शहरं
Join us  
Trending Stories
1
अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका
2
Goa Nightclub Fire:शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
3
इंडिगोच्या गोंधळानंतर सरकारचा कठोर निर्णय; विमान भाड्याची कमाल मर्यादा निश्चित, रिफंडसाठी अल्टीमेट
4
भारत-अमेरिका संबंधांवर पुतीन भेटीमुळे फरक नाही; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे ठाम प्रतिपादन
5
धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग
6
भारतातूनच परतताच पुतिन यांच्यासाठी खूशखबर, रशियाला मिळाली मोठी ऑफर; अमेरिकेची झोप उडाली
7
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
8
झोंबणाऱ्या थंडीनं भरलं कापरं, उत्तर भारतात थंडीची लाट; उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा
9
Goa Nightclub Fire: शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
10
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
11
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
12
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
13
Goa Nightclub Fire: गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
14
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
15
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
16
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
17
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
18
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
19
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
20
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
Daily Top 2Weekly Top 5

'अहंकार बाजूला ठेवून सर्वांचा विश्वास जिंकू या!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 06:30 IST

नवा समर्थ भारत उभारण्याचा संकल्प घेऊन पाच वर्षांपूर्वी एक ध्येयवादी वाटचाल आपण सुरू केली.

नवी दिल्ली : नवा समर्थ भारत उभारण्याचा संकल्प घेऊन पाच वर्षांपूर्वी एक ध्येयवादी वाटचाल आपण सुरू केली. देशाच्या जनतेने यास केवळ पसंतीच दिलेली नाही, तर नागरिक एक जनआंदोलन म्हणून यात सक्रियतेने सहभागी होण्यास उतावीळ आहेत, हाच नव्या जनादेशाचा अर्थ आहे. त्यामुळे अहंकाराला बिलकूल थारा न देता सेवाभावाने हा संकल्प पूर्ण करण्यासाठीच पुढील पाच वर्षे काम केले जाईल, अशी ग्वाही देत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या पर्वाच्या वाटचालीतील पहिले पाऊल शनिवारी टाकले.लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) नेता व देशाचे भावी पंतप्रधान म्हणून एकमताने निवड केल्यानंतर संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये मोदी बोलत होते. आघाडीतील सर्व सहकारी पक्षांचा व त्यांच्या नेत्यांचाही या यशात तेवढाच मोठा सहभाग आहे, असे सांगून मोदी यांनी सर्वांचे अभिनंदन करत आभार मानले.मोदी म्हणाले, या जनादेशाने आपल्याला नवी ऊर्जा मिळाली आहे तशीच जबाबदीरीही खूप वाढली आहे. लोकांनी आपला सेवाभाव, परिश्रम व सचोटी यावर भरवसा ठेवून आपल्याला पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे हे यश आपले नसून जनतेने त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडताना अहंकाराला जराही थारा न देता माझ्यासह प्रत्येकाला एक कार्यकर्ता बनून पूर्ण समर्पणाने झोकून द्यावे लागेल.मोदी असेही म्हणाले की, आता देशाचे सरकार चालविताना आपल्याला ज्यांनी साथ दिली त्यांना व ज्यांनी विरोध केला अशा सर्वांना बरोबर जायचे आहे. आधी आपला ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा होता. आता आपल्याला याला ‘सबका विश्वास’ जोडायचे आहे. ही निवडणूक आपण जिंकलेली नसून मतदारांनी स्वत:हून आपली निवड केली आहे. मतदारांनी टाकलेला हा विश्वास म्हणजे आपल्याला जीवनऊर्जा देणारी गर्भनाळ आहे. ती कधीही तुटू न देण्याचे भान आपल्याला सदैव ठेवावे लागेल.भाजपाला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळाले असले तरी संपूर्ण ‘एनडीए’ला बरोबर घेऊन जाणे हे केवळ राजकारण नाही. ती एक राष्ट्रीय गरज आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, प्रादेशिक अस्मिता व आकांक्षांना पूर्ण आदर देत राष्ट्रीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकपक्षीय शासनापेक्षा आघाडीचे सरकार हिच आदर्श व्यवस्था आहे, असेही मोदी म्हणाले.मोदी पुढे असेही म्हणाले की, आजवर समाजाला जात, पात, धर्म, पंथ याआधारे गटागटांमध्ये वाटून त्यानुसार राजकारण केले गेले. गरिबी आणि गरीब हेही राजकीय स्वार्थ साध्य करण्याचे एक साधन मानले गेले. आपल्याला या सर्वांवर मात करून काम करावे लागणार आहे. यासाठी आपल्याला बदलावे लागेल. सत्ताभावावर जसजशी मात कराल तसा सेवाभाव वाढत जाईल व सेवाभाव जेवढा दृढ होईल तेवढाच जनतेचा आशिर्वाद वाढत जाईल.मी गेली पाच वर्षे याच भावनेने काम केले.जनता जनार्दन ईश्वराचे रूप असते असे पूर्वी ऐकले होते. निवडणुकांच्या निमित्ताने याचा मला प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. म्हणूनच निवडणूक ही माझ्यासाठी एक तीर्थयात्रा होती, असेही मोदींनी सांगितले.>दलालांपासून सावध!प्रथमच निवडून आलेल्या खासदारांना मोदींनी सांगितले की, दिल्लीत तुम्हाला न मागताही अनेक प्रकारची मदत करायला तत्परता दाखविणारे अनेक जण भेटतील. पण अशा दलालांपासून सावध राहा.सभागृहात किंवा माध्यमांशी बोलताना टीव्हीवर दिसेन म्हणून बोलण्याचा मोह टाळा. त्याने अडचणीत याल, असेही त्यांनी सावध केले.>मोदींनी भाषण सुरू करण्याआधी सभागृहात ठेवलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतीला नमन केले. नंतर भाषणातही त्यांनी या संविधानाशी बांधिलकीचा वारंवार उल्लेख केला. व्यासपीठावर मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत लालकृष्ण आडवाणी व डॉ. मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ मार्गदर्शक नेत्यांना सन्मानाने स्थान देण्यात आले होते. नेतेपदी निवड झाल्यावर इतरांनी मोदी बसले होते त्या जागेवर येऊन त्यांना पुष्पगुच्छ दिले. पण मोदींनी जागेवरून उठून आडवाणी व जोशी यांच्यापाशी जात त्यांचे अभिनंदन विनम्रतेने स्वीकारले. भाषणाच्या आधी व मध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांना उपस्थितांनी बाके वाजवून व ‘मोदी.. मोदी..’ असा घोशा लावून उत्स्फूर्तपणे साथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने झाली. आजारी असलेल्या अरुण जेटली यांची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने जाणवली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदी