शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“‘वंदे भारत’मुळे अन्य ट्रेन खूप लेट होतात, दखल घ्या”; खासदाराचे अश्विनी वैष्णव यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 17:26 IST

Vande Bharat Express Train: वंदे भारत ट्रेनमुळे अन्य सेवांवर परिणाम होत असून, प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार अनेक ठिकाणाहून केली जात आहे.

Vande Bharat Express Train: भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्स्प्रेसची लोकप्रियता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जात असल्याचे दिसत आहे. आताच्या घडीला देशात ३४ मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस चालवल्या जात असून, दिवाळीच्या दरम्यान आणखी ९ मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक सांभाळताना त्याच मार्गांवरील अन्य सेवांवर त्याचा परिणाम होत असून, ट्रेन लेट होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत एका खासदाराने थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये व्यथा मांडत तत्काळ दखल घेण्याचे आवाहन केले आहे. 

वंदे भारतचे वेळापत्रक बदलण्याची मागणी अनेक भागातून केली जात आहे. राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिल्याचे वृत्त आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे इतर ट्रेनच्या वेळेवर परिणाम होत आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक बदलावे

रेल्वे मंत्रालयाने हस्तक्षेप करून वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी या खासदारांनी केली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी उत्तर केरळमधील सेमी हायस्पीड ट्रेनमध्ये अनारक्षित डब्यांची संख्या वाढवण्यात यावी, अशीही मागणी केली आहे. केरळमध्ये वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू करणे ही खरोखरच कौतुकाची बाब आहे, परंतु इतर रेल्वे सेवांच्या वेळेवर आणि विश्वासार्हतेवर होणाऱ्या परिणामांकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. तसेच ट्रेन सेवांच्या हॉल्टचा मुद्दा उपस्थित करत, दररोज प्रवास करणार्‍या आणि प्रवासासाठी सामान्य सेवांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या जीवनमानावर परिणाम होतो, असे खासदारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान, असे दिसते की, अन्य ट्रेनचे अनियोजित हॉल्ट वंदे भारत ट्रेनचा वेग आणि वेळ साधण्यासाठी केले जात आहेत. यामुळे इतर रेल्वे सेवांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. उत्तर केरळमध्ये धावणाऱ्या ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे, त्यामुळे गैरसोयीची आणि असुरक्षित परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी रेल्वे मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करून आणखी अनारक्षित डबे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे. वंदे भारत ट्रेनच्या वेळा बदलाव्यात कराव्यात, जेणेकरून इतर सेवांवर परिणाम होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव