शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

ममतांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे राज्यातील सामाजिक सौहार्दावर प्रतिकूल परिणाम- केशरीनाथ त्रिपाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 05:25 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे राज्यातील सामाजिक सौहार्दवर प्रतिकूल परिणाम होत आहे, असे टीकास्त्र मावळते राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी सोडले आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे राज्यातील सामाजिक सौहार्दवर प्रतिकूल परिणाम होत आहे, असे टीकास्त्र मावळते राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी सोडले आहे.आपल्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात ममतांशी त्रिपाठी यांचे अनेकदा वाद झालेले आहेत. दोहोंनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलले आहेत. राज्यपाल आपल्या सरकारला निशाणा बनवत आहेत व भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करून राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करीत आहेत, असा आरोपही ममतांनी अनेकदा केलेला आहे.त्रिपाठी म्हणाले की, ममतांना एक विशिष्ट दृष्टी आहे व घेतलेले निर्णय राबविण्याची धमकही त्यांच्यात आहे; परंतु त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे व संयम राखला पाहिजे. राज्यातील प्रत्येक नागरिकाबाबत त्यांनी भेदभाव न करता समानतेचे धोरण स्वीकारले पाहिजे.विविध प्रश्नांना त्रिपाठी यांनी उत्तरे दिली. राज्याचे नवे राज्यपाल जगदीप धनखड यांचा ३० जुलै रोजी शपथविधी होणार आहे.त्रिपाठी म्हणाले की, ममतांच्या तुष्टीकरणाच्या धोरणाचा सामाजिक सौहार्दावर प्रतिकूल परिणाम होत आहे. मला वाटते, राज्यातील प्रत्येक नागरिकाला भेदभावाची नव्हे, तर समानेची वागणूक मिळाली पाहिजे.पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला भेदभाव पाहायला मिळाला का, या प्रश्नाच्या उत्तरात ८५ वर्षीय त्रिपाठी म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य भेदभाव दाखवतात. राज्यातील हिंसेबाबतही चिंता वाटत असून, कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा झाली पाहिजे. लोक हिंसाचार का करीत आहेत, मला माहीत नाही. बांगलादेशी व रोहिंग्यांचे एक राजकीय कारण, सांप्रदायिक कारण किंवा अन्य काही कारण असू शकते.राज्यात लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत आणि त्यानंतर राजकीय हिंसेच्या अनेक घटना घडल्या आहेत. पश्चिम बंगालची विद्यमान कायदा-सुव्यवस्था पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का, या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे त्रिपाठी यांनी टाळले. ते म्हणाले की, राष्टÑपती राजवट विशिष्ट स्थितीमध्ये लागू केली जाऊ शकते आणि त्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या अनेक निर्णयांमध्ये उल्लेख आलेले आहेत. कायदा-व्यवस्था हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे केवळ कायदा-व्यवस्था बिघडण्यामुळेच राष्टÑपती राजवट लागू केली जाऊ शकत नाही. सरकार घटनेनुसार काम करीत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे मात्र राष्टÑपती राजवट लागू केली जाऊ शकते.पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुका स्वतंत्र व निष्पक्ष पद्धतीने झाल्या होत्या का, असे विचारता त्रिपाठी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची प्रशंसा केली; परंतु त्यांनी आरोप केला की, खालच्या पातळीवर पोलिसांनी राजकीय पक्षांशी स्वत:ला जोडून घेतले. त्यामुळे मतदारांचा विश्वास ते गमावत आहेत. मला मिळालेल्या तक्रारींनुसार, राज्यातील निवडणुका मोठ्या प्रमाणात निष्पक्ष नव्हत्या. खालच्या पातळीवर पोलिसांचा हस्तक्षेप होता.पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या आंदोलनाबाबत मावळते राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी म्हणाले की, कोणी अपयशी ठरल्यासच आंदोलन सुरू होते. हा एक सर्वमान्य सिद्धांत आहे व तो विविध स्थितींना लागू होतो. राज्य शाळा सेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांनी निदर्शने केली.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी