शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

हिंसाचाराबाबत केजरीवाल-मोदी यांच्यात चर्चा, मदतकार्याविषयी केली सल्लामसलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 04:22 IST

दिल्लीत हिंसाचार करणाऱ्या आणि त्याला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मंगळवारी केली.

नवी दिल्ली : दिल्लीत हिंसाचार करणाऱ्या आणि त्याला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मंगळवारी केली. केजरीवाल यांनी संसद भवनात पंतप्रधानांची भेट घेतली आणि हिंसाचारग्रस्तांना मदत करण्याबाबतही सल्लामसलत केली.मात्र हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या प्रक्षोभक विधाने करणाऱ्यांवर कारवाईबद्दल मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्रीपदी तिसºयांदा निवडून आल्यानंतर केजरीवाल यांनी पहिल्यांदाच पंतप्रधानांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास त्या दोघांनी दिल्लीतील सध्याची परिस्थिती आणि घ्यावयाची काळजी यावर चर्चा केली.काही दिवसांपूर्वीच त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर केजरीवाल म्हणाले की, दिल्ली पोलीस सध्या अधिक सक्रिय आहेत. यापूर्वी दिल्ली पोलीस सतर्क राहिले असते तरी दिल्लीत ही स्थिती उद्भवली नसती आणि झालेले नुकसान टाळता आले असते.दंगलीनंतर दिल्लीत अनेक अफवा पसरविल्या जात असून, यामुळे घाबरून अनेक लोक घरे सोडून जात आहेत. या अफवांवर कसे नियंत्रण आणता येईल, यावरही आमच्यात चर्चा झाली. हिंसाचारामध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी आणि दिल्लीत यापुढे असे प्रकार पुन्हा घडू नयेत, याची काळजी घ्यायला हवी, असे पंतप्रधान म्हणाल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.>भाजप नेत्यांची विधानेभाजपच्या नेत्यांनी प्रक्षोभक विधाने केल्याने दिल्लीतील दंगल होण्यास कारणीभूत ठरली. यावर पंतप्रधानांशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, खासदार परवेश वर्मा, भाजप नेते कपिल मिश्रा यांनी प्रक्षोभक विधाने केली होती.

टॅग्स :delhi violenceदिल्ली