शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

काय सांगता? ऊर्जामंत्र्यांनी 30 महिन्यात 34 वेळा बदलले गाडीचे टायर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 10:38 IST

आरटीआयमधून माहिती समोर आल्यानंतर ऊर्जामंत्री सोशल मीडियावर ट्रोल

थिरुअनंतपुरम: रस्त्यांवरचे खड्डे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना होणारा मनस्ताप कायम चर्चेचा विषय ठरतो. खड्ड्यांमुळे जीवाला धोका तर निर्माण होतोच. सोबत गाडीच्या दुरुस्तीचा खर्चदेखील वाढतो. अशाच रस्त्यांचा फटका केरळचे ऊर्जामंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते एम. एम. मणी यांना बसला आहे. मणी यांनी गेल्या 30 महिन्यांत 34 वेळा गाडीचे टायर बदलल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. कोच्चीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या धनराज एस. पिल्लई यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या अर्जाला पर्यावरण मंत्रालयाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यानं उत्तर दिलं आहे. 'मी बऱ्याचदा सामाजिक प्रश्नांवर आरटीआय दाखल करत असतो. मात्र आता दाखल केलेल्या अर्जाचं उत्तर आल्यावर मला धक्काच बसला. मणी यांच्या दोन वर्ष जुन्या गाडीचे टायर इतक्यांदा बदलण्यात आले आहेत की त्याची सर्वसामान्य व्यक्ती कल्पनादेखील करू शकत नाही,' असं पिल्लई म्हणाले. पिल्लई यांनी आरटीआयमधून मिळालेलं उत्तर सोशल मीडियावर शेअर केलं. यानंतर नेटकऱ्यांनी ऊर्जामंत्री मणी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. 'ऊर्जामंत्र्यांची ऊर्जा' अशा शब्दांत अनेकांनी मणी यांची खिल्ली उडवली. त्यांच्याकडे ऊर्जा खातं आहे. त्यामुळे जास्त ऊर्जा तर लागणार ना, मंत्री महोदय रबर उत्पादकांसाठी टायर-योजना चालवण्याचा प्रयत्न करताहेत, अशा प्रतिक्रिया देत अनेकांनी मणी यांना लक्ष्य केलं. तर काहींनी यासाठी रस्त्यांच्या अवस्थेला जबाबदार धरलं. सोशल मीडियावर टायरचा मुद्दा पेटल्यावर एम. एम. मणी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं. 'मी डोंगराळ भागात राहतो. तिथे टायर लवकर खराब होतो. ट्रोल्सना टीका करायची असल्यास त्यांना आनंद घेऊ दे. मात्र या कालावधीत मी तब्बल 1,24,075 किलोमीटर प्रवास केला आहे. यातील बराचसा प्रवास इडुक्कीच्या डोंगराळ भागातून केला आहे. या परिस्थितीत टायर कमी काळ टिकतो, याची अनेकांना कल्पना आहे,' असं मणी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

टॅग्स :Keralaकेरळ