शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

सत्ताकेंद्रे व परंपरांना आव्हान देत वाद-विवादाची परंपरा जिवंत ठेवा - रघुराम राजन यांचे आवाहन

By admin | Updated: October 31, 2015 16:13 IST

देशाच्या प्रगतीसाठी सहिष्णूता अत्यावश्यक असल्याचे सांगतानाच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सगळ्या सत्ताकेंद्रांना आणि परंपरांना आव्हान द्या असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - देशाच्या प्रगतीसाठी सहिष्णूता अत्यावश्यक असल्याचे सांगतानाच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सगळ्या सत्ताकेंद्रांना आणि परंपरांना आव्हान द्या असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे. दिल्ली आयआयटीच्या पदवीप्रदान कार्यक्रमात बोलताना राजन यांनी वाद विवादाची परंपरा, परस्परांविषयी आदर आणि सहिष्णूता या गोष्टी कल्पनांचा कारखाना खुला ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
प्रगत अशा औद्योगिक जगाच्या पद्धतींचं नीट अवलोकन केलं तरी भारताची वाढ चांगली होईल असं सांगताना जे सॉफ्टवेअर क्षेत्रानं केलं तसं उत्पादन क्षेत्रानं करायला हवं असंही मत व्यक्त केलं.
नव्या कल्पना, उत्पादनाच्या नव्या पद्धती आणि चांगली दळणवळण यंत्रणा या टिकाऊ आर्थिक वृद्धीसाठी आवश्क असल्याचे ते म्हणाले. 
वाद विवाद आणि विचारांची देवाणघेवाण याबाबत बोलताना राजन यांनी सगळ्या आदर्शवादांची चिकित्सा व्हायला हवी असे सांगत असे विचार भारतीय आहेत की विदेशी याची तमा बाळगता कामा नये असेही सांगितले. असे विचार हजार वर्षांपूर्वी जन्माला आले की काही सेकंदापूर्वी, ते एखाद्या अशिक्षिताकडून आले की जागतिक दर्जाच्या प्राध्यापकाकडून याचा विचार न करता चिकित्सा व्हायला हवी, वाद विवाद व्हायला हवे अशी अपेक्षा राजन यांनी व्यक्त केली.