शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात केरळ सरकारही गेले सुप्रीम कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 03:21 IST

मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याने व्यक्तीप्रमाणे आपल्याला रिट याचिका करता येणार नाही हे लक्षात घेऊन केरळने राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ चा आधार घेत केंद्र सरकारच्या विरोधात दिवाणी दावा दाखल केला आहे.

नवी दिल्ली : धार्मिक छळामुळे पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या शेजारी देशांतून आलेल्या मुस्लिमेतर स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देणे सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात केरळ सरकारनेही मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

केरळमधील सत्ताधारी डाव्या आघाडीने या कायद्याच्या विरोधात सातत्याने खंबीर भूमिका घेतली असून केंद्र सरकारने हा कायदा मागे घ्यावा, असा ठरावही त्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने अधिसूचना काढून १० जानेवारीपासून हा कायदा देशभर लागू केल्याने केरळ सरकारने आता त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या आणखीही सहा-सात राज्यांनी ‘सीएए’ न राबविण्याची भूमिका घेतली असली तरी त्याविरुद्ध न्यायालयात जाणारे केरळ हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे.

सन २०११ मध्ये मध्यप्रदेश सरकार विरुद्ध केंद्र सरकार या दाव्यात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या मुद्याचे नकारात्मक उत्तर दिले होते. नंतर सन २०१५ मध्ये झारखंड सरकार विरुद्ध बिहार सरकार या दाव्यात पुन्हा हाच मुद्दा उपस्थित झाला. तो दावा ऐकणाऱ्या खंडपीठास आधीच्या खंडपीठाने नोंदविलेले मत पटले नाही. मात्र, मूळ निकाल देणारे व असहमत होणारे अशी दोन्ही खंडपीठे प्रत्येकी दोन न्यायाधीशांची असल्याने हा विषय अधिक मोठे खंडपीठ नेमण्यासाठी सरन्यायाधीशांकडे सोपविण्यात आला. तसे मोठे खंडपीठ अद्याप नेमले गेलेले नाही.

परिणामी, अनुच्छेद १३१ चा अधिकार वापरून केंद्राने केलेला कायदा न्यायालय रद्द करू शकते का, हा विषय अनिर्णीत आहे. तरीही असहमती झालेल्या दोनपैकी एका खंडपीठाने दिलेल्या अनुकूल मताचा आधार घेत केरळ सरकारने हा दावा दाखल केला आहे.‘सीएए’विरोधात ६0 याचिका; २२ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी‘सीएए’च्या विरोधात याआधीही अनेक व्यक्ती व संस्थांनी सुमारे ६० याचिका केल्या असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात २२ जानेवारीस सुनावणी व्हायची आहे. आधीच्या याचिकांमध्ये असलेलेच सर्व मुद्दे मांडून केरळ सरकारने हा कायदा घटनाबाह्य ठरवून रद्द करण्याची मागणी केली आहे.

मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याने व्यक्तीप्रमाणे आपल्याला रिट याचिका करता येणार नाही हे लक्षात घेऊन केरळने राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ चा आधार घेत केंद्र सरकारच्या विरोधात दिवाणी दावा दाखल केला आहे.

अनुच्छेद १३१ अन्वये केंद्र व राज्य किंवा दोन राज्यांमधील वादात निवाडा करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयास आहे. मात्र, या अधिकाराचा वापर करून एखाद्या राज्याने केलेल्या दिवाणी दाव्यात सर्वोच्च न्यायालय केंद्राने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य ठरवून रद्द करू शकते का, या मुद्याचा निर्णायक फैसला अद्याप व्हायचा आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक