शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
3
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
4
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
5
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
6
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
7
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
8
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
9
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
10
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
11
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
12
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
13
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
14
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
15
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
16
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
17
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
18
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
19
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
20
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
Daily Top 2Weekly Top 5

लाखभर शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

लाखभर शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित

लाखभर शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित
८० टक्के शेतकर्‍यांनाच मदत, शासनाकडून निधीच मिळेना
औरंगाबाद : राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी आर्थिक मदतीचे पॅकेज दिले असले तरी जिल्ह्यातील सुमारे ९५ हजार शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. शासनाकडून ८० टक्केच निधी मिळाल्याने जिल्ह्यातील ४ लाख ८४ हजार शेतकर्‍यांनाच ही मदत मिळालेली आहे. उर्वरित शेतकर्‍यांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे या शेतकर्‍यांना मदत मिळालेली नाही.
औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी सलग तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहेत. गतवर्षी फेबु्रवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर दुष्काळामुळे खरीप हंगामही गेला. आता रबी हंगामात पुन्हा गारपीट आणि अवकाळी पावसाचे संकट उभे आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना शासनाने मदत देण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे अनेक शेतकर्‍यांना शासनाने आधी जाहीर केलेली दुष्काळी मदतही मिळालेली नाही. खरीप हंगामाच्या नुकसानीपोटी शासनाने डिसेंबरअखेरीस शेतकर्‍यांसाठी वैयक्तिक मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील ५ लाख ८० हजार शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले. त्यांच्यासाठी एकूण २८८ कोटी रुपयांच्या निधीची गरज होती; परंतु शासनाने दोन टप्प्यात यातील ८० टक्केच म्हणजे २३९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीचे वाटप नुकतेच पूर्ण झाले. त्यातून जिल्ह्यातील ४ लाख ८४ हजार शेतकर्‍यांनाच मदत मिळाली. अजूनही ९५ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी तिसर्‍या टप्प्यात निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, दुसर्‍या टप्प्याचे वाटप पूर्ण होऊनही तिसर्‍या टप्प्यातील निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला नाही. मदतीपासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांमध्ये औरंगाबाद तालुक्यातील १८ हजार, पैठणमधील ८ हजार, फुलंब्रीतील ३ हजार, वैजापूर १९ हजार, गंगापूर ८ हजार, खुलताबादेतील ५ हजार, तर सिल्लोडमधील २५ हजार आणि कन्नड तालुक्यातील १९ हजार शेतकर्‍यांचा समावेश आहे.

तालुकाएकूण शेतकरीमदत मिळालेले शेतकरी
औरंगाबाद६२,७५६ ४४,४५५
पैठण८२,८२९ ७४,८२९
फुलंब्री४६,०४७ ४२,७३८
वैजापूर१०,०५९३ ८१,७७४
गंगापूर७७,००४ ६९,१०७
खुलताबाद२७,३१८ २२,७२६
सिल्लोड७४,१७९ ५५,११३
कन्नड८३,४६९ ६४,२८४
सोयगाव२६,७२१ २६,७२१
-------------------------------------------
एकूण५,८०,९१६४,८५,८३७
-------------------------------------------