ आहे. जगातील सर्वात मोठी तोफ आहे आपल्या शेजारी असलेल्या कर्नाटकातील गुलबर्ग्याच्या किल्ल्यावर. तिचा आता वापर करणं अशक्य आहे. ती आजही चांगल्या अवस्थेत असली तरी तिचा आता वापर करता येणं अशक्य आहे.