शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

केरळमध्ये महिलांनी खणल्या 190 विहीरी

By admin | Updated: July 10, 2017 10:33 IST

केरळमध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तेथिल महिलांनी पुढाकार घेतला आहे

ऑनलाइन लोकमत

तिरूअनंतपूरम, दि. 10- देशातील अनेक लहान मोठ्या गावात अजूनही पाणी टंचाईचा सामना तेथिल लोकांना करावा लागतो. हंडाभऱ पाणी मिळावं यासाठी अनेक मैलांची पायपीटही करावी लागते. पाणी टंचाईच्या या समस्येवर मात करण्यासाठी अनेक पाऊलं सरकारकडून उचलली जातात पण विशेष म्हणजे गावातील स्थानिक नागरीक पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. केरळमध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तेथिल महिलांनी पुढाकार घेतला आहे. पाण्याची चणचण बंद व्हावी यासाठी  केरळ मधील महिलांनी गावात चक्क 190 विहीरी खणल्या असल्याची माहिती समोर येते आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील गावात तब्बल ३०० महिलांनी एकत्र येऊन हातात कुदळ घेऊन विहीर खणायला सुरूवात केली. फक्त पुरूष मेहनतीची कामं करू शकतात ही मक्तेदारी मोडत महिलांनी मेहनतीचं काम करून सगळ्यांसमोर नवा आदर्श उभा केला आहे. महिलांच्या या कामगिरीचं तेथिल नागरीकांसह पंचायत समितीकडूनही कौतुक केलं जातं आहे. या गावात नेहमीच दुष्काळाची झळ तेथिल लोकांना सोसावी लागते. तसंच पाणी टंचाईचा सामनासुद्धा करावा लागतो.
 
पाणी मिळवण्यासाठी कितीतरी फूट खोल खड्ड्यात फक्त एका बांबूच्या साहाय्याने या महिलांना उतरावं लागलं होतं. अनेक अडचणींना सामोर जावं लागत असतानाही जिद्द न सोडता महिलांनी पाणी टंचाईवर मात केली. गावात पाणी नसल्याची ओरड न करता त्या महिलांनी कष्टाने पाणी मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्या प्रयत्नात त्यांना यश आलं.  
 
आणखी वाचा
 

कर्जमाफीचा लाभ ३६ लाख शेतकऱ्यांना

 

सुरक्षेच्या कारणाने व्हीआयपींची खासगी हेलिकॉप्टर सेवा स्थगित

‘मातोश्री’ची दानपेटी गुरुदक्षिणेच्या प्रतीक्षेत!

या 300 महिलांच्या समूहात ३५ पासून ते  ७० वर्षीय महिलांचा समावेश आहे. या समूहाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत हे काम केलं आहे. या गावात फक्त विहीर आणि तलाव हेच पाणी मिळविण्याचं साधन आहे. कोणत्याही प्रशिक्षण आणि मशीनरीशिवाय 10 ते 12 फूट खोल विहीरी खणण्याचं काम या महिलांनी केलं आहे.