शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Lal Bahadur Shastri Jayanti: त्या रात्री काय झालं होतं, जाणून घ्या लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 11:14 IST

खोलीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं की, पंतप्रधानांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली- वर्षं 1965मध्ये भारत पाकिस्तानमध्ये युद्ध संपून काहीच दिवस झाले होते. नवं वर्षं सुरू होणार होतं. खरं तर त्या दिवसांत दिल्लीत कडाक्याची थंडी होती. परंतु भारत-पाक सीमेवर दारूगोळ्याचा वास आणि गोळ्यांचा आवाज सर्वांच्या कानात घुमत होता. याच दोन्ही देशांमध्ये शांती वार्ता करण्याचं ठरलं आणि जागाही निश्चित झाली. चर्चेची जागा भारत आणि पाकिस्तानऐवजी ताशकंद निवडण्यात आली. तत्कालीन सोव्हिएत रशियांच्या अंतर्गत येणा-या ताशकंदमध्ये 10 जानेवारी 1966मध्ये भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांच्यात बैठक ठरली.10 जानेवारी 1966ला पहाटे थंडी जरा जास्तच होती. खरं तर भारतीय मंत्रिमंडळाचा ही थंडी सोसण्याची सवय नव्हती. भेटीची वेळ पहिल्यापासूनच ठरलेली होती. लाल बहादूर शास्त्री आणि अयुब खान यांची भेट ठरलेल्या वेळेत झाली. चर्चा बराच वेळ सुरू राहिली आणि अखेर दोन्ही देशांमध्ये शांती करार करण्यावर एकमत झालं. त्यामुळे दोन्ही देशांकडून आलेलं प्रतिनिधीमंडळ खूश झालं. परंतु ती रात्र भारतासाठी काळरात्र ठरली. 10 ते 11 जानेवारीदरम्यान लाल बहादूर शास्त्रींची संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांनी या घटनेचा उल्लेख त्यांची आत्मकथा 'बियॉन्ड द लाइंस (Beyond the Lines)'मध्ये केला आहे.ते लिहितात, मध्यरात्रीनंतर अचानक माझ्या रुमची बेल वाजली. दरवाज्यासमोर एक महिला उभी होती. ती म्हणाली की, तुमच्या पंतप्रधानांची परिस्थिती गंभीर आहे. मी धावत-पळतच त्यांच्या खोलीत गेलो. तोपर्यंत उशीर झाला होता. खोलीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं की, पंतप्रधानांचा मृत्यू झाला आहे. त्या ऐतिहासिक कराराच्या काही काळातच भारतासाठी सर्व परिस्थिती बदलली होती. दुस-या देशात लाल बहादूर शास्त्रींचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं भारतात शोकाकुल वातावरण होते.लोक दुःखी होतेच, परंतु त्यापेक्षा जास्त हैराण होते. त्यानंतर लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागली. तसेच लाल बहादूर मृत्यूमागे संशय व्यक्त केला जाऊ लागला. विशेष म्हणजे लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूची प्रत्यक्षदर्शी असलेली त्यांची चिकित्सक आणि नोकर रामनाथ यांची रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर मृत्यूचं गूढ आणखी वाढलं. लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर सरकारनं राज नारायण समिती बनवली. या समितीनं तपास केला. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही, पुढे त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलंच नाही. 

टॅग्स :Lal Bahadur Shastriलाल बहादुर शास्त्री