शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

काश्मिरी तरुणच कारणीभूत!

By admin | Updated: March 31, 2017 01:24 IST

सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी चकमकीच्या ठिकाणी जाणारे युवक एकाप्रकारे स्वत:च्या

श्रीनगर : सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी चकमकीच्या ठिकाणी जाणारे युवक एकाप्रकारे स्वत:च्या आत्महत्येला कारणीभूतच ठरत आहेत, त्यांनी या प्रकारापासून दूर राहावे, असे आवाहन जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी केले आहे. चकमकीच्या ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस बुलेटप्रूफ वाहन किंवा घराचा आडोसा घेतात. अशा ठिकाणी युवकांनी जाणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच आहे, असे सांगून ते म्हणाले की, राजकीय लाभासाठी खोऱ्यातील शांततेला बाधा पोहोचवू पाहणारे घटक दिशाभूल करून आपला वापर करीत आहेत हे युवकांनी समजून घेण्याची गरज आहे. आपण कोणाला लागू हे गोळीला माहीत नसते. त्यामुळे माझे सर्व तरुण मुलांना आवाहन आहे की, त्यांनी चकमकीच्या ठिकाणी न येता आपल्या घरातच थांबावे.दहशतवाद्यांना पळून जाता यावे यासाठी तरुणांना दगडफेकीसाठी चिथावले जाते. यासाठी समाजकंटक सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. आमचा देश व खोऱ्यातील शांततेच्या शत्रूंकडून सोशल मीडियाचा होत असलेला हा दुरुपयोग आहे, असेही ते म्हणाले. तरुणांना चिथावण्यासाठी हे लोक जवळपास ३०० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तसेच फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स सक्रिय करतात. हे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि सोशल साइट्स निगराणीखाली असून, संबंधितांवर कारवाई केली जाईल. यातील काही अकाउंट सीमेपलीकडील असल्याचे चौकशीत आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.आयएसआयचा प्रयत्नपाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय काश्मीर खोऱ्यातील निरपराध तरुणांना घराबाहेर पडून चकमकीच्या ठिकाणी जाण्यासाठी चिथावत आहे, असेही वेद म्हणाले. वेद यांनी मंगळवारच्या हिंसाचारानंतर पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांची भेट घेऊन काश्मिरातील विद्यमान परिस्थितीवर विस्ताराने चर्चा केली. खोऱ्यात कुठेही चकमक सुरू होताच. पाकिस्तानी गुप्तचर सक्रिय होतात, असेही ते म्हणाले.केंद्र सरकारने चर्चेची प्रक्रिया सुरू करावीकाश्मिरातील परिस्थिती कठीण असून, केंद्राने सर्व पक्षकारांशी चर्चेची प्रक्रिया सुरू करायला हवी, असे एका शीख संघटनेने गुरुवारी म्हटले. निदर्शकांवरील कठोर कारवाईमुळे युवक मुख्य प्रवाहापासून आणखी दुरावतील, असेही संघटनेने म्हटले आहे. आॅल पार्टीज् शीख को-आॅर्डिनेशन समितीचे (एपीएससीसी) अध्यक्ष जगमोहनसिंग रैना म्हणाले की, काश्मिरात सध्या खूपच वाईट परिस्थिती आहे.केंद्र सरकार परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्व संबंधित पक्षकारांशी चर्चेची प्रक्रिया सुरू करील, अशी आम्हाला आशा आहे. निदर्शकांवर कठोर कारवाईतून काहीही साध्य होणार नाही. उलट यामुळे तरुणवर्ग मुख्य प्रवाहापासून दुरावेल.