शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

वायनाड येथील भूस्खलनामधील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ, लष्कर आणि NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 21:30 IST

Kerala Wayanad Landslide: केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच मृतांचा आकडा १०० च्या वर गेला आहे.

केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन वायनाडमधील मेपाड्डी, मुंडक्कल आणि चूरलमाला परिसरामधील अनेक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच मृतांचा आकडा १०० च्या वर गेला आहे. तसेच बचावकार्य जसजसं पुढे जात आहे, तसतशी मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे.

भूस्खलनामुळे या भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. या भीषण दुर्घटनेमुळे केरळ सरकारने दोन दिवसांच्या शोकाची घोषणा केली आहे.  ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक दबलेले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि कुत्र्यांची मदत घेतली जात आहे. 

केरळमधील वायनाडमध्ये पहिल्यांदाच एवढी भीषण आपत्ती आली आहे. कालपर्यंत हिरवळ असलेल्या ठिकाणी सध्या सगळीकडे चिखल आणि मातीचं साम्राज्य दिसत आहे. तर जिथे घरं आणि वस्ती होती. तिथे आता केवळ अवशेष दिसत आहेत. वायनाडमधील बचाव कार्यात तिन्ही सैन्यदलांचे जवान गुंतले आहेत. हवाई दलाने राज्य सरकार आणि एनडीआरएफच्या मदतीसाठी एक एमआय-१७ आणि एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर तैनात केलं आहे. तर लष्कर आणि नौदलाचे पाणबुडेही बचाव कार्यामध्ये गुंतले आहेत.  

टॅग्स :Keralaकेरळlandslidesभूस्खलन