शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

केजरीवाल शेतकऱ्यांसाठी करणार एक दिवसाचा उपवास; संपूर्ण देशालाही केलं आवाहन

By मोरेश्वर येरम | Updated: December 13, 2020 17:59 IST

अनेक खेळाडू आज शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सामील झालेत. मग हे लोकही देशद्रोही आहेत का?

ठळक मुद्देशेतकऱ्यांना देशद्रोही संबोधण्याची चूक करू नये, केजरीवालांचा कडक इशारा'आप'च्या कार्यकर्त्यांना केलं एक दिवसाच्या उपवासाचं आवाहनकेंद्राने कायदे मागे घ्यावेत, केजरीवालांची मागणी

नवी दिल्लीदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी उद्या (सोमवार) एका दिवसाचा उपवास करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय त्यांनी संपूर्ण देशातील नागरिकांना उद्याचा दिवस उपवास करण्याचं आवाहन देखील केलं आहे.

"देशातील अनेक खेळाडूंनी शेतकऱ्यांचं समर्थन केलं आहे. मग ते देशद्रोही झाले का? देशातील वकील, व्यापारी देशद्रोही आहेत का? अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी काँग्रेस सरकारकडून बदनामी केली जात होती. आता भाजपकडून शेतकऱ्यांची बदनामी केली जात आहे", असं केजरीवाल म्हणाले. ते डिजिटल कॉन्फ्रेन्समध्ये बोलत होते. 

"माजी सैनिक इथं बसलेले आहेत. ज्यांनी देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. मग तेही देशद्रोही आहेत का? भाजपच्या नेत्यांनी याचं उत्तर द्यावं. अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलं आणि पुरस्कार जिंकले.  असे अनेक खेळाडू आज शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सामील झालेत. मग हे लोकही देशद्रोही आहेत का?", असं केजरीवाल म्हणाले. 

देशातील शेतकऱ्यांना देशद्रोही संबोधण्याची घोडचूक कुणी करू नये, असं रोखठोक मत केजरीवाल यांनी व्यक्त केलं. काही मोजके शेतकरी या आंदोलनात असतील असं समजण्याची चूक सरकारने करू नये. देशातील प्रत्येक नागरिक शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी उद्या एक दिवसाचा उपवास ठेवावा, असंही केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपFarmer strikeशेतकरी संप