शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

हिंसाचाराबाबत केजरीवाल-मोदी यांच्यात चर्चा, मदतकार्याविषयी केली सल्लामसलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 04:22 IST

दिल्लीत हिंसाचार करणाऱ्या आणि त्याला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मंगळवारी केली.

नवी दिल्ली : दिल्लीत हिंसाचार करणाऱ्या आणि त्याला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मंगळवारी केली. केजरीवाल यांनी संसद भवनात पंतप्रधानांची भेट घेतली आणि हिंसाचारग्रस्तांना मदत करण्याबाबतही सल्लामसलत केली.मात्र हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या प्रक्षोभक विधाने करणाऱ्यांवर कारवाईबद्दल मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्रीपदी तिसºयांदा निवडून आल्यानंतर केजरीवाल यांनी पहिल्यांदाच पंतप्रधानांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास त्या दोघांनी दिल्लीतील सध्याची परिस्थिती आणि घ्यावयाची काळजी यावर चर्चा केली.काही दिवसांपूर्वीच त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर केजरीवाल म्हणाले की, दिल्ली पोलीस सध्या अधिक सक्रिय आहेत. यापूर्वी दिल्ली पोलीस सतर्क राहिले असते तरी दिल्लीत ही स्थिती उद्भवली नसती आणि झालेले नुकसान टाळता आले असते.दंगलीनंतर दिल्लीत अनेक अफवा पसरविल्या जात असून, यामुळे घाबरून अनेक लोक घरे सोडून जात आहेत. या अफवांवर कसे नियंत्रण आणता येईल, यावरही आमच्यात चर्चा झाली. हिंसाचारामध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी आणि दिल्लीत यापुढे असे प्रकार पुन्हा घडू नयेत, याची काळजी घ्यायला हवी, असे पंतप्रधान म्हणाल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.>भाजप नेत्यांची विधानेभाजपच्या नेत्यांनी प्रक्षोभक विधाने केल्याने दिल्लीतील दंगल होण्यास कारणीभूत ठरली. यावर पंतप्रधानांशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, खासदार परवेश वर्मा, भाजप नेते कपिल मिश्रा यांनी प्रक्षोभक विधाने केली होती.

टॅग्स :delhi violenceदिल्ली