शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

केजरीवालांनी विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडली, म्हणाले...

By मोरेश्वर येरम | Updated: December 17, 2020 17:31 IST

"केंद्र सरकार आणखी किती जणांचा बळी घेणार आहे? आतापर्यंत २० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा यात बळी गेला आहे."

नवी दिल्लीदिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केजरीवालांनी आपल्या भाषणात भर विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडून आपला निषेध व्यक्त केला. 

"केंद्र सरकार आणखी किती जणांचा बळी घेणार आहे? आतापर्यंत २० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा यात बळी गेला आहे. प्रत्येक शेतकरी आज भगतसिंग बनून आंदोलनाला बसला आहे. या सरकारने इंग्रजांपेक्षाही खालची पातळी गाठण्याचं काम करु नये", अशी जोरदार टीका केजरीवाल यांनी केली. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही केजरीवालांनी निशाणा साधला. "आदित्यनाथ यांनी बरेली येथील रॅलीमध्ये लोकांना कृषी कायद्याचे फायदे सांगत होते. तुमची जमीन जाणार नाही, बाजार बंद होणार नाही असं सांगत होते. पण या कायद्याने फायदा काय होणार आहे ते भाजपवाल्यांनी सांगावं. देशात कुठेही शेतकऱ्यांना माल विकता येईल हा एकच रेटा भाजपवाले लावत आहेत", असं केजरीवाल म्हणाले. 

"केवळ हवेतल्या गोष्टी करुन काही उपयोग नाही. खरंतर शेतकरी नव्हे, तर भाजपवालेच गोंधळलेले आहेत. भाजपवाल्यांना अफीम देण्यात आली आहे", असा शाब्दिक वार केजरीवाल यांनी केला. 

कोरोना काळात अद्यादेश का?"सुप्रीम कोर्टात आमच्या वकीलाने कृषी कायद्याप्रकरणी केंद्र सरकारच दोषी असल्याचं म्हटलं. कोरोना काळात अद्यादेश जारी करण्याची काय गरज होती? राज्यसभेतही कोणतंही मतदान न घेता तिनही कायदे मंजूर कसे करुन घेतले गेले?", असे सवाल उपस्थित करत केजरीवाल यांनी कृषी कायदे हे भाजपने निवडणुकीचा फंड जमा करण्यासाठी लागू केले असल्याचा आरोप केला. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल