शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

कोर्टाने दिले समुद्रात उभ्या असलेल्या जहाजाला अटक करण्याचे आदेश, नेमका काय प्रकार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:37 IST

Kerala Ship Sank: भारताच्या सागरी हद्दीत खोल समुद्रामध्ये नांगर टाकून उभ्या असलेल्या जहाजाला अटक करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. खरंतर अटकेची कारवाई ही एखाद्या आरोपी व्यक्तीवर होते. मात्र इथे कुणी व्यक्ती आरोपी नसून जाहाजावर ही कारवाई झाल्याने त्याबाबत आश्चर्यं व्यक्त करण्यात येत आहे.

भारताच्या सागरी हद्दीत खोल समुद्रामध्ये नांगर टाकून उभ्या असलेल्या जहाजाला अटक करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. खरंतर अटकेची कारवाई ही एखाद्या आरोपी व्यक्तीवर होते. मात्र इथे कुणी व्यक्ती आरोपी नसून जाहाजावर ही कारवाई झाल्याने त्याबाबत आश्चर्यं व्यक्त करण्यात येत आहे. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर जहाजाला खरोखरच बेड्या ठोकण्यात येणार नाहीत तर  कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत हे जहाज ताब्यात ठेवले जाणार आहे. केरळजवळील समुद्रात काही दिवसांपूर्वी बुडालेल्या जहाजाप्रकरणी केरळ सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी केरळच्या समुद्र किनाऱ्याजवळ एमएससी एल्सा III नावाचं जहाज बुडालं होतं. या जहाजामध्ये ६०० हून अधिक कंटेनर आणि इतर वस्तू तसेच डिझेल भरलेले होते. त्यामुळे समुद्रातील जैवविविधतेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यानंतर या प्रकरणी केरळ सरकारने हायकोर्टात धाव घेतली होती. तसेच या कंपनीची मालक असलेल्या मेडिटेरेनियन शिपिंग कंपनीविरोधात खटला दाखल केला होता. तसेच या प्रकरणी ९ हजार ५३१ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. तसेच नुकसान भरपाई मिळेपर्यंत याच कंपनीच्या एमएससी अकिकेता II या जहाजाला अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. एमएससी अकितेता II हे जहाज सध्या तिरुवनंतपुरम येथील बंदरावर नांगर टाकून उभं आहे. आता सुनावणीनंतर  जहाज कंपनीचे मालक हे ९ हजार ५३१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याबाबत काही हमी देत नाहीत, तोपर्यंत जहाज ताब्यात ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

याबाबत अस्तित्वात असलेल्या सागरी कायद्यांनुसार कुठल्याही जहाजावर अटकेची कारवाई करणे ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामध्ये एखादं कोर्ट किंवा सक्षम प्रशासन कुठलंही जहाज किंवा त्याच्या मालकाविरोधातील सागरी दाव्यांना सुरक्षिक करण्यासाठी संबंधित जहाजाला ताब्यात घेण्यााचे आदेश देऊ शकते. त्याच प्रक्रियेंतर्गत हे जहाज ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, केरळ सरकारने यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेमधून बुडालेल्या जहाजामुळे तेल प्रदूषण झाल्याचा तसेच ६४३ कंटेनरमधील सर्व वस्तूंमुळे प्रदूषण फैलावल्याने नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण ९ हजार ५३१ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ८ हजार ६२६.१२ कोटी रुपये पर्यावरणीय नुकसानासाठी आणि ५२६ कोटी रुपये हे केरळमधील मच्छिमारांनी झालेल्या नुकसानीसाठी मागण्यात आले आहेत.  

टॅग्स :KeralaकेरळCourtन्यायालय