शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Kerala Floods : आता आव्हान लाखो लोकांच्या पुनर्वसनाचे; रोगराई रोखण्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 07:05 IST

१० लाखांहून अधिक निवारा शिबिरात; ३७५ हून अधिक बळी

तिरुवनंतपुरम : गेल्या बारा दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाल्याने केरळला दिलासा मिळाला आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे १० लाखांहून अधिक बेघर लोक निवारा शिबिरांत आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान आता सरकारपुढे आहे. पूर ओसरल्यानंतर रोगराईवर नियंत्रण राखण्यासाठीही तातडीने पावले उचलावी लागतील.या पावसाने ३७५ हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.पूर ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी माणसे व जनावरांचे मृतदेह सापडत असून, त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरु आहे. रोगराई टाळण्यासाठी सफाई सुरु केली आहे. सर्व शाळा व महाविद्यालये २९ आॅगस्टपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. अनेक शाळा व महाविद्यालयांतच निवारा शिबिरे सुरू आहेत. लोक घरी जाईपर्यंत त्या बंदच ठेवाव्या लागतील.देशभरातून मदतीचा ओघ सुरू असून, मुंबईहून आयएनएस दीपक जहाजातून पिण्याचे पाणी व १८ टन अन्नधान्य कोची पोहचले. कोची नौदलाचा हवाई तळ प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला आहे. विमानतळाच्या धावपट्टीवरच पाणी शिरल्याने तो बंदच आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशही पूरग्रस्तांना मदत करणार आहेत, असे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी सांगितले. अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी याआधीच १ कोटी पूरग्रस्तांसाठी दिले आहेत. केरळमध्ये पुरामुळे विजेचे खांबच वाहून गेल्याने घरे अंधारात आहेत. त्यामुळे केरळला आता कपडे, अन्नधान्याची नव्हे तर हजारो इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार यांची गरज असून या व्यावसायिकांनी स्वयंसेवी वृत्तीने केरळ यावे, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री ए. सी. मोईद्दिन यांनी केले आहे. मुलीची मदत : तामिळनाडूतील विल्लुपुरमच्या अनुप्रिया या ९ वर्षीय मुलीने सायकलीसाठी गेली चार वर्षे जमविलेले नऊ हजार रुपये केरळच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहेत. हे वृत्त कळताच, एका सायकल कंपनीने तिला सायकल भेट देण्याचे ठरविले आहे. अमेरिकेतील सेवा इंटरनॅशनल संस्थेने पूरग्रस्तांसाठी १० हजार डॉलर्स जमा केले असून, १ लाख डॉलर्स निधी उभारण्याचा निर्धार केला आहे.केरळमधील काही लाख लोक परदेशांत, विशेषत: आखाती देशांत नोकरी करतात. त्यांनी तिथे पै-पै वाचवून आपल्या गावी उत्तम व पक्की घरे बांधली. पण पावसाने तीही उद्ध्वस्त झाली आहेत. घरांतील सामान वाहून गेले आहे, तर लाखो घरांत अद्याप वीज नाही, पिण्याचे पाणी नाही आणि पाण्याबरोबच घरात इतकी घाण शिरली आहे, की ती स्वच्छ करण्यास बराच कालावधी जाईल. लोकांना घरी जाण्याची इच्छा असली तरी ती सध्या तरी राहण्यायोग्य राहिलेली नाहीत.निराशेने आत्महत्यापुराच्या पाण्यामुळे आपली इयत्ता १२ वीची प्रमाणपत्रे पूर्णपणे खराब झाल्याचे दु:ख सहन न होऊन कोळिकोड जिल्ह्यातील कारनतूर गावच्या कैलाश नावाच्या १९ वर्षीय विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. त्याच्या घरात पुराचे पाणी शिरले होते.कर्नाटकात लोक बेघरकेरळप्रमाणेच पावसाचा तडाखा कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यालाही बसला असून तिथे आठ बळी गेले आहेत, तर ४ हजारांपेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत. त्यांच्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणांनी मदतकार्य हाती घेतले आहे. कोडगू जिल्ह्यात काही ठिकाणी दरडी कोसळल्या असून त्यामुळे शेकडो लोक अडकून पडले आहेत. पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून ८००पेक्षा जास्त घरे कोसळली आहेत.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळ