शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

सत्ताकेंद्रे व परंपरांना आव्हान देत वाद-विवादाची परंपरा जिवंत ठेवा - रघुराम राजन यांचे आवाहन

By admin | Updated: October 31, 2015 16:13 IST

देशाच्या प्रगतीसाठी सहिष्णूता अत्यावश्यक असल्याचे सांगतानाच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सगळ्या सत्ताकेंद्रांना आणि परंपरांना आव्हान द्या असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - देशाच्या प्रगतीसाठी सहिष्णूता अत्यावश्यक असल्याचे सांगतानाच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सगळ्या सत्ताकेंद्रांना आणि परंपरांना आव्हान द्या असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे. दिल्ली आयआयटीच्या पदवीप्रदान कार्यक्रमात बोलताना राजन यांनी वाद विवादाची परंपरा, परस्परांविषयी आदर आणि सहिष्णूता या गोष्टी कल्पनांचा कारखाना खुला ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
प्रगत अशा औद्योगिक जगाच्या पद्धतींचं नीट अवलोकन केलं तरी भारताची वाढ चांगली होईल असं सांगताना जे सॉफ्टवेअर क्षेत्रानं केलं तसं उत्पादन क्षेत्रानं करायला हवं असंही मत व्यक्त केलं.
नव्या कल्पना, उत्पादनाच्या नव्या पद्धती आणि चांगली दळणवळण यंत्रणा या टिकाऊ आर्थिक वृद्धीसाठी आवश्क असल्याचे ते म्हणाले. 
वाद विवाद आणि विचारांची देवाणघेवाण याबाबत बोलताना राजन यांनी सगळ्या आदर्शवादांची चिकित्सा व्हायला हवी असे सांगत असे विचार भारतीय आहेत की विदेशी याची तमा बाळगता कामा नये असेही सांगितले. असे विचार हजार वर्षांपूर्वी जन्माला आले की काही सेकंदापूर्वी, ते एखाद्या अशिक्षिताकडून आले की जागतिक दर्जाच्या प्राध्यापकाकडून याचा विचार न करता चिकित्सा व्हायला हवी, वाद विवाद व्हायला हवे अशी अपेक्षा राजन यांनी व्यक्त केली.