शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Coal Crisis : देश अद्यापही वीज संकटाच्या उंबरठ्यावरच, २०१५ नंतर पहिल्यांदाच करणार ‘कोळसा आयात’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 09:09 IST

Coal Crisis : सरकारनं कोळसा सचिव, कोल इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्र, तसंच राज्याच्या वरिष्ठ ऊर्जा अधिकाऱ्यांना यासंदर्भातील पत्र लिहिलं आहे.

Coal Crisis : जगातील सर्वात मोठी कोळसा कंपनी आणि केंद्र सरकारच्या मालकीची कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) ही २०१५ नंतर (मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर) पहिल्यांदाच कोळसा आयात (Coal Import) करण्याच्या तयारीत आहे. देशातील कोळसा संकटाचा सामना करण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. आयात करण्यात आलेला कोळसा कंपनी देशभरातील वीज उत्पादन केंद्रांना देणार आहे. शनिवारी यासंदर्भातील एक पत्रही समोर आल्याची माहिती वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिली आहे.

कोळशाच्या संकटामुळे पुन्हा भारनियमन होण्याची भीती अधिक गडद झाली आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी ऊर्जा मंत्रालयानं अनेक पावले उचलली आहेत. असं झाल्यास कोल इंडियानं कोळसा आयात करण्याची २०१५ नंतरची ही पहिलीच वेळ असेल. एप्रिलच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य आणि केंद्राच्या अधिकाऱ्यांनी कोळशाचा साठा सुनिश्चित करण्यास सांगितलं आहे. एप्रिलमध्ये, देशभरातील थर्मल पॉवर प्लांट्सना सहा वर्षांत प्रथमच कोळशाच्या सर्वात वाईट संकटाचा सामना करावा लागला. याचाच परिणाम अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचे प्रकार घडले होते.

दरम्यान, कोळस आयात करण्याशी निगडीत निरनिराळ्या निविदांमुळे गोधंळाची परिस्थिती निर्माण होईल. यामुळे कोल इंडियाच्या माध्यमातूनच कोळशाची खरेदी केली जावी, अशी मागणी जवळपास सर्वच राज्यांकडून करण्यात आल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. याच मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचंही सांगण्यात आलं