शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या तोंडी पाकिस्तानची भाषा, पंतप्रधान मोदी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 06:00 IST

काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याविषयी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी केलेले विधान हे काँग्रेस पक्ष काश्मिरी फुटीरवाद्यांची आणि पाकिस्तानची भाषा बोलू लागल्याचे व त्यांची जनतेच्या

बंगळुरु: काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याविषयी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी केलेले विधान हे काँग्रेस पक्ष काश्मिरी फुटीरवाद्यांची आणि पाकिस्तानची भाषा बोलू लागल्याचे व त्यांची जनतेच्या आशा-आकांक्षांशी फारकत झाल्याचे द्योतक आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केली.कर्नाटक दौ-यात बंगळुरू येथे भाजपा कार्यकर्त्यांपुढे केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, कालपर्यंत सत्तेवर असलेले अचानक पलटी खाऊन निर्लज्जपणे काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याची मागणी करू लागले आहेत. काश्मीरसाठी प्राणाहुती देणाºयांच्या हौतात्म्याचे राजकारण करणाºयांकडून देशाच्या विकासाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. काँग्रेसला याचा जाब द्यावा लागेल.देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे ठामपणे सांगत पंतप्रधान म्हणाले की, हा देश सरदार वल्लभभाई पटेलांचा आहे. सरदार पटेलांनी देशाची सुरक्षा आणि एकात्मता यासाठी अनेक निर्णय खंबीरपणे घेतले. काश्मीरसाठी हजारो युवकांनी प्राणांची आहुती दिली आहे. काश्मीरसाठी हौतात्म्य दिले नाही, असे देशात एकही राज्य नाही.मोदी म्हणाले की, सर्जिकल स्ट्राइक हा संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण होता; पण काँग्रेसच्या ते पचनी पडले नाही. सर्जिकल स्ट्राइकने काँग्रेसला पोटशूळ का उठला हे आता त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. (वृत्तंसस्था)जनतेपासून त्यांची नाळ तुटलीदेशाच्या जनतेच्या आशा-आकांक्षांपासून काँग्रेसची नाळ तुटली आहे, असा दावा करत मोदी म्हणाले की, आपल्या शूर सैनिकांचा त्याग, भारताची प्रभावी राजनैतिक मुत्सद्देगिरी व भारताचे धाडस यामुळे डोकलामचा तिढा सुटला. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी भारत ठामपणे उभा राहतो हे त्यावरून दिसले. याबद्दल जग भारताकडे कौतुकाने पाहत असताना काँग्रेसवाले मात्र डोकलामवरून अपप्रचारकरीत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी