शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

केसीपार्क मध्ये ७ दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प जलवाहिनी फुटली: दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 31, 2016 01:54 IST

जळगाव: येथील कानळदा रोड भागात नालेसफाई करताना जेसीबीचा धक्का लागून नाल्यातून गेलेली जलवाहिनी फुटल्याने के.सीपार्क, त्रिभुवन कॉलन,विजयनगरसह परिसरात नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तब्बल ५ दिवस उलटूनदेखील दुरुस्तीसाठी मनपाला मुहर्त मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

जळगाव: येथील कानळदा रोड भागात नालेसफाई करताना जेसीबीचा धक्का लागून नाल्यातून गेलेली जलवाहिनी फुटल्याने के.सीपार्क, त्रिभुवन कॉलन,विजयनगरसह परिसरात नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तब्बल ५ दिवस उलटूनदेखील दुरुस्तीसाठी मनपाला मुहर्त मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कानळदा रोडवरील नाल्यांची जेसीबी व्दारे साफसफाई करीत असताना पाच दिवसापूर्वीच जलवाहिनी फुटली आहे. या भागात २४ मे रोजी पाणीपुरवठा झाला होता. त्यानंतर २७ मे रोजी या भागात पाणी पुरवठा होणार होता त्याच दिवशी नालेसफाई करणार्‍या जेसीबीचा नाल्यातून गेलेल्या जलवाहिनीला धक्का लागल्याने जलवाहीनी फुटली. त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकला नाही. जलवाहिनी फुटून पाच दिवस झाले तरीही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे २४ तारखेपासून याभागात पाणीपुरवठाच झालेला नाही. नागरिकांना पाण्यासाठी आता भटकंती करावी लागत आहे. तब्बल पाच दिवस उलटूनदेखील मनपाकडून दुरुस्तीला किरकोळ कारणांसाठी विलंब केला जात आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी जेसीबी व पाईप मिळत नसल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. मनपाकडे दुरुस्तीचे साहित्य नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच पाणी नसतांना टॅंकरची व्यवस्था करण्यात आली नाही.
गेल्या सात दिवसापासून नागरिकांना पाणी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी परिसरात पाण्याच्या टॅंकरसाठी वार्डाच्या नगरसेवक संगीता दांडेकर यांना संपर्क केला असता कुठलाही प्रतिसाद देण्यात आला नाही. राजू पटेल यांनी सोमवारी काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. अखेर महापौरांना विनंती केल्यावर त्यांनी या भागात टँकर पाठविला. त्यावर पाणी भरण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. कानळदा रोड भागात के.सी.पार्क,विजय नगर,त्रिभुवन कॉलनीत पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली पाईप लाईन ही नाल्यातूनच गेली आहे.तसेच याच भागात जलवाहिनी नेहमी नादुरुस्ती होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.