शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

केजरीवाल म्हणतात, निवडणूक आयोग धृतराष्ट्र तर भाजपा दुर्योधन

By admin | Updated: April 10, 2017 20:10 IST

मतदान यंत्रातील फेरफाराच्या मुद्याला पुन्हा हात घालताना केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाची तुलना धृतराष्ट्राशी तर भाजपाची तुलना दुर्योधनाशी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 -  आप आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदी केजरीवाल यांनी मतदान यंत्रांवरून निवडणूक आयोग आणि भाजपावर टीका करणे सुरूच ठेवले आहे. मतदान यंत्रातील  फेरफाराच्या मुद्याला पुन्हा हात घालताना केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाची तुलना धृतराष्ट्राशी तर भाजपाची तुलना दुर्योधनाशी केली आहे. 
निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करताना केजरीवाल म्हणाले की, "निवडणूक आयोगाने काहीही करून भाजपाला निवडणून देण्याचा विडा चलला आहे. मतदान यंत्रात गडबड असल्याची नवनवी प्रकरणे समोर येत आहेत. पण त्याची चौकशी न करता निवडणूक आयोगाकडून शंकांना जन्म दिला जात आहे." गेल्या काही काळापासून केजरीवाल मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप सातत्याने करत आहेत. पण निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात फेरफार होणे शक्य नसल्याचे सांगून केजरीवाल यांचे आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत. 
एमसीडी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधिक केले. त्यावेळी केजरीवाल यांनी मतदान यंत्रात गडबड झाल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. निवडणूक आयोग धृतराष्ट्र बनला आहे आणि साम, दाम, दंड, भेद वापरून आपला पुत्र असलेल्या भाजपाला कोणत्याही किमतीवरी विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.काल देशभरात पोटनिवडणुका झाल्या. त्यात राजस्थानमधील धौलपूरमध्ये 18 मतदान यंत्रात फेरफार झाल्याचे दिसून आले. इव्हीएमच्या प्रोग्रॅंमिंगमध्ये गडबड झाली आहे. मशिनीचे कोड बदलले. कुणी, कधी आणि का बदलले याबाबत शंका येत आहे." 
मतदारयंत्रातील फेरफारावरून गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर चौफेर आरोप करत असलेल्या अरविंद केजरीवाल यांचे आव्हान निवडणूक आयोगाने स्वीकारले  होते. केजरीवाल यांनी मतदान यंत्रात फेरफार झाल्याचे सिद्ध करून दाखवावेच, असे प्रतिआव्हान निवडणूक आयोगाने दिले होते.