शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'हनिमून पॉलिटिक्स'च्या वक्तव्यावरून तेजप्रताप यादव यांचा संताप; पाहा कोणाला म्हणाले बिंग फोडेन?

By जयदीप दाभोळकर | Updated: January 9, 2021 14:38 IST

जेव्हा देशात, बिहारमध्ये कोणतं संकट येतं तेव्हा राहुल गांधी, तेजस्वी यादव, चिराग पासवान हे हनिमूनसाठी बाहेर निघून जातात असं मांझी यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

ठळक मुद्देमांझी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केलं होतं वादग्रस्त वक्तव्य हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांचाही तेजप्रताप यांच्यावर पलटवार

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी तेजस्वी यादव यांच्याविरोधात हनिमून वालं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता राजकारणानं जोर धरला आहे. तेजस्वी यादव यांचे ज्येष्ठ बंधू तेजप्रताप यादव यांनी जीतनराम मांझी यांना आपली उतारवयात काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसंच यावेळी त्यांनी मांझी यांना बिंग फोडण्याचीही धमकी दिली. "मांझी हे आमच्या शेजारी असलेल्या बंगल्यातच राहतात. त्यांच्या खोलीत काय काय होतं हे सर्व माहित आहे," असं देखील ते म्हणाले.लालू प्रसाद यादव यांचे कनिष्ठ पुत्र तेजस्वी यादव यांना हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतनराम मांझी यांच्या हनिमून वाल्या वक्तव्याबाबत  प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तेजस्वी यादव यांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. परंतु त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि तेजप्रताप यादव यांनी मांझी यांच्या वक्तव्यावर पलटवार केला. तसंच मांझी यांनी आपल्या उतारवयाची काळजी करावी आणि वेळीच स्वत:ला सांभाळावं, असं ते म्हणाले. तेजप्रताप यादव यांच्या वक्तव्यावर हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनीही पलटवार केला. "तेजप्रताप यादव यांनी आपल्या कोणत्या अयोग्य सवयींमुळे त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांना घराबाहेर काढलं हे त्यांनी सांगावं. दिल्लीच्या फार्म हाऊसमध्ये कोणत्या कारणामुळे तेजप्रताप आणि तेजस्वी यादव यांना मारण्यात आलं होतं हे सांगावं," असं ते म्हणाले. तसंच तेजप्रताप यादव यांनी आपल्या मर्यादेत राहावं, असा इशारा देत जर आम्ही त्यांचं बिंग फोडलं तर लालू प्रसाद यादव यांची मुलं रस्त्यावर येतील असंही म्हटलं. नुकतंच जीतनराम मांझी यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी, आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि एलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्याबाबत हनिमूनवालं वक्तव्य केलं होतं. "जेव्हा देशात किंवा बिहारमध्ये काही संकट येतं तेव्हा हे तिन्ही नेते हनिमूनसाठी निघून जातात," असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान केलं होतं.  

टॅग्स :BiharबिहारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTej Pratap Yadavतेज प्रताप यादवRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस