शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

केजरीवालांनी विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडली, म्हणाले...

By मोरेश्वर येरम | Updated: December 17, 2020 17:31 IST

"केंद्र सरकार आणखी किती जणांचा बळी घेणार आहे? आतापर्यंत २० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा यात बळी गेला आहे."

नवी दिल्लीदिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केजरीवालांनी आपल्या भाषणात भर विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडून आपला निषेध व्यक्त केला. 

"केंद्र सरकार आणखी किती जणांचा बळी घेणार आहे? आतापर्यंत २० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा यात बळी गेला आहे. प्रत्येक शेतकरी आज भगतसिंग बनून आंदोलनाला बसला आहे. या सरकारने इंग्रजांपेक्षाही खालची पातळी गाठण्याचं काम करु नये", अशी जोरदार टीका केजरीवाल यांनी केली. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही केजरीवालांनी निशाणा साधला. "आदित्यनाथ यांनी बरेली येथील रॅलीमध्ये लोकांना कृषी कायद्याचे फायदे सांगत होते. तुमची जमीन जाणार नाही, बाजार बंद होणार नाही असं सांगत होते. पण या कायद्याने फायदा काय होणार आहे ते भाजपवाल्यांनी सांगावं. देशात कुठेही शेतकऱ्यांना माल विकता येईल हा एकच रेटा भाजपवाले लावत आहेत", असं केजरीवाल म्हणाले. 

"केवळ हवेतल्या गोष्टी करुन काही उपयोग नाही. खरंतर शेतकरी नव्हे, तर भाजपवालेच गोंधळलेले आहेत. भाजपवाल्यांना अफीम देण्यात आली आहे", असा शाब्दिक वार केजरीवाल यांनी केला. 

कोरोना काळात अद्यादेश का?"सुप्रीम कोर्टात आमच्या वकीलाने कृषी कायद्याप्रकरणी केंद्र सरकारच दोषी असल्याचं म्हटलं. कोरोना काळात अद्यादेश जारी करण्याची काय गरज होती? राज्यसभेतही कोणतंही मतदान न घेता तिनही कायदे मंजूर कसे करुन घेतले गेले?", असे सवाल उपस्थित करत केजरीवाल यांनी कृषी कायदे हे भाजपने निवडणुकीचा फंड जमा करण्यासाठी लागू केले असल्याचा आरोप केला. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल