शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा फटका; 4 महिन्यात गेल्या 15 लाख लोकांच्या नोकऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 09:29 IST

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. पण या नोटाबंदीचा फटका नोकरदार वर्गांना सगळ्यात जास्त बसला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 20- देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. पण या नोटाबंदीचा फटका नोकरदार वर्गांना सगळ्यात जास्त बसला असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे अवघ्या चार महिन्यात १५ लाख लोकांनी आपली नोकरी गमावली असल्याची माहिती समोर येते आहे. "सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनमी" (CMIE) ने केलेल्या एका सर्व्हेत तशी माहिती उघड झाली आहे. "कन्ज्यूमर पिरामिड हाउसहोल्ड" या नावाखाली हा सर्वे करण्यात आला आहे
आणखी वाचा
 

देशाचे नवे राष्ट्रपती आज ठरणार

अवघ्या १२ दिवसांत तब्बल ८ लाख पेपर तपासण्याचे आव्हान

राज्य सरकार व्हीआयपींसाठी ९० कोटींचे हेलिकॉप्टर खरेदी करणार

जर एका घरात एक व्यक्ती नोकरी करत असेल तर त्या व्यक्तीच्या नोकरीवर घरातील चार लोक अवलंबून असतात, म्हणून १५ लाख नोकऱ्या गेल्यानं ६० लाख लोकांच्या तोंडातील घास हिरावून घेतला आहे, असं "सीएमआयई" त्यांच्या सर्व्हे अहवालात म्हटलं आहे. या सर्व्हेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर जानेवारी ते एप्रिल २०१७ या दरम्यान देशातील एकूण ४० कोटी ५० लाख नोकऱ्या राहिल्या आहेत. त्याआधी सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान ४० कोटी ६५ लाख नोकऱ्या होत्या. यानुसार नोटाबंदीच्या निर्णयानंतर चार महिन्यात तब्बल १५ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्याचं सर्व्हेत म्हंटलं आहे.

 
देशभरात हाउसहोल्डने केलेल्या सर्व्हेत जानेवारी ते एप्रिल २०१६ या काळात तरुणांना मिळणारा रोजगार व त्यांच्या बेरोजगारीसंबंधीचे आकडे गोळा केले आहेत. हा सर्व्हेसाठी १ लाख ६१ हजार घरातील ५ लाख १९ हजार तरुणांसोबत नोकरीसंदर्भात चर्चा केली गोली. आधी ४० कोटी ६५ लाख लोकांकडे रोजगार होता. पण नोटाबंदीनंतर आता ४० कोटी ५० लाख लोकांकडे नोकरी राहिली असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
 
दरम्यान, संसदेची स्थायी समिती नोटाबंदीवरील आपल्या अहवालाला गुरूवारी अंतिम स्वरूप देऊ शकते. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम.वीरप्पा मोइली यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समिती संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. समितीने यापूर्वीच ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याबाबत आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचं म्हणणं नोंदवून घेतलं आहे.
 
 
आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत चिंता
आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत बुधवारी राज्यसभेत चिंता व्यक्त करण्यात आली. विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी हा मुद्दा संसदेत उचलला होता . त्यावर सरकार आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा पुरवेल, अशी ग्वाही कामगार आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी दिली होती. आतापर्यंत १ कोटी ३ लाख नवे कर्मचारी इपीएफओ अंतर्गत आणल्याचं सांगत जास्तीत जास्त कर्मचारी आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितलं आहे.