शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

NoroVirus: चिंताजनक! कोरोना संकट कायम असताना नव्या विषाणूची एंट्री; नोरोव्हायरसनं चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 18:35 IST

कोरोना संकटात आता नव्या व्हायरसची एंट्री; केरळात सापडले १३ रुग्ण

थिरुअनंतपुरम: संपूर्ण जग गेल्या पावणे दोन वर्षांपासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. भारतात कोराना रुग्णांची संख्या सध्या कमी आहे. मात्र कोरोनाच्या विळख्यातून देश अद्याप पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. त्यातच आता केरळमध्ये नोरोव्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. वायनाड जिल्ह्यात नोरो विषाणूचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे केरळ सरकारनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

नोरो विषाणू दूषित पाणी आणि खाद्यपदार्थांमधून पसरतो. या विषाणूची लागण झाल्यावर उलटी आणि अतिसाराचा त्रास होतो. दोन आठवड्यांपूर्वी वायनाड जिल्ह्यातील विथिरीजवळ पुकोडे येथे एका पशु वैद्यकीय महाविद्यालयातीय जवळपास १३ विद्यार्थ्यांना नोरो विषाणूची लागण झाली. सुदैवानं या विद्यार्थ्यांमधून कोणालाही विषाणूचा संसर्ग झाला नाही. सध्या या विषाणूबद्दल जनजागृती करण्याचं काम सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

कसा पसरतो विषाणू?कोरोना प्रमाणेज नोरोदेखील संपर्कात आल्यानंतर पसरतो. यामुळे अतिसार, उलटी, पोटदुखीचा त्रास होतो. दूषित पाणी, दूषित अन्न आणि नोरो बाधितांच्या संपर्कात आल्यानं विषाणूची लागण होते. नोरोची लागण झालेल्या काही व्यक्तींच्या माध्यमातूनच त्याची इतरांना बाधा होते. 

पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोरोची लागण परिसराच्या बाहेर वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात आधी झाली. त्यानंतर त्यांचे नमुने घेण्यात आले. ते अलाप्पुझामधील विषाणू विज्ञान संस्थेत पाठवले गेले. राज्याच्या आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.