शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

खेतान यांच्या राजीनाम्यानंतर केजरीवाल टार्गेट, कुमार विश्वासांचे 'चँदा ट्विट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 17:40 IST

आम आदमी पक्षाला गळती लागल्यानंतर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सोशल मीडियातून चौफेर टीका होत आहे. आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर आपचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला रामराम करणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू आप नेते कुमार विश्वास यांनी सर्वप्रथम केजरीवालांना बाय केला होता. त्यानंतर, आपचे प्रवक्ते आशुतोष यांनीही काही दिवसांपूर्वी पक्षातील आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, आता आशिष खेतान यांनीही पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे कळवले आहे. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट रोजीच खेतान यांनी याबाबतचा मेल पक्षश्रेष्ठींकडे पाठवला होता.

 

आम आदमी पक्षाला गळती लागल्यानंतर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सोशल मीडियातून चौफेर टीका होत आहे. आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर आपचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. तर खेतान यांच्या राजीनाम्यानंतरही विश्वास यांनी केजरीवालांना लक्ष्य केले आहे. 'हम तो चँद्र गुप्त बनाने निकले थे, हमे क्या पता था चँदा गुप्ता बन जाएगा' असे ट्विट कुमार विश्वास यांनी केले आहे. आप पक्षाला मिळणाऱ्या गुप्त चंदा (निधी) वरुन विश्वास यांनी केजरीवालांना टार्गेट केले आहे. तर प्रसिद्ध वकिल आणि आपचे जुने सहकारी प्रशांत भूषण यांनीही केजरीवालांवर निशाणा साधला आहे. काही लोकांनी महान आदर्शांचा उद्देश ठेवून आम आदमी पक्षाची स्थापना केली, पण, कडवटपणामुळे त्यांच्या सूचनांना दुर्लक्ष केलं जात आहे. आपची स्थापना म्हणजे एक मोठा आशावाद होता. मात्र, एका व्यक्तीच्या बेईमान महत्वकांक्षा आणि दूरदृष्टीच्या कमतरतेमुळे सर्वकाही नष्ट झाले आहे. एखाद्या संस्थेला कशाप्रकारे नेस्तनाबूत करावे, याचे उदाहरण (केस स्टडी) म्हणजे आप असल्याचे भूषण यांनी ट्विट केले आहे. 

दरम्यान, एका व्यक्तीने ट्विट करताना, शांति भूषण, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, अॅडमिरल रामदास, अंजली दमानिया, मेघा पाटकर, मयंक गांधी, आनंद कुमार, कुमार विश्वास, आशुतोष, आशीष खेतान, सुखपाल खैरा, धर्मवीर गांधी हे सर्व चुकीचे आणि सत्तेचे लालची. केवळ एक आमचे युगपुरुष पार्टी संयोजक आणि मुख्यमंत्री यांनाच सत्तेचं लालच नाही, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीResignationराजीनामा