शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

चंबळचं खोरं : ‘डाकूंचं अभयारण्य’ नव्हे, स्वातंत्र्यसैनिकांचं ‘जन्मस्थान’..

By admin | Updated: May 20, 2017 16:27 IST

1857च्या स्वातंत्र्यसमराला 160 वर्षे होत असल्याच्या निमित्तानं जगात सर्वाधिक काळ चाललेल्या जंगलातील स्वातंत्र्यलढय़ाचं एक जाज्वल्य स्मरण.

 - समीर मराठे

 
‘डाकूंचं अभयारण्य’ म्हणून आजही कुप्रसिद्ध असलेल्या उत्तरेतल्या चंबळच्या खोर्‍याची प्रतिमा तशी नकारात्मकच आहे, परंतु इतिहासात भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध मानल्या जाणार्‍या 1857च्या स्वातंत्र्यसमरात याच चंबळच्या खोर्‍यानं सर्वाधिक क्रांतिकारक या देशाला दिले आणि भारतभरात इंग्रजांनी क्रांतिकारकांची मुस्कटदाबी सुरू केली असताना याच चंबळच्या खोर्‍यातील क्रांतिकारकांनी इंग्रजांना कित्येक वर्षं सळो की पळो करुन त्यांच्या नाकात दम आणला होता हा इतिहास आहे. चंबळच्या याच खोर्‍यात 25 मे 1857ला शेकडो क्रांतिकारक एकत्र आले होते आणि त्यांनी स्वातंत्र्याची तुतारी फुंकली होती. या घटनेला 25 मे रोजी बरोबर 160 वर्षे होतील. त्यानिमित्त त्याच ठिकाणी, त्याच दिवशी आता एक वेगळी ‘जनसंसद’ बसणार आहे. चंबळच्या खोर्‍यातील समस्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न यावेळी होणार आहे.
 
 
एक दशकापेक्षाही अधिक काळ ऐतिहासिक दस्तावेजांसाठी चित्रफिती तयार करण्याचं काम करणारे आणि चंबळ परिसरातील ऐतिहासिक जंगलांचं चित्रीकरण करण्यासाठी चंबळच्या खोर्‍यात सायकलवरुन तब्बल 2300 किलोमीटर प्रवास केलेले सामाजिक कार्यकर्ते शाह आलम यांनी या जनसंसदेचं आयोजन केलं आहे. 
चंबळच्या खोर्‍यात ‘पचनद’; पाच नद्यांचा संगम ज्या भागात होतो आणि जिथून गनिमी काव्यानं हजारो क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध ‘जंग’ सुरू केली होती त्याच ठिकाणी 25 मे पासून ही जनसंसद सुरू होणार आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील कार्यकर्ते, नागरिक या जनसंसदेला उपस्थित राहाणार आहेत. चंबळ खोर्‍याची ऐतिहासिक महती लोकांपर्यंत पुन्हा पोहोचवण्यासाठी आणि चंबळ खोर्‍याच्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित कार्यकर्त्यांमधून प्रत्येक विभागासाठी काही प्रतिनिधी (‘सांसद’) निवडले जाणार असून आपापाल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील. 
 
 
चंबळच्या खोर्‍यातलं जंगल आणि तिथल्या मातीच्या डोंगरांचा आधार नंतरच्या काळात जसा डाकूंनी घेतला तसाच आधार पूर्वी देशातल्या हजारो क्रांतिकारकांनी घेतला होता. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान अशा तिन्ही राज्यांच्या सीमा या जंगलाला लागून आहेत. या भागातील हजारो घरांचे मागचे दरवाजे आजही ‘बिहड’मध्ये (जंगलात) उघडतात. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे आणि मातीच्या डोंगरातील चक्रव्युहाच्या रचनेमुळे या भागात लपलेल्या लोकांना पुन्हा शोधून काढणं फारच मुश्कील. शिवाय या भागात पायीच फिरावं लागतं. घोडे वगैरे इथे चालू शकत नाहीत. याचाच फायदा घेत क्रांतिकारकांनी गनिमी काव्यानं स्वातंत्र्याची आपली लढाई अनेक वर्षे सुरू ठेवली होती. भारतात सगळ्या ठिकाणी इंग्रजांनी क्रांतीची केंद्रं उद्ध्वस्त केली, हजारो क्रांतिकारकांना काळ्या पाण्यावर पाठवलं, लाखो तरुणांना पकडून जेलमध्ये टाकलं, तर हजारोंची अक्षरश: कत्तल करून क्रांतिकारकांची चढाई मोडून काढली. चंबळच्या खोर्‍यात मात्र इंग्रजांनी हात टेकले. 1857ला सुरू झालेली ही लढाई इथले क्रांतिकारक तब्बल 1872पर्यंत लढत होते. 
 
 
सामाजिक कार्यकर्ते शाह आलम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितलं, म्हणूनच चंबळच्या या घाटीला ‘नर्सरी ऑफ सोल्र्जस’ म्हटलं जातं. स्वातंत्र्याच्या लढाईसाठी इथल्या लक्षावधी तरुणांनी आपलं रक्त सांडलं आणि ही लढाई सुरू ठेवली. जगातलं सर्वाधिक काळ चाललेलं आंदोलन, लढाई म्हणूनही इथल्या लढय़ाची इतिहासात नोंद झाली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेतही सर्वाधिक तरुण याच चंबळच्या खोर्‍यातील होते हादेखील एक जिवंत आणि जाज्वल्य इतिहास आहे. हा इतिहास पुन्हा जिवंत करण्याचं, चंबळच्या खोर्‍याचं ऐतिहासिक महत्त्व आणि सत्य देशातल्या सगळ्याच लोकांना पुन्हा समजावून सांगण्यासाठी आणि त्याचबरोबर इथल्या गरीब, फाटक्या लोकांच्या समस्यांना हात घालण्यासाठी ही जनसंसद येथे सुरू करण्यात येत आहे.