शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

लालूप्रसाद यादव यांना रात्री २ वाजता भूतं नेत होती स्मशानात, असे वाचले प्राण, नेमका काय प्रकार?   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 14:31 IST

Lalu Prasad Yadav: लालूप्रसाद यादव यांच्या बालपणातील एका घटनेची सध्या चर्चा होत आहे. या घटनेचा उल्लेख लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या ‘गोपालगंज से रायसीना: मेरी राजनीतिक यात्रा’ या आत्मचरित्रामध्ये केला आहे. 

बिहारमधील राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर गेल्या आठवड्यात लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची पुन्हा एकदा विरोधी पक्षात रवानगी झाली. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू झालेल्या चौकशांमुळे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या सगळ्या घडामोडींदरम्यान, लालूप्रसाद यादव यांच्या बालपणातील एका घटनेची सध्या चर्चा होत आहे. या घटनेचा उल्लेख लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या ‘गोपालगंज से रायसीना: मेरी राजनीतिक यात्रा’ या आत्मचरित्रामध्ये केला आहे. 

या आत्मचरित्रातील उल्लेखानुसार लालूप्रसाद यादव यांनी बालपणी भुतांचा सामना केला होता. एका काळोख्या रात्री लालू प्रसाद यादव यांना दोन भुतं स्मशानाच्या दिशेने नेत होती. तेवढ्यात गावातील बरम बाबांनी त्यांचे प्राण वाचवले होते. लालू प्रसाद यादव सांगतात की, एकदा माझी गाठ भुतांशी पडली होती. माझ्या घराच्या मागे पिंपळाच्या झाडाखाली बरम बाबांचं ठिकाण होतं. एकदा पौर्णिमेच्या रात्री तिथे भोजन आणि गायनाचा कार्यक्रम झाला.  तिथे बसल्या जागीच मला झोपा आली. बाकीचे लोक कार्यक्रम संपल्यानंतर घरी गेले.  माझे डोळे उघडले. तेव्हा तिथे दोन मुलगे उभे होते. त्यांनी मला सोबत येण्यास सांगितलं. झोपेत असल्याने मीही त्यांच्या मागे चालू लागलो. त्यांनी मला स्माशानाच्या दिशेने नेले. 

लालू यांनी पुढे लिहिले की, तेवढ्यात मी लघुशंकेसाठी थांबलो असताना तिथून गावातील तपेसर बाबा जाताना दिसले. त्यांनी विचारलं कोण आहे? मी उत्तर देत म्हणालो की, ललुआ. त्यानंतर त्यांनी मला कुठे जात आहे, असं विचारलं तसेच घरी जाण्यास सांगितलं. तेवढ्यात तिथे असलेले ते दोन मुलगे पळून गेले. दुसऱ्या दिवशी मी त्या दोन्ही मुलांकडे गेलो तेव्हा त्यांनी काल रात्री आपण तिथे गेलो नसल्याचे सांगितले. तर तपेसर बाबांनीही आपण रात्री त्या वाटेने गेलो नव्हतो, असं सांगितलं. 

लालू प्रसाद यादव पुढे लिहितात की, जेव्हा मी या घटनेबाबत आईला विचारलं तेव्हा ती म्हणाली की, तुझ्या मित्रांचं सोंग घेऊन जे दोन जण आले होते. ती भुतं होती. तसेच बरम बाब यांनी तुला तपेसर बाबाचं रूप घेऊन वाचवलं. नाहीतर त्यांनी तुला स्मशानात नेऊन मारलं असतं. आईने मला बरम बाबांची प्रार्थना करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून मी जेव्हा गावात जातो तेव्हा बरम बाबांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही, असेही लालू प्रसाद यादव यांनी सांगितले.  लालू प्रसाद यादव यांच्या त्यांच्या ‘गोपालगंज से रायसीना: मेरी राजनीतिक यात्रा’ या आत्मचरित्राचं लेखन हे नलिन वर्मा यांनी केलं आहे.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार