शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

Kiren Rijij : 'न्यायाधीशांनी विचार करुन बोलावं, टीका करताना भाषेची मर्यादा असावी'; किरेन रिजिजूंचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 16:04 IST

Kiren Rijij :कोणावरही टीका करण्यापर्यंत ठीक आहे पण टीका करताना भाषेची मर्यादा असावी. आपण कोणत्या प्रकारचे शब्द वापरतो, याकडे न्यायालयाने लक्ष दिले पाहिजे.

नवी दिल्ली: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijij) यांनी न्यायपालिका, विधिमंडळ आणि निवडणूक आयोग यांच्यातील समन्वयावर बोलताना न्यायाधीशांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'न्यायाधीशांनी निवडणूक आयोगाबाबत सावधपणे बोलले पाहिजे, परिस्थिती समजून घेतली पाहिजे. न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि निवडणूक आयोग यांच्यात समन्वय असायला हवा, मात्र कोणाच्याही कामात हस्तक्षेप होता कामा नये', असे वक्तव्य रिजिजू यांनी केले आहे. ते मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

टीका करताना भाषेची मर्यादा असावीरिजिजू म्हणाले की, 'देशभरातील नागरिकांकडे मतदार कार्ड आहे आणि हे सर्वात महत्त्वाचे आह. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षांत अप्रतिम काम केले आहे. माझा स्वत:चा गेल्या 7 निवडणुका लढवण्याचा अनुभवही खूप चांगला आहे. यामुळेच भारताची लोकशाही मजबूत होते. कोणावरही टीका करण्यापर्यंत ठीक आहे पण टीका करताना भाषेची मर्यादा असावी. आपण कोणत्या प्रकारचे शब्द वापरतो, याकडे न्यायालयाने लक्ष दिले पाहिजे. प्रत्येकजण आपापले काम करत आहे. कठोर टीका करण्यात काही नुकसान नाही, परंतु चांगल्या कृतींचे कौतुकदेखील केले पाहिजे', असेही ते म्हणाले.

आयोगाचे काम कौतुकास्पद

रिजिजू पुढे म्हणाले, 'न्यायमूर्तींनी निवडणूक आयोगाबाबत सावधपणे बोलावे. परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आगामी काळात आणखी निवडणूक सुधारणा केल्या जातील, पण आयोगावर टीका योग्य नाही. कोविड-19 दरम्यान निवडणूक आयोगाने ज्या प्रकारचे काम केले, ते कौतुकास्पद आहे. आयोगाने लोकशाही व्यवस्थेत अडचण येऊ दिली नाही, अशा स्थितीत आयोगावर टीका करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये

याावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र म्हणाले, मतदान हा एक महत्त्वाचा नागरी हक्क आहे आणि यातून लोकशाही राज्यघटनेवरचा विश्वास दिसून येतो. निवडणुकीत सर्व मतदारांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सध्या देशात 95.3 कोटी मतदार आहेत. यंत्रणेअभावी कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे.  कोविड-19 काळात आयोगाने अपवादात्मक परिस्थितीत काम केले, ज्याचे जगभरातून कौतुक होत आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान