शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

दिल्लीत आता शाजिया इल्मी विरुद्ध केजरीवाल सामना

By admin | Updated: November 8, 2014 03:47 IST

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे जानेवारी-फेब्रुवारीत होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आपल्या ‘मिशन ५०’ वर आता शेवटचा हात फिरवीत आहेत

हरीश गुप्ता, नवी दिल्लीभाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे जानेवारी-फेब्रुवारीत होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आपल्या ‘मिशन ५०’ वर आता शेवटचा हात फिरवीत आहेत. नवी विधानसभा १७ फेब्रुवारीपर्यंत स्थापन होणार आहे आणि यावेळी कोणतीही चूक न करता ५० पेक्षा जागा मिळविण्याचे लक्ष्य भाजपाने निर्धारित केले आहे.उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या कोणत्याही खासदाराला तिकीट न देण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, मीनाक्षी लेखी, दिवंगत साहिबसिंग वर्मा यांचे चिरंजीव परवेश वर्मा आणि राज्यसभा सदस्य विजय गोयल या नेत्यांनी राज्याच्या राजकारणात परतण्याची आपली इच्छा याआधीच जाहीर केलेली होती. परंतु आपापल्या लोकसभा मतदारसंघावरच लक्ष केंद्रित करण्याचे आणि पक्षाचे तिकीट मिळालेल्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे या नेत्यांना सांगण्यात आले आहे.आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून यावेळी विजेंद्र गुप्ता यांच्याऐवजी आपच्या माजी नेत्या शाजिया इल्मी यांना भाजपाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, असे या सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने केजरीवाल यांच्या विरुद्ध विजेंद्र गुप्ता यांना मैदानात उतरविले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपच्या उमेदवार राहिलेल्या शाजिया इल्मी केवळ ३०० मतांनी पराभूत झाल्या होत्या. केजरीवाल यांना टक्कर देऊ शकेल, असा एकही उमेदवार सध्या तरी भाजपाजवळ नाही. किरण बेदी यांनी केजरीवालांविरुद्ध लढण्यास आधीच नकार दिलेला आहे.आपण शाजिया इल्मी यांच्या बाजूने प्रचार करू, असे कुमार विश्वास यांनी भाजपा नेत्यांना कळविल्याचे वृत्त आहे. आपचे किमान अर्धा डझन आमदार तिकीट मिळण्यासाठी भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याचे कळते. भाजपाने दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा जिंकल्या असल्या तरी मागील १५ वर्षांपासून पक्ष विधानसभा निवडणुकीत मात्र सतत पराभूत होत आला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघांपैकी ६० विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती. ही आघाडी आणि सध्या देशात दिसत असलेली मोदी लाट यावर स्वार होऊन यावेळी आपले ‘मिशन ५०’ यशस्वी होणारच, असा विश्वास भाजपाला वाटत आहे.