शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

निवडणूक न लढणाऱ्या पक्षांवर कोसळणार कुऱ्हाड

By admin | Updated: March 21, 2015 23:51 IST

मागील ५ ते १० वर्षात एकही निवडणूक न लढणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्यामुळे अशा राजकीय पक्षांवर निकट भविष्यात कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

कोलकाता : मागील ५ ते १० वर्षात एकही निवडणूक न लढणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्यामुळे अशा राजकीय पक्षांवर निकट भविष्यात कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.मुख्य निवडणूक आयुक्त एच.एस. ब्रह्मा यांनी शनिवारी येथे असे संकेत दिले. देशभरात एकूण १,६०० च्या वर नोंदणीकृत राजकीय पक्ष असून त्यापैकी २०० पेक्षाही कमी पक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, अशी माहितीही त्यांनी दिली. नॅशनल इलेक्शन वॉचच्या एका संमेलनात मार्गदर्शन करताना ब्रह्मा म्हणाले की, एखादा पक्ष पाच वर्षे, सात वर्षे किंवा १० वर्षे कुठल्याही निवडणुकीत सहभागी होत नसेल तर त्याची नोंदणी आपोआपच रद्द झाली पाहिजे याबाबत आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. याशिवाय किमान दोन ते तीन विधानसभा आणि एक लोकसभेची निवडणूक न लढविलेल्या पक्षांविरुद्ध काही ठोस कारवाई करण्याच्या दृष्टीनेही विचार सुरू आहे.आम्ही याची अंमलबजावणी करू शकत नाही. परंतु लोकांकडून त्यांच्यावर (लोकप्रतिनिधी) दबाव आल्यास राजकारणाशिवाय इतर स्वार्थसिद्धींसाठी होणाऱ्या राजकीय पक्षांच्या बोगस नोंदणींवर आळा घालता येणे शक्य आहे, असेही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. नोंदणीकृत राजकीय पक्षांना राज्य सरकारकडून प्राप्ती करात सवलतींसह अनेक फायदे मिळत असतात. (वृत्तसंस्था)बनावट मतदार नसलेला पहिला देशबायोमेट्रिक डाटा असलेला जगातील पहिला देश म्हणून भारत ओळखला जाणार असून नागरिकाचे मतदान ओळख पत्र त्याच्या आधार कार्डशी जोडल्यानंतर मतदार यादीत कुठलीही बनावट नावे समाविष्ट होणार नाहीत, असा विश्वास ब्रह्मा यांनी व्यक्त केला. एपिक कार्डवर आधारक्रमांक टाकण्यात आम्हाला यश येईल त्यावेळी एकही बनावट क्रमांक असणार नाही. २०१५ सालातच हे काम पूर्णत्वास येणार असून त्यानंतर भारत जगभरात मतदारांसाठी बायोमेट्रिक व्यवस्था असलेला एकमेव देश असेल.