शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

हिंसाचाराबाबत केजरीवाल-मोदी यांच्यात चर्चा, मदतकार्याविषयी केली सल्लामसलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 04:22 IST

दिल्लीत हिंसाचार करणाऱ्या आणि त्याला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मंगळवारी केली.

नवी दिल्ली : दिल्लीत हिंसाचार करणाऱ्या आणि त्याला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मंगळवारी केली. केजरीवाल यांनी संसद भवनात पंतप्रधानांची भेट घेतली आणि हिंसाचारग्रस्तांना मदत करण्याबाबतही सल्लामसलत केली.मात्र हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या प्रक्षोभक विधाने करणाऱ्यांवर कारवाईबद्दल मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्रीपदी तिसºयांदा निवडून आल्यानंतर केजरीवाल यांनी पहिल्यांदाच पंतप्रधानांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास त्या दोघांनी दिल्लीतील सध्याची परिस्थिती आणि घ्यावयाची काळजी यावर चर्चा केली.काही दिवसांपूर्वीच त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर केजरीवाल म्हणाले की, दिल्ली पोलीस सध्या अधिक सक्रिय आहेत. यापूर्वी दिल्ली पोलीस सतर्क राहिले असते तरी दिल्लीत ही स्थिती उद्भवली नसती आणि झालेले नुकसान टाळता आले असते.दंगलीनंतर दिल्लीत अनेक अफवा पसरविल्या जात असून, यामुळे घाबरून अनेक लोक घरे सोडून जात आहेत. या अफवांवर कसे नियंत्रण आणता येईल, यावरही आमच्यात चर्चा झाली. हिंसाचारामध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी आणि दिल्लीत यापुढे असे प्रकार पुन्हा घडू नयेत, याची काळजी घ्यायला हवी, असे पंतप्रधान म्हणाल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.>भाजप नेत्यांची विधानेभाजपच्या नेत्यांनी प्रक्षोभक विधाने केल्याने दिल्लीतील दंगल होण्यास कारणीभूत ठरली. यावर पंतप्रधानांशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, खासदार परवेश वर्मा, भाजप नेते कपिल मिश्रा यांनी प्रक्षोभक विधाने केली होती.

टॅग्स :delhi violenceदिल्ली