शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
6
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
7
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
8
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
9
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
10
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
11
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
12
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
13
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
14
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
15
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
16
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
17
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
18
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
19
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
20
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...

नोटाबंदीवर ‘अर्थक्रांती’ अस्वस्थ

By admin | Updated: November 15, 2016 02:12 IST

५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द करा, अशी सूचना मोदी सरकारला करणारा अर्थक्रांती हा सल्लागार गट, सरकारने दोन हजार रुपयांची नोट आणल्याबद्दल अस्वस्थ झाला

हरीश गुप्ता / नवी दिल्ली ५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द करा, अशी सूचना मोदी सरकारला करणारा अर्थक्रांती हा सल्लागार गट, सरकारने दोन हजार रुपयांची नोट आणल्याबद्दल अस्वस्थ झाला आहे. या गटाने आपल्या सूचनेनुसार मोठ्या मूल्यांच्या चलनी नोटा रद्द केल्याबद्दल आनंदच व्यक्त केला, परंतु मोदी सरकारने दोन हजार रुपयांची नोट व्यवहारात आणल्याचा रागही त्याला आहे. व्यवहारातून काळा पैसा काढून टाकण्यासाठीच्या सूचनांचे अर्थक्रांतीने नरेंद्र मोदी यांच्यासमोर दोन तासांचे सादरीकरण केले होते. पुणेस्थित अर्थक्रांती गटाच्या नेत्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटेचा विषय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या निदर्शनास आणून दिला. ही नोट आणल्याने काळा पैसा काढून टाकण्याच्या उद्देशालाच सुरुंग लागला असल्याचे त्यांनी जोशी यांना सांगितले. जोशी यांनी ५०० आणि एक हजार रुपयांची नोट रद्द करण्यावरील भाष्यात सावध भूमिका घेतली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत दोन कार्यक्रमांत भाषण केले. परंतु त्यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केलेले नाही.संघाने नेहमीच काळ््या पैशाविरुद्ध आवाज उठवला आहे. त्याने याच कारणासाठी जयप्रकाश नारायण आणि विश्वनाथ प्रताप सिंह यांच्यासोबत काम केले आहे. जयप्रकाश नारायण आणि सिंह हे मोठ्या रकमेच्या नोटा रद्द करण्यास अनुकूल होते, परंतु दोन हजार रुपयांची नोट बाजारात आणल्यामुळे काळ््या पैशाला नष्ट करण्याचा नेतृत्वाचा हेतूच साध्य होणार नाही, तर येत्या काही महिन्यांत आणि वर्षांत आणखी काळा पैसा निर्माण होणार आहे.प्रामाणिकपणा, सचोटीवर ताशेरे ओढणे योग्य नाही-अर्थक्रांती गटाचे कडवे समर्थक बाबा रामदेव यांनी ५०० व एक हजार रुपयांची नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे एका निवेदनाद्वारे समर्थन केल्यानंतर आता मात्र, मौन धारण केले आहे. मोदी यांनी जपानमध्ये काळ््या पैशांवर अत्यंत कठोरपणे केलेल्या हल्ल्यावरही भाजपाचे काही वरिष्ठ खासदार संतप्त आहेत. बहुसंख्य संसद सदस्यांनी सोन्यावर कर आकारण्याला विरोध करणारे निवेदन मला दिले होते. माझ्याकडे ती कागदपत्रे असून, मी त्यांची नावे जाहीर केली, तर त्यांना त्यांच्या मतदारसंघात लपायला जागा मिळणार नाही, असे मोदी म्हणाले होते. या वक्तव्यामुळे खासदार दुखावले. त्यांचे म्हणणे असे होते की, सोन्यावर लादल्या जाणाऱ्या कराला व्यापाऱ्यांचा विरोध असून, तो केवळ आम्ही मोदी यांच्यापर्यंत पोहोचवला. त्या आधारे आमचा प्रामाणिकपणा आणि सचोटीवर ताशेरे ओढणे योग्य नाही, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.