शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मुसळधार पावसामुळे केरळमधील कोची विमानतळ बंद, मृतांची संख्या 45वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 11:39 IST

केरळला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.

कोची- केरळला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. केरळच्या अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळत असल्यानं अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहेत. तर या पावसामुळे आलेल्या पुरात आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. पेरियार नदीवरच्या धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे कोची विमानतळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजेपर्यंत या विमानतळावरून कोणतंही विमान उड्डाण होणार नाही.मुन्नारमध्ये अतिवृष्टीमुळे एक इमारत कोसळली असून, त्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर 6 मुलं या दुर्घटनेतून सुखरूप बचावली आहेत. तर गेल्या आठवड्यात कोसळलेल्या पावसानं 45 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोची विमानतळ परिसरातही मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळेच आजपासून तो बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे प्रभावित झाली आहेत. पेरियार, इडुक्की आणि चेरुथोनी धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे सतर्कतेच्या दृष्टीनं हे विमानतळ बंद करण्यात आलं आहे.या पुरात आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 55 हजारांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. एर्नाकुलम, त्रिशूर आणि वयानड जिल्ह्यांमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. शिवाय या भागात रेड अलर्टही जारी करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यातील पोलीस, एनडीआरएफ, लष्कर आणि काही संघटनांकडून पूरग्रस्त भागातील लोकांची मदत करण्यात येत आहे. या नैसर्गिक संकटामुळे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Keralaकेरळfloodपूर