शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक न लढणाऱ्या पक्षांवर कोसळणार कुऱ्हाड

By admin | Updated: March 21, 2015 23:51 IST

मागील ५ ते १० वर्षात एकही निवडणूक न लढणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्यामुळे अशा राजकीय पक्षांवर निकट भविष्यात कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

कोलकाता : मागील ५ ते १० वर्षात एकही निवडणूक न लढणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्यामुळे अशा राजकीय पक्षांवर निकट भविष्यात कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.मुख्य निवडणूक आयुक्त एच.एस. ब्रह्मा यांनी शनिवारी येथे असे संकेत दिले. देशभरात एकूण १,६०० च्या वर नोंदणीकृत राजकीय पक्ष असून त्यापैकी २०० पेक्षाही कमी पक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, अशी माहितीही त्यांनी दिली. नॅशनल इलेक्शन वॉचच्या एका संमेलनात मार्गदर्शन करताना ब्रह्मा म्हणाले की, एखादा पक्ष पाच वर्षे, सात वर्षे किंवा १० वर्षे कुठल्याही निवडणुकीत सहभागी होत नसेल तर त्याची नोंदणी आपोआपच रद्द झाली पाहिजे याबाबत आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. याशिवाय किमान दोन ते तीन विधानसभा आणि एक लोकसभेची निवडणूक न लढविलेल्या पक्षांविरुद्ध काही ठोस कारवाई करण्याच्या दृष्टीनेही विचार सुरू आहे.आम्ही याची अंमलबजावणी करू शकत नाही. परंतु लोकांकडून त्यांच्यावर (लोकप्रतिनिधी) दबाव आल्यास राजकारणाशिवाय इतर स्वार्थसिद्धींसाठी होणाऱ्या राजकीय पक्षांच्या बोगस नोंदणींवर आळा घालता येणे शक्य आहे, असेही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. नोंदणीकृत राजकीय पक्षांना राज्य सरकारकडून प्राप्ती करात सवलतींसह अनेक फायदे मिळत असतात. (वृत्तसंस्था)बनावट मतदार नसलेला पहिला देशबायोमेट्रिक डाटा असलेला जगातील पहिला देश म्हणून भारत ओळखला जाणार असून नागरिकाचे मतदान ओळख पत्र त्याच्या आधार कार्डशी जोडल्यानंतर मतदार यादीत कुठलीही बनावट नावे समाविष्ट होणार नाहीत, असा विश्वास ब्रह्मा यांनी व्यक्त केला. एपिक कार्डवर आधारक्रमांक टाकण्यात आम्हाला यश येईल त्यावेळी एकही बनावट क्रमांक असणार नाही. २०१५ सालातच हे काम पूर्णत्वास येणार असून त्यानंतर भारत जगभरात मतदारांसाठी बायोमेट्रिक व्यवस्था असलेला एकमेव देश असेल.