शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

"संविधान जनतेला लुटण्यासाठी आहे", केरळच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 16:29 IST

Kerala minister saji cheriyan criticise constitution : या विधानामुळे पिनाराई विजयन सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांवर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह विविध गटांकडून हल्लाबोल करण्यात येत आहे.

पथनमथिट्टा (केरळ) : केरळचे मंत्री साजी चेरियन यांनी देशाच्या संविधानावर प्रश्न उपस्थित केले आहेत. संविधानावर टीका करताना ते म्हणाले की, संविधान शोषण करणाऱ्यांना माफ करते. देशातील जास्तीत जास्त लोकांना लुटता येईल, अशा पद्धतीने लिहिले आहे. या विधानामुळे पिनाराई विजयन सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांवर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह विविध गटांकडून हल्लाबोल करण्यात येत आहे. तसेच चेरियन यांना बडतर्फ करण्याची मागणी भाजपने केली आहे. तर केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

अलाप्पुझा जिल्ह्यातील चेंगन्नूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले चेरियन हे केरळ सरकारमध्ये सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री आहेत. दक्षिण जिल्ह्यातील मल्लापल्ली येथे नुकत्याच झालेल्या एका राजकीय कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे. मंगळवारी प्रादेशिक दूरचित्रवाणी वाहिन्यांनी चेरियन यांचे भाषण प्रसारित केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, चेरियन यांनी कार्यक्रमात सांगितले की, "मानवतेच्या सुरुवातीपासून शोषण अस्तित्वात आहे. सध्याच्या काळात श्रीमंत लोक जग जिंकत आहेत. सरकारी यंत्रणा या प्रक्रियेला अनुकूल असणे स्वाभाविक आहे. प्रत्येकजण म्हणेल की आमच्याकडे एक चांगले लिहिलेले संविधान आहे, पण मी म्हणेन की देशाचे संविधान अशा प्रकारे लिहिले गेले आहे की, जास्तीत जास्त लोकांना लुटता येईल." चेरियन पुढे म्हणाले की, "ब्रिटिशांनी जे तयार केले, ते भारतीयांनी लिहिले आहे. हे गेल्या 75 वर्षांपासून लागू आहे. देशातील जनतेला लुटण्यासाठी हे सुंदर संविधान आहे, असे मी म्हणेन. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता अशा काही चांगल्या गोष्टी राज्यघटनेत असल्या तरी त्याचा उद्देश सर्वसामान्यांचे शोषण करणे हा आहे."

केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशनसह अनेकांनी चेरियन यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. सतीशन म्हणाले की, 'जर सीएम विजयन यांनी चेरियनवर कारवाई केली नाही तर आम्ही कायद्याचा सहारा घेऊ.' टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, चेरियन यांच्या 'असंवैधानिक' विधानांवर भाजपचे केजे अल्फोन्स यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, "केरळचे कॅबिनेट मंत्री, लोकप्रतिनिधी असूनही त्यांनी संविधानाच्या रक्षणाची शपथ घेतली होती, तरीही ते संविधानाची खिल्ली उडवत आहेत. हे योग्य नाही. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी त्यांना तात्काळ बडतर्फ करावे किंवा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मंत्र्याला बडतर्फ करण्याची शिफारस करावी."

टॅग्स :KeralaकेरळPoliticsराजकारण