शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

केसीपार्क मध्ये ७ दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प जलवाहिनी फुटली: दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 31, 2016 01:54 IST

जळगाव: येथील कानळदा रोड भागात नालेसफाई करताना जेसीबीचा धक्का लागून नाल्यातून गेलेली जलवाहिनी फुटल्याने के.सीपार्क, त्रिभुवन कॉलन,विजयनगरसह परिसरात नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तब्बल ५ दिवस उलटूनदेखील दुरुस्तीसाठी मनपाला मुहर्त मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

जळगाव: येथील कानळदा रोड भागात नालेसफाई करताना जेसीबीचा धक्का लागून नाल्यातून गेलेली जलवाहिनी फुटल्याने के.सीपार्क, त्रिभुवन कॉलन,विजयनगरसह परिसरात नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तब्बल ५ दिवस उलटूनदेखील दुरुस्तीसाठी मनपाला मुहर्त मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कानळदा रोडवरील नाल्यांची जेसीबी व्दारे साफसफाई करीत असताना पाच दिवसापूर्वीच जलवाहिनी फुटली आहे. या भागात २४ मे रोजी पाणीपुरवठा झाला होता. त्यानंतर २७ मे रोजी या भागात पाणी पुरवठा होणार होता त्याच दिवशी नालेसफाई करणार्‍या जेसीबीचा नाल्यातून गेलेल्या जलवाहिनीला धक्का लागल्याने जलवाहीनी फुटली. त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकला नाही. जलवाहिनी फुटून पाच दिवस झाले तरीही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे २४ तारखेपासून याभागात पाणीपुरवठाच झालेला नाही. नागरिकांना पाण्यासाठी आता भटकंती करावी लागत आहे. तब्बल पाच दिवस उलटूनदेखील मनपाकडून दुरुस्तीला किरकोळ कारणांसाठी विलंब केला जात आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी जेसीबी व पाईप मिळत नसल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. मनपाकडे दुरुस्तीचे साहित्य नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच पाणी नसतांना टॅंकरची व्यवस्था करण्यात आली नाही.
गेल्या सात दिवसापासून नागरिकांना पाणी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी परिसरात पाण्याच्या टॅंकरसाठी वार्डाच्या नगरसेवक संगीता दांडेकर यांना संपर्क केला असता कुठलाही प्रतिसाद देण्यात आला नाही. राजू पटेल यांनी सोमवारी काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. अखेर महापौरांना विनंती केल्यावर त्यांनी या भागात टँकर पाठविला. त्यावर पाणी भरण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. कानळदा रोड भागात के.सी.पार्क,विजय नगर,त्रिभुवन कॉलनीत पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली पाईप लाईन ही नाल्यातूनच गेली आहे.तसेच याच भागात जलवाहिनी नेहमी नादुरुस्ती होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.