शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

NoroVirus: चिंताजनक! कोरोना संकट कायम असताना नव्या विषाणूची एंट्री; नोरोव्हायरसनं चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 18:35 IST

कोरोना संकटात आता नव्या व्हायरसची एंट्री; केरळात सापडले १३ रुग्ण

थिरुअनंतपुरम: संपूर्ण जग गेल्या पावणे दोन वर्षांपासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. भारतात कोराना रुग्णांची संख्या सध्या कमी आहे. मात्र कोरोनाच्या विळख्यातून देश अद्याप पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. त्यातच आता केरळमध्ये नोरोव्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. वायनाड जिल्ह्यात नोरो विषाणूचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे केरळ सरकारनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

नोरो विषाणू दूषित पाणी आणि खाद्यपदार्थांमधून पसरतो. या विषाणूची लागण झाल्यावर उलटी आणि अतिसाराचा त्रास होतो. दोन आठवड्यांपूर्वी वायनाड जिल्ह्यातील विथिरीजवळ पुकोडे येथे एका पशु वैद्यकीय महाविद्यालयातीय जवळपास १३ विद्यार्थ्यांना नोरो विषाणूची लागण झाली. सुदैवानं या विद्यार्थ्यांमधून कोणालाही विषाणूचा संसर्ग झाला नाही. सध्या या विषाणूबद्दल जनजागृती करण्याचं काम सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

कसा पसरतो विषाणू?कोरोना प्रमाणेज नोरोदेखील संपर्कात आल्यानंतर पसरतो. यामुळे अतिसार, उलटी, पोटदुखीचा त्रास होतो. दूषित पाणी, दूषित अन्न आणि नोरो बाधितांच्या संपर्कात आल्यानं विषाणूची लागण होते. नोरोची लागण झालेल्या काही व्यक्तींच्या माध्यमातूनच त्याची इतरांना बाधा होते. 

पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोरोची लागण परिसराच्या बाहेर वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात आधी झाली. त्यानंतर त्यांचे नमुने घेण्यात आले. ते अलाप्पुझामधील विषाणू विज्ञान संस्थेत पाठवले गेले. राज्याच्या आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.