शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

केरळात १.२४ लाख विद्यार्थ्यांना नाही जात-धर्म, शालेय शिक्षणापासूनच जात-धर्मनिरपेक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 03:45 IST

मात्र हे यंदा पहिल्यांदाच घडलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक विद्यार्थी आपला धर्म व जात यांची माहिती देत नाहीत

कोची : प्रत्येक शैक्षणिक वर्षात केरळमध्ये खासगी आणि सरकारी शाळांमध्ये दाखल होणारी अधिकाधिक मुले आम्ही कोणत्या विशिष्ट धर्माची किंवा जातीची नाहीत, असे सांगत आहेत. यावर्षी केरळमध्ये १.२४ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना भरावयाच्या अर्जातील जात व धर्माचा रकाना रिकामा सोडून दिला, असे सरकारने जाहीर केले आहे. याचाच अर्थ ती मुले खऱ्या अर्थाने सेक्युलर वा जात तसेच धर्मनिरपेक्ष आहेत, असा लावला जात आहे.राज्य विधानसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात बुधवारी प्रश्नोत्तर तासात वामनपूरमचे आमदार डी. के. मुरली (सीपीएम) यांनी प्रवेश घेताना किती विद्यार्थ्यांनी जात व धर्माच्या माहितीचा रकाना रिकामा सोडला, असे विचारले होते. या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्री सी. रवींद्रनाथ म्हणाले की, पहिली ते दहावीच्या १,२३,६३० विद्यार्थ्यांनी आम्ही कोणत्याही जातीचे वा धर्माचे नसल्याचे जाहीर केले. (वृत्तसंस्था)ना तणाव, ना विद्वेषमात्र हे यंदा पहिल्यांदाच घडलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक विद्यार्थी आपला धर्म व जात यांची माहिती देत नाहीत, असे दिसून आले आहे. आम्ही कोणत्याही विशिष्ट जात वा धर्माचे नाही, असे शाळेतील विद्यार्थीही उघडपणे सांगतात. केरळमध्ये हिंदूंप्रमाणेच मुस्लीम व ख्रिश्चन लोकसंख्या मोठी आहे. तरीही तिथे धार्मिक वा जातीय तणाव शक्यतो निर्माण होत नाही. त्याचेही जात वाधर्म न मानणे हेच कारण आहे, यामुळेच भाजपाला अद्याप इथे पाय रोवता आलेले नाहीत, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.