शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोझिकोडे रनवेचा विस्तार होणार?; एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:05 IST

गतवर्षीही रनवे विस्ताराचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र, राज्य सरकार विमानतळ डेव्हलपर्सना अतिरिक्त जमीन देऊ शकले नाही.

नवी दिल्ली : कोझिकोडेमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला अपघात झाल्यानंतर या विमानतळाच्या रनवेच्या विस्ताराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अर्थात या अपघाताची चौकशी सुरू असून, त्याच्या अहवालावर या रनवेचे भवितव्य अवलंबून आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.या विमान अपघातात पायलटसह १८ जणांचा मृत्यू झाला होता. गतवर्षीही रनवे विस्ताराचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र, राज्य सरकार विमानतळ डेव्हलपर्सना अतिरिक्त जमीन देऊ शकले नाही. केरळात दरवर्षी मोठा पाऊस होतो आणि त्यामुळे विमान उतरण्याचा धोका वाढतो. कारण, या रनवेवर घर्षण कमी होते. मागील आठवड्यात झालेला अपघात एवढा भयंकर होता की, विमानाचे अक्षरश: तुकडे झाले. मंगलोरमध्ये २०१० मध्ये अशाच एका अपघातात १५८ लोकांचा मृत्यू झाला होता.अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०१७ मध्ये एएआयने २७५० मीटर रनवेचा ८०० मीटरपर्यंत विस्तार करण्याची योजना आखण्यात आली होती. त्यासाठी केरळ सरकारकडून जमीन देण्याची प्रतीक्षा सुरू होती. एका अधिकाºयाने असेही सांगितले की, नवीन विस्ताराची योजना ही अपघाताच्या अहवालावर अवलंबून आहे.