शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

'हनिमून पॉलिटिक्स'च्या वक्तव्यावरून तेजप्रताप यादव यांचा संताप; पाहा कोणाला म्हणाले बिंग फोडेन?

By जयदीप दाभोळकर | Updated: January 9, 2021 14:38 IST

जेव्हा देशात, बिहारमध्ये कोणतं संकट येतं तेव्हा राहुल गांधी, तेजस्वी यादव, चिराग पासवान हे हनिमूनसाठी बाहेर निघून जातात असं मांझी यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

ठळक मुद्देमांझी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केलं होतं वादग्रस्त वक्तव्य हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांचाही तेजप्रताप यांच्यावर पलटवार

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी तेजस्वी यादव यांच्याविरोधात हनिमून वालं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता राजकारणानं जोर धरला आहे. तेजस्वी यादव यांचे ज्येष्ठ बंधू तेजप्रताप यादव यांनी जीतनराम मांझी यांना आपली उतारवयात काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसंच यावेळी त्यांनी मांझी यांना बिंग फोडण्याचीही धमकी दिली. "मांझी हे आमच्या शेजारी असलेल्या बंगल्यातच राहतात. त्यांच्या खोलीत काय काय होतं हे सर्व माहित आहे," असं देखील ते म्हणाले.लालू प्रसाद यादव यांचे कनिष्ठ पुत्र तेजस्वी यादव यांना हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतनराम मांझी यांच्या हनिमून वाल्या वक्तव्याबाबत  प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तेजस्वी यादव यांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. परंतु त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि तेजप्रताप यादव यांनी मांझी यांच्या वक्तव्यावर पलटवार केला. तसंच मांझी यांनी आपल्या उतारवयाची काळजी करावी आणि वेळीच स्वत:ला सांभाळावं, असं ते म्हणाले. तेजप्रताप यादव यांच्या वक्तव्यावर हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनीही पलटवार केला. "तेजप्रताप यादव यांनी आपल्या कोणत्या अयोग्य सवयींमुळे त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांना घराबाहेर काढलं हे त्यांनी सांगावं. दिल्लीच्या फार्म हाऊसमध्ये कोणत्या कारणामुळे तेजप्रताप आणि तेजस्वी यादव यांना मारण्यात आलं होतं हे सांगावं," असं ते म्हणाले. तसंच तेजप्रताप यादव यांनी आपल्या मर्यादेत राहावं, असा इशारा देत जर आम्ही त्यांचं बिंग फोडलं तर लालू प्रसाद यादव यांची मुलं रस्त्यावर येतील असंही म्हटलं. नुकतंच जीतनराम मांझी यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी, आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि एलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्याबाबत हनिमूनवालं वक्तव्य केलं होतं. "जेव्हा देशात किंवा बिहारमध्ये काही संकट येतं तेव्हा हे तिन्ही नेते हनिमूनसाठी निघून जातात," असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान केलं होतं.  

टॅग्स :BiharबिहारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTej Pratap Yadavतेज प्रताप यादवRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस