शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

काश्मिरी तरुणच कारणीभूत!

By admin | Updated: March 31, 2017 01:24 IST

सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी चकमकीच्या ठिकाणी जाणारे युवक एकाप्रकारे स्वत:च्या

श्रीनगर : सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी चकमकीच्या ठिकाणी जाणारे युवक एकाप्रकारे स्वत:च्या आत्महत्येला कारणीभूतच ठरत आहेत, त्यांनी या प्रकारापासून दूर राहावे, असे आवाहन जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी केले आहे. चकमकीच्या ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस बुलेटप्रूफ वाहन किंवा घराचा आडोसा घेतात. अशा ठिकाणी युवकांनी जाणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच आहे, असे सांगून ते म्हणाले की, राजकीय लाभासाठी खोऱ्यातील शांततेला बाधा पोहोचवू पाहणारे घटक दिशाभूल करून आपला वापर करीत आहेत हे युवकांनी समजून घेण्याची गरज आहे. आपण कोणाला लागू हे गोळीला माहीत नसते. त्यामुळे माझे सर्व तरुण मुलांना आवाहन आहे की, त्यांनी चकमकीच्या ठिकाणी न येता आपल्या घरातच थांबावे.दहशतवाद्यांना पळून जाता यावे यासाठी तरुणांना दगडफेकीसाठी चिथावले जाते. यासाठी समाजकंटक सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. आमचा देश व खोऱ्यातील शांततेच्या शत्रूंकडून सोशल मीडियाचा होत असलेला हा दुरुपयोग आहे, असेही ते म्हणाले. तरुणांना चिथावण्यासाठी हे लोक जवळपास ३०० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तसेच फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स सक्रिय करतात. हे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि सोशल साइट्स निगराणीखाली असून, संबंधितांवर कारवाई केली जाईल. यातील काही अकाउंट सीमेपलीकडील असल्याचे चौकशीत आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.आयएसआयचा प्रयत्नपाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय काश्मीर खोऱ्यातील निरपराध तरुणांना घराबाहेर पडून चकमकीच्या ठिकाणी जाण्यासाठी चिथावत आहे, असेही वेद म्हणाले. वेद यांनी मंगळवारच्या हिंसाचारानंतर पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांची भेट घेऊन काश्मिरातील विद्यमान परिस्थितीवर विस्ताराने चर्चा केली. खोऱ्यात कुठेही चकमक सुरू होताच. पाकिस्तानी गुप्तचर सक्रिय होतात, असेही ते म्हणाले.केंद्र सरकारने चर्चेची प्रक्रिया सुरू करावीकाश्मिरातील परिस्थिती कठीण असून, केंद्राने सर्व पक्षकारांशी चर्चेची प्रक्रिया सुरू करायला हवी, असे एका शीख संघटनेने गुरुवारी म्हटले. निदर्शकांवरील कठोर कारवाईमुळे युवक मुख्य प्रवाहापासून आणखी दुरावतील, असेही संघटनेने म्हटले आहे. आॅल पार्टीज् शीख को-आॅर्डिनेशन समितीचे (एपीएससीसी) अध्यक्ष जगमोहनसिंग रैना म्हणाले की, काश्मिरात सध्या खूपच वाईट परिस्थिती आहे.केंद्र सरकार परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्व संबंधित पक्षकारांशी चर्चेची प्रक्रिया सुरू करील, अशी आम्हाला आशा आहे. निदर्शकांवर कठोर कारवाईतून काहीही साध्य होणार नाही. उलट यामुळे तरुणवर्ग मुख्य प्रवाहापासून दुरावेल.