शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

कोदामेंढी....

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

तलाठी गैरहजर, शेतकरी त्रस्त

तलाठी गैरहजर, शेतकरी त्रस्त
कोदामेंढी येथील प्रकार : कारवाईची मागणी
कोदामेंढी : तलाठी मुख्यालयी गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांची अनेक महत्त्वपूर्ण कामे रखडली आहेत. तलाठ्याच्या गैरहजरपणामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.
मंगळवारी स्थानिक तलाठी कार्यालयात परिसरातील अनेक गावांचे शेतकरी तलाठी सोनटक्के यांची प्रतीक्षा करीत होते. काहींनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी लवकर पोहोचतो असे सांगितले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत वाट पाहून तलाठी न आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. याबाबत कोतवाल देवानंद मेश्राम यांना विचारणा केली असता, मंगळवारी तलाठी शेतकऱ्यांच्या अनुदान याद्या तयार करण्यासाठी मौदा तहसील कार्यालयात असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे तलाठी गैरहजर असल्याचा प्रकार येथे सतत बघावयास मिळतो. तलाठ्याचे मुख्यालय येथे असताना ते मुख्यालयी राहत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.
या संदर्भात तहसीलदार पडोळे यांच्याशी सपंर्क साधला असता, सदर तलाठ्यास मी मंगळवारी बोलाविले नसल्याचे त्यांनी सांगितले. तलाठी सोनटक्के यांना मुख्यालयी राहून नागरिकांची कामे वेळीच करण्याची निर्देश दिले आहेत. परंतु नागरिकांना नाहक त्रास दिला जात असेल तर कारवाई करू असेही पडोळे यांनी स्पष्ट केले.
कोदामेंढी, अरोली, बेरडेपार, अडेगाव, तांडा, धर्मापुरी, खरडा, नांदगाव, धानोली, इंदोरा, वाकेश्वर, सिरसोली, वायगाव, सुकळी, तोंडली, वाघबोडी, बोरी, खंडाळा, राजोली, रेवराळ, नवरगाव, श्रीखंडा, मोरगाव, खात, महालगाव, पिंपळगाव, खिडकी व परिसरातील गावे मौदा तहसील कार्यालयापासून २५ किमी अंतरावर आहेत. यातील अनेक गावातील तलाठी जनतेची दिशाभूल करतात. तहसील कार्यालयात काम होते, असे कारण पुढे करून मुख्यालयी राहत नाहीत.
परिसरातील गावांच्या तलाठ्यांना तहसील कार्यालयात वारंवार न बोलविता मंडळ कार्यालयात तहसीलदारांनी बैठक घेऊन स्थानिक पातळीवर शासनाच्या योजना व कामांचे नियोजन करण्याची नितांत गरज आहे. तसेच कामचुकार अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)