शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा फटका; 4 महिन्यात गेल्या 15 लाख लोकांच्या नोकऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 09:29 IST

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. पण या नोटाबंदीचा फटका नोकरदार वर्गांना सगळ्यात जास्त बसला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 20- देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. पण या नोटाबंदीचा फटका नोकरदार वर्गांना सगळ्यात जास्त बसला असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे अवघ्या चार महिन्यात १५ लाख लोकांनी आपली नोकरी गमावली असल्याची माहिती समोर येते आहे. "सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनमी" (CMIE) ने केलेल्या एका सर्व्हेत तशी माहिती उघड झाली आहे. "कन्ज्यूमर पिरामिड हाउसहोल्ड" या नावाखाली हा सर्वे करण्यात आला आहे
आणखी वाचा
 

देशाचे नवे राष्ट्रपती आज ठरणार

अवघ्या १२ दिवसांत तब्बल ८ लाख पेपर तपासण्याचे आव्हान

राज्य सरकार व्हीआयपींसाठी ९० कोटींचे हेलिकॉप्टर खरेदी करणार

जर एका घरात एक व्यक्ती नोकरी करत असेल तर त्या व्यक्तीच्या नोकरीवर घरातील चार लोक अवलंबून असतात, म्हणून १५ लाख नोकऱ्या गेल्यानं ६० लाख लोकांच्या तोंडातील घास हिरावून घेतला आहे, असं "सीएमआयई" त्यांच्या सर्व्हे अहवालात म्हटलं आहे. या सर्व्हेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर जानेवारी ते एप्रिल २०१७ या दरम्यान देशातील एकूण ४० कोटी ५० लाख नोकऱ्या राहिल्या आहेत. त्याआधी सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान ४० कोटी ६५ लाख नोकऱ्या होत्या. यानुसार नोटाबंदीच्या निर्णयानंतर चार महिन्यात तब्बल १५ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्याचं सर्व्हेत म्हंटलं आहे.

 
देशभरात हाउसहोल्डने केलेल्या सर्व्हेत जानेवारी ते एप्रिल २०१६ या काळात तरुणांना मिळणारा रोजगार व त्यांच्या बेरोजगारीसंबंधीचे आकडे गोळा केले आहेत. हा सर्व्हेसाठी १ लाख ६१ हजार घरातील ५ लाख १९ हजार तरुणांसोबत नोकरीसंदर्भात चर्चा केली गोली. आधी ४० कोटी ६५ लाख लोकांकडे रोजगार होता. पण नोटाबंदीनंतर आता ४० कोटी ५० लाख लोकांकडे नोकरी राहिली असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
 
दरम्यान, संसदेची स्थायी समिती नोटाबंदीवरील आपल्या अहवालाला गुरूवारी अंतिम स्वरूप देऊ शकते. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम.वीरप्पा मोइली यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समिती संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. समितीने यापूर्वीच ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याबाबत आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचं म्हणणं नोंदवून घेतलं आहे.
 
 
आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत चिंता
आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत बुधवारी राज्यसभेत चिंता व्यक्त करण्यात आली. विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी हा मुद्दा संसदेत उचलला होता . त्यावर सरकार आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा पुरवेल, अशी ग्वाही कामगार आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी दिली होती. आतापर्यंत १ कोटी ३ लाख नवे कर्मचारी इपीएफओ अंतर्गत आणल्याचं सांगत जास्तीत जास्त कर्मचारी आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितलं आहे.