शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Kerala Floods : आता आव्हान लाखो लोकांच्या पुनर्वसनाचे; रोगराई रोखण्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 07:05 IST

१० लाखांहून अधिक निवारा शिबिरात; ३७५ हून अधिक बळी

तिरुवनंतपुरम : गेल्या बारा दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाल्याने केरळला दिलासा मिळाला आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे १० लाखांहून अधिक बेघर लोक निवारा शिबिरांत आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान आता सरकारपुढे आहे. पूर ओसरल्यानंतर रोगराईवर नियंत्रण राखण्यासाठीही तातडीने पावले उचलावी लागतील.या पावसाने ३७५ हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.पूर ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी माणसे व जनावरांचे मृतदेह सापडत असून, त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरु आहे. रोगराई टाळण्यासाठी सफाई सुरु केली आहे. सर्व शाळा व महाविद्यालये २९ आॅगस्टपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. अनेक शाळा व महाविद्यालयांतच निवारा शिबिरे सुरू आहेत. लोक घरी जाईपर्यंत त्या बंदच ठेवाव्या लागतील.देशभरातून मदतीचा ओघ सुरू असून, मुंबईहून आयएनएस दीपक जहाजातून पिण्याचे पाणी व १८ टन अन्नधान्य कोची पोहचले. कोची नौदलाचा हवाई तळ प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला आहे. विमानतळाच्या धावपट्टीवरच पाणी शिरल्याने तो बंदच आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशही पूरग्रस्तांना मदत करणार आहेत, असे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी सांगितले. अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी याआधीच १ कोटी पूरग्रस्तांसाठी दिले आहेत. केरळमध्ये पुरामुळे विजेचे खांबच वाहून गेल्याने घरे अंधारात आहेत. त्यामुळे केरळला आता कपडे, अन्नधान्याची नव्हे तर हजारो इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार यांची गरज असून या व्यावसायिकांनी स्वयंसेवी वृत्तीने केरळ यावे, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री ए. सी. मोईद्दिन यांनी केले आहे. मुलीची मदत : तामिळनाडूतील विल्लुपुरमच्या अनुप्रिया या ९ वर्षीय मुलीने सायकलीसाठी गेली चार वर्षे जमविलेले नऊ हजार रुपये केरळच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहेत. हे वृत्त कळताच, एका सायकल कंपनीने तिला सायकल भेट देण्याचे ठरविले आहे. अमेरिकेतील सेवा इंटरनॅशनल संस्थेने पूरग्रस्तांसाठी १० हजार डॉलर्स जमा केले असून, १ लाख डॉलर्स निधी उभारण्याचा निर्धार केला आहे.केरळमधील काही लाख लोक परदेशांत, विशेषत: आखाती देशांत नोकरी करतात. त्यांनी तिथे पै-पै वाचवून आपल्या गावी उत्तम व पक्की घरे बांधली. पण पावसाने तीही उद्ध्वस्त झाली आहेत. घरांतील सामान वाहून गेले आहे, तर लाखो घरांत अद्याप वीज नाही, पिण्याचे पाणी नाही आणि पाण्याबरोबच घरात इतकी घाण शिरली आहे, की ती स्वच्छ करण्यास बराच कालावधी जाईल. लोकांना घरी जाण्याची इच्छा असली तरी ती सध्या तरी राहण्यायोग्य राहिलेली नाहीत.निराशेने आत्महत्यापुराच्या पाण्यामुळे आपली इयत्ता १२ वीची प्रमाणपत्रे पूर्णपणे खराब झाल्याचे दु:ख सहन न होऊन कोळिकोड जिल्ह्यातील कारनतूर गावच्या कैलाश नावाच्या १९ वर्षीय विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. त्याच्या घरात पुराचे पाणी शिरले होते.कर्नाटकात लोक बेघरकेरळप्रमाणेच पावसाचा तडाखा कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यालाही बसला असून तिथे आठ बळी गेले आहेत, तर ४ हजारांपेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत. त्यांच्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणांनी मदतकार्य हाती घेतले आहे. कोडगू जिल्ह्यात काही ठिकाणी दरडी कोसळल्या असून त्यामुळे शेकडो लोक अडकून पडले आहेत. पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून ८००पेक्षा जास्त घरे कोसळली आहेत.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळ