शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

केरळ नरबळीप्रकरण: तेथे २ नव्हे, अनेक महिलांचा बळी? ५ वर्षांत २६ जणी झाल्या बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 05:40 IST

केरळच्या पथनमिट्टा जिल्ह्यातील २ महिलांच्या बळीच्या घटनेच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

तिरुवनंतपुरम: केरळच्या पथनमिट्टा जिल्ह्यातील २ महिलांच्या बळीच्या घटनेच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत असून, आरोपींनी केवळ २ नव्हे, तर अनेक नरबळी दिले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यातील सत्य बाहेर आणण्यासाठी एका आरोपीची जमीन खोदण्याचा निर्णय तपास करणाऱ्या विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) घेतला आहे.

सप्टेंबरमध्ये बेपत्ता झालेल्या २ महिलांचा बळी देण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी मोहंमद शफी, भगवलसिंह आणि त्याची पत्नी लैला या आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी पथनमिथिट्टा येथून बेपत्ता झालेल्या पद्मा आणि रोसलिन यांचा बळी देऊन त्यांच्यासोबत बीभत्स कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणाची चौकशी आता एसआयटीकडे सोपविण्यात आली आहे. मोहंमद शफी ऊर्फ राशिद हा संपूर्ण केरळात फिरून आपली शिकार हेरत होता, असा तपास पथकास संशय आहे. त्याच्या जमिनीत आणखी काही मृतदेह गाडलेले असू शकतात. त्यामुळे त्याच्या जमिनीचे खोदकाम करण्याचा निर्णय तपास पथकाने घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार, मागील ५ वर्षांत पथनमिथिट्टा येथून १२ आणि एर्नाकुलम येथून १४ महिला बेपत्ता झालेल्या आहेत. या सर्व २६ महिलांचा बळी दिला गेला असावा, असा पाेलिसांना दाट संशय आहे. (वृत्तसंस्था)

पद्माचे दागिने गहाण ठेवून पत्नीला दिले पैसे

आरोपी शफी याने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या पत्नीला ४० हजार रुपये दिले होते. हे पैसे त्याने बळी दिलेल्या पद्मा या महिलेचे दागिने गहाण ठेवून आणले होते, असे तपासात आढळून आले आहे. सोने गहाण ठेवणाऱ्या एर्नाकुलम येथील एका दलालास पोलिसांनी अटक केली आहे.

मानवाधिकार आयोगाची नोटीस

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) केरळचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना एक नोटीस बजावली असून या प्रकरणाचा अहवाल ४ आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Keralaकेरळ