शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

लालूप्रसाद यादव यांना रात्री २ वाजता भूतं नेत होती स्मशानात, असे वाचले प्राण, नेमका काय प्रकार?   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 14:31 IST

Lalu Prasad Yadav: लालूप्रसाद यादव यांच्या बालपणातील एका घटनेची सध्या चर्चा होत आहे. या घटनेचा उल्लेख लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या ‘गोपालगंज से रायसीना: मेरी राजनीतिक यात्रा’ या आत्मचरित्रामध्ये केला आहे. 

बिहारमधील राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर गेल्या आठवड्यात लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची पुन्हा एकदा विरोधी पक्षात रवानगी झाली. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू झालेल्या चौकशांमुळे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या सगळ्या घडामोडींदरम्यान, लालूप्रसाद यादव यांच्या बालपणातील एका घटनेची सध्या चर्चा होत आहे. या घटनेचा उल्लेख लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या ‘गोपालगंज से रायसीना: मेरी राजनीतिक यात्रा’ या आत्मचरित्रामध्ये केला आहे. 

या आत्मचरित्रातील उल्लेखानुसार लालूप्रसाद यादव यांनी बालपणी भुतांचा सामना केला होता. एका काळोख्या रात्री लालू प्रसाद यादव यांना दोन भुतं स्मशानाच्या दिशेने नेत होती. तेवढ्यात गावातील बरम बाबांनी त्यांचे प्राण वाचवले होते. लालू प्रसाद यादव सांगतात की, एकदा माझी गाठ भुतांशी पडली होती. माझ्या घराच्या मागे पिंपळाच्या झाडाखाली बरम बाबांचं ठिकाण होतं. एकदा पौर्णिमेच्या रात्री तिथे भोजन आणि गायनाचा कार्यक्रम झाला.  तिथे बसल्या जागीच मला झोपा आली. बाकीचे लोक कार्यक्रम संपल्यानंतर घरी गेले.  माझे डोळे उघडले. तेव्हा तिथे दोन मुलगे उभे होते. त्यांनी मला सोबत येण्यास सांगितलं. झोपेत असल्याने मीही त्यांच्या मागे चालू लागलो. त्यांनी मला स्माशानाच्या दिशेने नेले. 

लालू यांनी पुढे लिहिले की, तेवढ्यात मी लघुशंकेसाठी थांबलो असताना तिथून गावातील तपेसर बाबा जाताना दिसले. त्यांनी विचारलं कोण आहे? मी उत्तर देत म्हणालो की, ललुआ. त्यानंतर त्यांनी मला कुठे जात आहे, असं विचारलं तसेच घरी जाण्यास सांगितलं. तेवढ्यात तिथे असलेले ते दोन मुलगे पळून गेले. दुसऱ्या दिवशी मी त्या दोन्ही मुलांकडे गेलो तेव्हा त्यांनी काल रात्री आपण तिथे गेलो नसल्याचे सांगितले. तर तपेसर बाबांनीही आपण रात्री त्या वाटेने गेलो नव्हतो, असं सांगितलं. 

लालू प्रसाद यादव पुढे लिहितात की, जेव्हा मी या घटनेबाबत आईला विचारलं तेव्हा ती म्हणाली की, तुझ्या मित्रांचं सोंग घेऊन जे दोन जण आले होते. ती भुतं होती. तसेच बरम बाब यांनी तुला तपेसर बाबाचं रूप घेऊन वाचवलं. नाहीतर त्यांनी तुला स्मशानात नेऊन मारलं असतं. आईने मला बरम बाबांची प्रार्थना करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून मी जेव्हा गावात जातो तेव्हा बरम बाबांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही, असेही लालू प्रसाद यादव यांनी सांगितले.  लालू प्रसाद यादव यांच्या त्यांच्या ‘गोपालगंज से रायसीना: मेरी राजनीतिक यात्रा’ या आत्मचरित्राचं लेखन हे नलिन वर्मा यांनी केलं आहे.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार