शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुलीचे नाव ठेवण्यावरुन तू-तू, मैं-मैं, ३ वर्ष आई-वडिलांत वाद; अखेर हायकोर्टाने केले बारसे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 16:44 IST

या प्रकरणी हायकोर्टाने कुणाच्या बाजूने कौल दिला? मुलीचे नामकरण काय करण्यात आले? जाणून घ्या...

Kerala High Court: देशात विविध प्रकारच्या गोष्टी घडत असतात. अनेकदा न्यायालयांसमोरही चमत्कारिक याचिका दाखल होत असतात. असाच एक अनुभव केरळउच्च न्यायालयाला आला आहे. मुलीचे नाव ठेवण्यावरून आई आणि वडिलांमध्ये एकमत होत नव्हते. मतभेदाचे रुपांतर भांडणात झाले. यामुळे तब्बल ३ वर्ष चिमुकलीचे नामकरण करण्यात आले नाही. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर अखेर उच्च न्यायालयाने या मुलीचे बारसे केले. 

केरळमधील कोच्चीमधील हे प्रकरण आहे. तीन वर्षांच्या मुलीच्या नावावरून पालकांमध्ये वाद सुरू आहे. उच्च न्यायालयात प्रकरण पोहोचल्यानंतर ३० सप्टेंबर रोजी न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. बाळाचे नाव ठेवण्यास उशीर झाल्याने त्याच्या भविष्यावर परिणाम होत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ती मागे पडत चालली आहे. पालकांमधील भांडणापेक्षा मुलांचे कल्याण अधिक महत्त्वाचे आहे, अशी अतिशय महत्त्वाची टिपण्णी उच्च न्यायालयाने यावेळी केली. 

मुलीला शाळेत घालताना नावाचा प्रश्न समोर आला

मुलीचे आई-वडील वेगळे राहतात. आईने शाळा प्रवेशाची तयारी सुरू केली. शाळेने मुलीचा जन्म दाखला मागितला. पण त्यावर नाव नव्हते. अशा परिस्थितीत नावाशिवाय जन्म दाखला स्वीकारण्यास शाळेने नकार दिला. यानंतर आईने रजिस्ट्रारचे कार्यालय गाठले. जन्म प्रमाणपत्रात नाव नोंदवण्यासाठी अर्ज केला. आईने मुलीचे नाव 'पुण्य नायर' असे सांगितले.  रजिस्ट्रार कार्यालयात, नोंदणी करताना दोन्ही पालकांची उपस्थिती आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. यानंतर वडिलांनी मुलीचे नाव 'पद्मा नायर' ठेवावे, असे सांगितले. मात्र, दोघांमध्ये नावावरून सहमती होऊ शकली नाही. 

अखेर उच्च न्यायालयाने केले बारसे!

हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सांगितले की, मुलगी आईसोबत राहते, अशा परिस्थितीत तिने दिलेल्या नावाला महत्त्व दिले पाहिजे. पण हा समाज पितृसत्ताक आहे, त्यामुळे वडिलांचे नावही असायला हवे. मुलीचे नाव 'पुण्य' ठेवण्यात येईल. मात्र आडनाव म्हणून वडिलांचे नाव लावावे, असा आदेश न्यायालयाने दिला.

 

टॅग्स :KeralaकेरळHigh Courtउच्च न्यायालय