शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

केजरीवाल शेतकऱ्यांसाठी करणार एक दिवसाचा उपवास; संपूर्ण देशालाही केलं आवाहन

By मोरेश्वर येरम | Updated: December 13, 2020 17:59 IST

अनेक खेळाडू आज शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सामील झालेत. मग हे लोकही देशद्रोही आहेत का?

ठळक मुद्देशेतकऱ्यांना देशद्रोही संबोधण्याची चूक करू नये, केजरीवालांचा कडक इशारा'आप'च्या कार्यकर्त्यांना केलं एक दिवसाच्या उपवासाचं आवाहनकेंद्राने कायदे मागे घ्यावेत, केजरीवालांची मागणी

नवी दिल्लीदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी उद्या (सोमवार) एका दिवसाचा उपवास करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय त्यांनी संपूर्ण देशातील नागरिकांना उद्याचा दिवस उपवास करण्याचं आवाहन देखील केलं आहे.

"देशातील अनेक खेळाडूंनी शेतकऱ्यांचं समर्थन केलं आहे. मग ते देशद्रोही झाले का? देशातील वकील, व्यापारी देशद्रोही आहेत का? अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी काँग्रेस सरकारकडून बदनामी केली जात होती. आता भाजपकडून शेतकऱ्यांची बदनामी केली जात आहे", असं केजरीवाल म्हणाले. ते डिजिटल कॉन्फ्रेन्समध्ये बोलत होते. 

"माजी सैनिक इथं बसलेले आहेत. ज्यांनी देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. मग तेही देशद्रोही आहेत का? भाजपच्या नेत्यांनी याचं उत्तर द्यावं. अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलं आणि पुरस्कार जिंकले.  असे अनेक खेळाडू आज शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सामील झालेत. मग हे लोकही देशद्रोही आहेत का?", असं केजरीवाल म्हणाले. 

देशातील शेतकऱ्यांना देशद्रोही संबोधण्याची घोडचूक कुणी करू नये, असं रोखठोक मत केजरीवाल यांनी व्यक्त केलं. काही मोजके शेतकरी या आंदोलनात असतील असं समजण्याची चूक सरकारने करू नये. देशातील प्रत्येक नागरिक शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी उद्या एक दिवसाचा उपवास ठेवावा, असंही केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपFarmer strikeशेतकरी संप