शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

लालू-नितीश कुमारांचे गुरू, साधेपणासाठी होते प्रसिद्ध, कोण होते कर्पुरी ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 22:58 IST

Karpuri Thakur: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बिहार महत्त्वाचं ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकारणात आदराचं स्थान असलेल्या कर्पुरी ठाकूर यांना केंद्र सरकारकडून भारतरत्न सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बिहार महत्त्वाचं ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकारणात आदराचं स्थान असलेल्या कर्पुरी ठाकूर यांना केंद्र सरकारकडून भारतरत्न सन्मान जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने केलेली ही घोषणा बिहारच्या राजकारणात मारलेला मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. तसेच आता कर्पुरी ठाकूर यांची आठवण राजकारणात पुन्हा एकदा ताजी झाली आहे.

कर्पुरी ठाकूर यांना बिहारचे जननायक असे म्हणतात. त्यांनी बिहारचं दोन वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. २४ जानेवारी १९२४ रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील पितौरिया गावात कर्पुरी ठाकूर यांचा जन्म झाला होता.  आता या गावाला कर्पुरीग्राम म्हणून ओळखलं जातं. कर्पुरी ठाकूर यांच्या साधेपणाची उदाहरणं आजही दिली जातात.

कर्पुरी ठाकूर यांनी २२ डिसेंबर १९७० ते २ जून १९७१ आणि २४ जून १९७७ ते २१ एप्रिल १९७९ यांनी बिहारचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होतं. ते नेहमी गरीबांच्या अधिकारांबाबत बोलत असत. मुख्यमंत्री असताना त्यांनी वंचित आणि मागासांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मुंगेरीलाल आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाच्या अहवालावरून त्यांनी १९७८ मध्ये मागासांना १२ टक्के आरक्षणाची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयाचा लाभ ७९ जातींना मिळाला या निर्णयांतर्गत अतिमागास वर्गाला ८ टक्के आणि मागास वर्गीयांसाठी ४ टक्के आरक्षण देण्यात आलं.

कर्पुरी ठाकूर यांचे राजकीय गुरू डॉ. राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण हे होते. मधु लिमये आणि रामसेवक यादव त्यांचे सहकारी होते. बिहारमध्ये कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी तो त्याला कर्पुरी ठाकूर यांना आपला आदर्श मानतो. नितीश कुमार, रामविलास पासवान, लालूप्रसाद यादव, आणि सुशीलकुमार मोदी यांचे कर्पुरी ठाकूर हे राजकीय गुरू होते.

कर्पुरी ठाकूर यांनी दोन वेळा बिहारचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. तर एकदा उपमुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मात्र असं असलं तरी ते कुठल्याही वैयक्तिक प्रवासासाठी रिक्षाचा वापर करत. स्वत:ची कार खरेदी करावी एवढं मुख्यमंत्रि म्हणून त्यांना मानधन मिळत नसे. वयाच्या केवळ ६४ व्या वर्षी १७ फेब्रुवारी १९८८ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्युनंतर समाजवादी नेते हेमवतीनंदन बहुगुणा त्यांच्या गावात गेले. तेव्हा कर्पुरी ठाकूर यांचं निवासस्थान असलेलं झोपडीवजा घर पाहून त्यांचे डोळे पाणावले. त्या झोपडीशिवाय त्यांची काहीच संपत्ती नव्हती.  

टॅग्स :BiharबिहारCentral Governmentकेंद्र सरकार