शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

Kerala Floods : आता आव्हान लाखो लोकांच्या पुनर्वसनाचे; रोगराई रोखण्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 07:05 IST

१० लाखांहून अधिक निवारा शिबिरात; ३७५ हून अधिक बळी

तिरुवनंतपुरम : गेल्या बारा दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाल्याने केरळला दिलासा मिळाला आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे १० लाखांहून अधिक बेघर लोक निवारा शिबिरांत आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान आता सरकारपुढे आहे. पूर ओसरल्यानंतर रोगराईवर नियंत्रण राखण्यासाठीही तातडीने पावले उचलावी लागतील.या पावसाने ३७५ हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.पूर ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी माणसे व जनावरांचे मृतदेह सापडत असून, त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरु आहे. रोगराई टाळण्यासाठी सफाई सुरु केली आहे. सर्व शाळा व महाविद्यालये २९ आॅगस्टपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. अनेक शाळा व महाविद्यालयांतच निवारा शिबिरे सुरू आहेत. लोक घरी जाईपर्यंत त्या बंदच ठेवाव्या लागतील.देशभरातून मदतीचा ओघ सुरू असून, मुंबईहून आयएनएस दीपक जहाजातून पिण्याचे पाणी व १८ टन अन्नधान्य कोची पोहचले. कोची नौदलाचा हवाई तळ प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला आहे. विमानतळाच्या धावपट्टीवरच पाणी शिरल्याने तो बंदच आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशही पूरग्रस्तांना मदत करणार आहेत, असे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी सांगितले. अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी याआधीच १ कोटी पूरग्रस्तांसाठी दिले आहेत. केरळमध्ये पुरामुळे विजेचे खांबच वाहून गेल्याने घरे अंधारात आहेत. त्यामुळे केरळला आता कपडे, अन्नधान्याची नव्हे तर हजारो इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार यांची गरज असून या व्यावसायिकांनी स्वयंसेवी वृत्तीने केरळ यावे, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री ए. सी. मोईद्दिन यांनी केले आहे. मुलीची मदत : तामिळनाडूतील विल्लुपुरमच्या अनुप्रिया या ९ वर्षीय मुलीने सायकलीसाठी गेली चार वर्षे जमविलेले नऊ हजार रुपये केरळच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहेत. हे वृत्त कळताच, एका सायकल कंपनीने तिला सायकल भेट देण्याचे ठरविले आहे. अमेरिकेतील सेवा इंटरनॅशनल संस्थेने पूरग्रस्तांसाठी १० हजार डॉलर्स जमा केले असून, १ लाख डॉलर्स निधी उभारण्याचा निर्धार केला आहे.केरळमधील काही लाख लोक परदेशांत, विशेषत: आखाती देशांत नोकरी करतात. त्यांनी तिथे पै-पै वाचवून आपल्या गावी उत्तम व पक्की घरे बांधली. पण पावसाने तीही उद्ध्वस्त झाली आहेत. घरांतील सामान वाहून गेले आहे, तर लाखो घरांत अद्याप वीज नाही, पिण्याचे पाणी नाही आणि पाण्याबरोबच घरात इतकी घाण शिरली आहे, की ती स्वच्छ करण्यास बराच कालावधी जाईल. लोकांना घरी जाण्याची इच्छा असली तरी ती सध्या तरी राहण्यायोग्य राहिलेली नाहीत.निराशेने आत्महत्यापुराच्या पाण्यामुळे आपली इयत्ता १२ वीची प्रमाणपत्रे पूर्णपणे खराब झाल्याचे दु:ख सहन न होऊन कोळिकोड जिल्ह्यातील कारनतूर गावच्या कैलाश नावाच्या १९ वर्षीय विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. त्याच्या घरात पुराचे पाणी शिरले होते.कर्नाटकात लोक बेघरकेरळप्रमाणेच पावसाचा तडाखा कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यालाही बसला असून तिथे आठ बळी गेले आहेत, तर ४ हजारांपेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत. त्यांच्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणांनी मदतकार्य हाती घेतले आहे. कोडगू जिल्ह्यात काही ठिकाणी दरडी कोसळल्या असून त्यामुळे शेकडो लोक अडकून पडले आहेत. पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून ८००पेक्षा जास्त घरे कोसळली आहेत.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळ