शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Kiren Rijij : 'न्यायाधीशांनी विचार करुन बोलावं, टीका करताना भाषेची मर्यादा असावी'; किरेन रिजिजूंचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 16:04 IST

Kiren Rijij :कोणावरही टीका करण्यापर्यंत ठीक आहे पण टीका करताना भाषेची मर्यादा असावी. आपण कोणत्या प्रकारचे शब्द वापरतो, याकडे न्यायालयाने लक्ष दिले पाहिजे.

नवी दिल्ली: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijij) यांनी न्यायपालिका, विधिमंडळ आणि निवडणूक आयोग यांच्यातील समन्वयावर बोलताना न्यायाधीशांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'न्यायाधीशांनी निवडणूक आयोगाबाबत सावधपणे बोलले पाहिजे, परिस्थिती समजून घेतली पाहिजे. न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि निवडणूक आयोग यांच्यात समन्वय असायला हवा, मात्र कोणाच्याही कामात हस्तक्षेप होता कामा नये', असे वक्तव्य रिजिजू यांनी केले आहे. ते मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

टीका करताना भाषेची मर्यादा असावीरिजिजू म्हणाले की, 'देशभरातील नागरिकांकडे मतदार कार्ड आहे आणि हे सर्वात महत्त्वाचे आह. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षांत अप्रतिम काम केले आहे. माझा स्वत:चा गेल्या 7 निवडणुका लढवण्याचा अनुभवही खूप चांगला आहे. यामुळेच भारताची लोकशाही मजबूत होते. कोणावरही टीका करण्यापर्यंत ठीक आहे पण टीका करताना भाषेची मर्यादा असावी. आपण कोणत्या प्रकारचे शब्द वापरतो, याकडे न्यायालयाने लक्ष दिले पाहिजे. प्रत्येकजण आपापले काम करत आहे. कठोर टीका करण्यात काही नुकसान नाही, परंतु चांगल्या कृतींचे कौतुकदेखील केले पाहिजे', असेही ते म्हणाले.

आयोगाचे काम कौतुकास्पद

रिजिजू पुढे म्हणाले, 'न्यायमूर्तींनी निवडणूक आयोगाबाबत सावधपणे बोलावे. परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आगामी काळात आणखी निवडणूक सुधारणा केल्या जातील, पण आयोगावर टीका योग्य नाही. कोविड-19 दरम्यान निवडणूक आयोगाने ज्या प्रकारचे काम केले, ते कौतुकास्पद आहे. आयोगाने लोकशाही व्यवस्थेत अडचण येऊ दिली नाही, अशा स्थितीत आयोगावर टीका करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये

याावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र म्हणाले, मतदान हा एक महत्त्वाचा नागरी हक्क आहे आणि यातून लोकशाही राज्यघटनेवरचा विश्वास दिसून येतो. निवडणुकीत सर्व मतदारांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सध्या देशात 95.3 कोटी मतदार आहेत. यंत्रणेअभावी कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे.  कोविड-19 काळात आयोगाने अपवादात्मक परिस्थितीत काम केले, ज्याचे जगभरातून कौतुक होत आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान