शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नोटाबंदीवर ‘अर्थक्रांती’ अस्वस्थ

By admin | Updated: November 15, 2016 02:12 IST

५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द करा, अशी सूचना मोदी सरकारला करणारा अर्थक्रांती हा सल्लागार गट, सरकारने दोन हजार रुपयांची नोट आणल्याबद्दल अस्वस्थ झाला

हरीश गुप्ता / नवी दिल्ली ५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द करा, अशी सूचना मोदी सरकारला करणारा अर्थक्रांती हा सल्लागार गट, सरकारने दोन हजार रुपयांची नोट आणल्याबद्दल अस्वस्थ झाला आहे. या गटाने आपल्या सूचनेनुसार मोठ्या मूल्यांच्या चलनी नोटा रद्द केल्याबद्दल आनंदच व्यक्त केला, परंतु मोदी सरकारने दोन हजार रुपयांची नोट व्यवहारात आणल्याचा रागही त्याला आहे. व्यवहारातून काळा पैसा काढून टाकण्यासाठीच्या सूचनांचे अर्थक्रांतीने नरेंद्र मोदी यांच्यासमोर दोन तासांचे सादरीकरण केले होते. पुणेस्थित अर्थक्रांती गटाच्या नेत्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटेचा विषय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या निदर्शनास आणून दिला. ही नोट आणल्याने काळा पैसा काढून टाकण्याच्या उद्देशालाच सुरुंग लागला असल्याचे त्यांनी जोशी यांना सांगितले. जोशी यांनी ५०० आणि एक हजार रुपयांची नोट रद्द करण्यावरील भाष्यात सावध भूमिका घेतली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत दोन कार्यक्रमांत भाषण केले. परंतु त्यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केलेले नाही.संघाने नेहमीच काळ््या पैशाविरुद्ध आवाज उठवला आहे. त्याने याच कारणासाठी जयप्रकाश नारायण आणि विश्वनाथ प्रताप सिंह यांच्यासोबत काम केले आहे. जयप्रकाश नारायण आणि सिंह हे मोठ्या रकमेच्या नोटा रद्द करण्यास अनुकूल होते, परंतु दोन हजार रुपयांची नोट बाजारात आणल्यामुळे काळ््या पैशाला नष्ट करण्याचा नेतृत्वाचा हेतूच साध्य होणार नाही, तर येत्या काही महिन्यांत आणि वर्षांत आणखी काळा पैसा निर्माण होणार आहे.प्रामाणिकपणा, सचोटीवर ताशेरे ओढणे योग्य नाही-अर्थक्रांती गटाचे कडवे समर्थक बाबा रामदेव यांनी ५०० व एक हजार रुपयांची नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे एका निवेदनाद्वारे समर्थन केल्यानंतर आता मात्र, मौन धारण केले आहे. मोदी यांनी जपानमध्ये काळ््या पैशांवर अत्यंत कठोरपणे केलेल्या हल्ल्यावरही भाजपाचे काही वरिष्ठ खासदार संतप्त आहेत. बहुसंख्य संसद सदस्यांनी सोन्यावर कर आकारण्याला विरोध करणारे निवेदन मला दिले होते. माझ्याकडे ती कागदपत्रे असून, मी त्यांची नावे जाहीर केली, तर त्यांना त्यांच्या मतदारसंघात लपायला जागा मिळणार नाही, असे मोदी म्हणाले होते. या वक्तव्यामुळे खासदार दुखावले. त्यांचे म्हणणे असे होते की, सोन्यावर लादल्या जाणाऱ्या कराला व्यापाऱ्यांचा विरोध असून, तो केवळ आम्ही मोदी यांच्यापर्यंत पोहोचवला. त्या आधारे आमचा प्रामाणिकपणा आणि सचोटीवर ताशेरे ओढणे योग्य नाही, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.