शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खोतकर व सांबरे यांना हिरवा कंदील !

By admin | Updated: September 18, 2014 00:39 IST

जालना : माजीमंत्री अर्जुन खोतकर व आ. संतोष सांबरे या दोघा मातब्बर पुढाऱ्यांच्या उमेदवारीवर शिवसेना पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

जालना : माजीमंत्री अर्जुन खोतकर व आ. संतोष सांबरे या दोघा मातब्बर पुढाऱ्यांच्या उमेदवारीवर शिवसेना पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. या जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील दोन डझन इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले होते. त्या सर्व इच्छुकांना शिवसेना पक्षश्रेष्ठींनी मंगळवारी मुंबईत मुलाखतींसाठी पाचारण केले. परंतु अर्ज दाखल केलेल्यांपैकी काही जणांनी ऐनवेळी माघार घेतली. ते ‘मातोश्री’कडे फिरकले सुद्धा नाहीत. मात्र अन्य इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह पक्षश्रेष्ठींसमोर उमेदवारीसाठी भक्कम दावे दाखल केले. माजी मंत्री अर्जुन खोतकर व शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर या दोघांनी जालन्यातून उमेदवारीसाठी दावा केला होता. या दोघांबरोबरही श्रेष्ठींनी मंगळवारी व बुधवारी तपशीलवार चर्चा केली. त्यातून अखेर खोतकर यांच्या उमेदवारीस श्रेष्ठींनी हिरवा कंदील दिल्याची माहिती हाती आली आहे. विद्यमान आमदार संतोष सांबरे यांनी यापूर्वीच बदनापुरातून पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे सांबरे यांनी श्रेष्ठींसमोर दावा केला. त्यांच्याबरोबर शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भास्कर मगरे यांनीही उत्सुकता दर्शविली होती. परंतु श्रेष्ठींनी या दोघांबरोबरही चर्चा करीत आ. सांबरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती हाती आली आहे. घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून तब्बल सतरा इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावा दाखल केला होता. त्यापैकी तेरा इच्छुकांनी मंगळवारी ‘मातोश्री’ वर हजेरी लावली. श्रेष्ठींसमोर उमेदवारीबाबत भक्कम दावा केला. माजी आमदार शिवाजीराव चोथे या प्रमुख दावेदारांबरोबर उपजिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर, युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य जगन्नाथ काकडे, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुधे, सतीश घाटगे, रवींद्र आर्दड, माजी सभापती चिंचाणे यांनीही मुलाखती दिल्या. माजी आमदार विलासबापू खरात व हिकमतराव उढाण या दोघांनीही ‘मातोश्री’ वर श्रेष्ठींच्या भेटी घेतल्या. उमेदवारीविषयी उत्सुकता दर्शविली. (प्रतिनिधी)घनसावंगी मतदारसंघातून तब्बल तेरा इच्छुकांनी उमेदवारीसाठी उत्सुकता दर्शविल्याने पक्षश्रेष्ठी बुचकाळ्यात पडली आहे. एकत्र या, विचार करा आणि तुमच्यापैकी एकाची शिफारस करा, असा सल्ला पक्षश्रेष्ठींनी या इच्छुकांना दिला होता. परंतु या इच्छुकांत एकमत न घडल्याने सर्वांनी श्रेष्ठींनाच तुम्ही द्याल, तो आदेश शिरसावंद्द राहिल, असा शब्द देऊन श्रेष्ठींसमोर पेच उभा केला असल्याचे वृत्त हाती आले आहे.