शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लालूंच्या कन्या मिसा भारतींना ईडीने बजावला समन्स

By admin | Updated: July 10, 2017 17:15 IST

राज्यसभा खासदार मिसा भारती यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी समन्स बजावला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची कन्या आणि राज्यसभा खासदार मिसा भारती यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी समन्स बजावला आहे. 
गेल्या शनिवारी मिसा भारती, त्यांचे पती शैलेश कुमार यांच्या दिल्लीतील घिटोरनी, बिजवासन आणि सैनिक फार्म हाउसवर सक्तवसुली संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी धाडी टाकल्या होत्या. यावेळी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, फोन आणि काही कागदपत्रे सक्तवसुली संचालनालयाने जप्त केल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी आज मिसा भारती यांच्यासह त्यांचे पती शैलेश कुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने पीएमएलए कायद्याअंतर्गत समन्स पाठविला आहे. 
दिल्लीतील घिटोरनी, बिजवासन आणि सैनिक फार्म हाउसवर सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांनी धाडी टाकल्या होती. ही फार्महाउस मिसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार अॅन्ड मेसर्स मिसाइल प्रिंटर्स अॅन्ड पॅकर्स प्रा.लि.शी संबंधित आहेत. तसेच, यासंबंधी आणखी दोन ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाचे लक्ष असून, त्यांचा तपास लवकरच करण्यात येणार असल्याचे एका सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांने सांगितले. 
(लालूंची कन्या मिसा भारती अडचणीत, ईडीनं सीएला ठोकल्या बेड्या)
(लालूंच्या कन्या मीसा भारती यांची मालमत्ता जप्त)
(बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : मिसा भारतींची 12 जूनला होणार चौकशी)
दरम्यान, 8 हजार कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी मिसा भारती यांचे सीए राजेश अग्रवाल याला सक्तवसुली संचालनालयाने बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, सक्तवसुली संचालनालयाने राजेश अग्रवालला दिल्लीतील पटियाळा हाऊस न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचे राजकीय पक्षांबरोबर संबंध असल्याचे समोर आले होते. प्राप्तिकर विभागाने दिल्ली आणि गुरुग्राम येथे लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित कंपन्या अशा सुमारे 22 ठिकाणी छापे मारले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे छापे 1 हजार कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या व्यवहाराच्या आरोपावरून मारण्यात आले होते. तसेच, गेल्या 15 वर्षांत डझनांहून अधिक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे.