शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाषा ‘मेक इन इंडिया’ची; लघुउद्योजकांवर मात्र अन्याय,  दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ओढले ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 04:17 IST

यासंदभार्तील एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार व एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाला (एएआय) नोटीसा जारी केल्या आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकार एका बाजूला मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारताची भाषा करते, तर दुसऱ्या बाजूला प्रादेशिक विमानतळांच्या देखभालीसाठी निविदा मागविताना त्या प्रक्रियेत लघुउद्योजक सहभागी होऊ शकणार नाही अशीही व्यवस्था करते. हे विसंगत चित्र पाहून मनाला वेदना होतात, असे ताशेरे दिल्ली उच्च न्यायालयाने ओढले आहेत.यासंदभार्तील एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानेकेंद्र सरकार व एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाला (एएआय) नोटीसा जारी केल्या आहेत.विविध प्रादेशिक विमानतळांच्या देखभालीसाठी निविदा भरणाऱ्यांच्या पात्रतेबाबत असलेल्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले. त्यातून स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याबाबत केंद्र सरकार उत्सुक नसल्याचेच दिसून येते असे ताशेरे दिल्ली उच्च न्यायालयाने ओढले आहेत.दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. विपीन संघी, न्या. रजनीश भटनागर यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, एखाद्या गोष्टीत लघुउद्योजकांना सामावून घ्यायचे नसेल तर तसे स्पष्ट सांगा. मात्र त्याऐवजी ढोंगी भाषणे केली जातात. केंद्रातील राजकीय नेते मेक इन इंडियाची भाषा करतात, आत्मनिर्भर भारताबद्दल बोलतात, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणार असल्याचे सांगतात. पण त्यांची कृती ही उक्तीपेक्षा वेगळी असते. केंद्र सरकार अतिशय ढोंगीपणे वागते आहे.केंद्र व एएआयच्या वतीने बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी केंद्रातील राजकीय नेत्यांशी काही गोष्टींबाबत बोलावे असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.भाषणे झोडणाºयांना फटकारलेजर लघुउद्योजकांना प्राधान्य देण्याची इच्छा नसेल तर दुसºया बाजूला केंद्रातील नेते मेक इन इंडियावर भाषणे का झोडतात, असा सवाल न्यायालयाने केला. विमानतळांच्या देखभालीच्या कामातून लघुउद्योजकांना बाहेर फेकण्यात आले आहे हे तरी या नेत्यांना माहिती आहे का अशीही विचारणा दिल्ली उच्च न्यायालयाने केली. अमुकतमुक देशातून गोष्टी आयात करू नका, अशी आवाहने केली जात असतानाच आपल्याच देशातील उद्योजकांना डावलले जात आहे, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले.

टॅग्स :businessव्यवसायCentral Governmentकेंद्र सरकारHigh Courtउच्च न्यायालय