शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कथुआची घटना संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद; राष्ट्रपती कोविंद संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 04:03 IST

जम्मू-काश्मीरच्या कथुआमध्ये बालिकेवर झालेल्या बलात्काराची दंशभर संतप्त प्रतिक्रिया उमटली असतानाच, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्याची दखल घेऊन, आपला संताप व्यक्त केला आहे. या घटनेची शरम वाटते, असे ते म्हणाले.

कतरा (जम्मू) : जम्मू-काश्मीरच्या कथुआमध्ये बालिकेवर झालेल्या बलात्काराची दंशभर संतप्त प्रतिक्रिया उमटली असतानाच, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्याची दखल घेऊन, आपला संताप व्यक्त केला आहे. या घटनेची शरम वाटते, असे ते म्हणाले.स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही भारतात अशा घटना घडत आहेत. या घटना देशासाठी लज्जास्पद असून, आपण कोणत्या प्रकारचा समाज घडवत आहोत, याचा आता आपण विचार करायला हवा, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपतींनी आपला संताप व्यक्त केला.देशात कोणत्याही मुलीच्या किंवा महिलेच्या बाबतीत अशी घटना घडणार नाही, ही जबाबदारी आपली सर्वांची, समाजाची आहे. प्रत्येक मुलीचे रक्षण आपणच करायला हवे, असे सांगून राष्ट्रपतींनी कथुआ बलात्कार प्रकरणातही न्याय झालाच पाहिजे, असे स्पष्ट केले. श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभासाठी आलेले रामनाथ कोविंद कथुआ बलात्कार प्रकरणाविषयी बोलणार का, आपली नाराजी व्यक्त करणार का, अशी चर्चा सुरू होती.देशातील मुली देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतही मेरी कोम, मनिका बत्रा, संगीता चानू, मीराबाई चानू यासारख्या देशाच्या कन्यांनी सुवर्ण पदके पटकावून देशाचे नाव मोठे केले, याचाही उल्लेख त्यांनी केला. (वृत्तसंस्था)मला बोलण्याचा सल्ला देणाऱ्यानरेंद्र मोदींनीच आता मौन सोडावेकथुआ, उन्नाव बलात्कार प्रकरण आणि चलन तुटवडा या विषयांवर मौन धारण केल्याबद्दल, पंतप्रधान मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हल्ला चढविला आहे. मी नेहमी मौन बाळगतो, अशी टीका मोदी सतत माझ्यावर करीत असत. आता स्वत:च्या सल्ल्याची पंतप्रधान मोदी यांनी अंमलबजावणी करावी, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी दिला आहे.न्याय मिळवून देणे ही आपली जबाबदारीवैष्णोदेवीच्या भूमीत लहान मुलीवर अत्याचार होतो, त्यावरून समाजात चुकीच्या गोष्टी सुरू असल्याचे स्पष्ट होते, या शब्दांत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दु:ख व्यक्त केले. कथुआ प्रकरणात न्याय मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण पूर्ण करू, असे वचनही मुफ्ती यांनी दिले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदKathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरण