शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चंबळचं खोरं : ‘डाकूंचं अभयारण्य’ नव्हे, स्वातंत्र्यसैनिकांचं ‘जन्मस्थान’..

By admin | Updated: May 20, 2017 16:27 IST

1857च्या स्वातंत्र्यसमराला 160 वर्षे होत असल्याच्या निमित्तानं जगात सर्वाधिक काळ चाललेल्या जंगलातील स्वातंत्र्यलढय़ाचं एक जाज्वल्य स्मरण.

 - समीर मराठे

 
‘डाकूंचं अभयारण्य’ म्हणून आजही कुप्रसिद्ध असलेल्या उत्तरेतल्या चंबळच्या खोर्‍याची प्रतिमा तशी नकारात्मकच आहे, परंतु इतिहासात भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध मानल्या जाणार्‍या 1857च्या स्वातंत्र्यसमरात याच चंबळच्या खोर्‍यानं सर्वाधिक क्रांतिकारक या देशाला दिले आणि भारतभरात इंग्रजांनी क्रांतिकारकांची मुस्कटदाबी सुरू केली असताना याच चंबळच्या खोर्‍यातील क्रांतिकारकांनी इंग्रजांना कित्येक वर्षं सळो की पळो करुन त्यांच्या नाकात दम आणला होता हा इतिहास आहे. चंबळच्या याच खोर्‍यात 25 मे 1857ला शेकडो क्रांतिकारक एकत्र आले होते आणि त्यांनी स्वातंत्र्याची तुतारी फुंकली होती. या घटनेला 25 मे रोजी बरोबर 160 वर्षे होतील. त्यानिमित्त त्याच ठिकाणी, त्याच दिवशी आता एक वेगळी ‘जनसंसद’ बसणार आहे. चंबळच्या खोर्‍यातील समस्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न यावेळी होणार आहे.
 
 
एक दशकापेक्षाही अधिक काळ ऐतिहासिक दस्तावेजांसाठी चित्रफिती तयार करण्याचं काम करणारे आणि चंबळ परिसरातील ऐतिहासिक जंगलांचं चित्रीकरण करण्यासाठी चंबळच्या खोर्‍यात सायकलवरुन तब्बल 2300 किलोमीटर प्रवास केलेले सामाजिक कार्यकर्ते शाह आलम यांनी या जनसंसदेचं आयोजन केलं आहे. 
चंबळच्या खोर्‍यात ‘पचनद’; पाच नद्यांचा संगम ज्या भागात होतो आणि जिथून गनिमी काव्यानं हजारो क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध ‘जंग’ सुरू केली होती त्याच ठिकाणी 25 मे पासून ही जनसंसद सुरू होणार आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील कार्यकर्ते, नागरिक या जनसंसदेला उपस्थित राहाणार आहेत. चंबळ खोर्‍याची ऐतिहासिक महती लोकांपर्यंत पुन्हा पोहोचवण्यासाठी आणि चंबळ खोर्‍याच्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित कार्यकर्त्यांमधून प्रत्येक विभागासाठी काही प्रतिनिधी (‘सांसद’) निवडले जाणार असून आपापाल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील. 
 
 
चंबळच्या खोर्‍यातलं जंगल आणि तिथल्या मातीच्या डोंगरांचा आधार नंतरच्या काळात जसा डाकूंनी घेतला तसाच आधार पूर्वी देशातल्या हजारो क्रांतिकारकांनी घेतला होता. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान अशा तिन्ही राज्यांच्या सीमा या जंगलाला लागून आहेत. या भागातील हजारो घरांचे मागचे दरवाजे आजही ‘बिहड’मध्ये (जंगलात) उघडतात. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे आणि मातीच्या डोंगरातील चक्रव्युहाच्या रचनेमुळे या भागात लपलेल्या लोकांना पुन्हा शोधून काढणं फारच मुश्कील. शिवाय या भागात पायीच फिरावं लागतं. घोडे वगैरे इथे चालू शकत नाहीत. याचाच फायदा घेत क्रांतिकारकांनी गनिमी काव्यानं स्वातंत्र्याची आपली लढाई अनेक वर्षे सुरू ठेवली होती. भारतात सगळ्या ठिकाणी इंग्रजांनी क्रांतीची केंद्रं उद्ध्वस्त केली, हजारो क्रांतिकारकांना काळ्या पाण्यावर पाठवलं, लाखो तरुणांना पकडून जेलमध्ये टाकलं, तर हजारोंची अक्षरश: कत्तल करून क्रांतिकारकांची चढाई मोडून काढली. चंबळच्या खोर्‍यात मात्र इंग्रजांनी हात टेकले. 1857ला सुरू झालेली ही लढाई इथले क्रांतिकारक तब्बल 1872पर्यंत लढत होते. 
 
 
सामाजिक कार्यकर्ते शाह आलम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितलं, म्हणूनच चंबळच्या या घाटीला ‘नर्सरी ऑफ सोल्र्जस’ म्हटलं जातं. स्वातंत्र्याच्या लढाईसाठी इथल्या लक्षावधी तरुणांनी आपलं रक्त सांडलं आणि ही लढाई सुरू ठेवली. जगातलं सर्वाधिक काळ चाललेलं आंदोलन, लढाई म्हणूनही इथल्या लढय़ाची इतिहासात नोंद झाली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेतही सर्वाधिक तरुण याच चंबळच्या खोर्‍यातील होते हादेखील एक जिवंत आणि जाज्वल्य इतिहास आहे. हा इतिहास पुन्हा जिवंत करण्याचं, चंबळच्या खोर्‍याचं ऐतिहासिक महत्त्व आणि सत्य देशातल्या सगळ्याच लोकांना पुन्हा समजावून सांगण्यासाठी आणि त्याचबरोबर इथल्या गरीब, फाटक्या लोकांच्या समस्यांना हात घालण्यासाठी ही जनसंसद येथे सुरू करण्यात येत आहे.