शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पूर आल्यावर काश्मिरींना कळते जवानांची किंमत- नरेंद्र मोदी

By admin | Updated: April 21, 2017 18:09 IST

राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात नागरी सेवा दिनाचं निमित्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रशासनातील अधिका-यांचा सन्मान केला गेला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात नागरी सेवा दिनाचं निमित्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रशासनातील अधिका-यांचा सन्मान केला गेला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिका-यांशी संवाद साधताना सांगितलं की, "तुमच्यापैकी काही लोक जेव्हा काश्मीरमध्ये पूर आल्यानंतर लोकांची मदत करतात तेव्हा टाळ्या वाजवून तुमचं कौतुक केलं जात. नंतर भलेही तुमच्यावर दगडफेक होत असेल, पण काही वेळासाठी त्यांच्याही मनात येतं की हे लोक आपल्यासाठी जीव देऊ शकतात". यावेळी मोदींनी अधिका-यांना सांगितलं की, "तुम्ही ठरवलंत तर सर्व शक्य आहे. जर एका अधिका-याने ठरवलं की गंगेत कोणताही कचरा टाकू दिला जाणार नाही, तर गंगेला कोणीही अस्वच्छ करु शकणार नाही". 
 
अधिका-यांना दिला सल्ला - 
कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना अधिका-यांना सल्ला देत जर तुम्ही तुमच्या कामाची पद्दत बदललीत तर काही आव्हानांचं रुपांतर संधीत होऊ शकतं. काही गोष्टींमध्ये बदल घडवण्यासाठी आजच्या वेळेत अधिकारी महत्वाची भूमिका बजावतात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिका-यांना सोशल मीडियाचा वापर करण्याचाही सल्ला दिला. स्वत:चा प्रचार करण्यापेक्षा जास्त आपल्या कामाची पद्दत बदलण्यावर भर दिला पाहिजे असं मोदींनी सांगितलं. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिका-यांना पुर्ण मेहनतीने काम करण्याचा सल्ला देताना सांगितलं की, सरकार बदलत राहिल पण सिस्टम नेहमीच लागू असले. "आज परिस्थिती बदलण्याची संधी मिळाली आहे. निष्ठेने काम केलं पाहिजे, आणि त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. तो दिवस आठवा जेव्हा तुम्ही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाला होतात. तेव्हा तुम्ही काय स्वप्न पाहिली होती, त्यामध्ये काही बदल झाला आहे का ?" असा विचार करायला मोदींनी सांगितलं. उदाहरण देताना मोदी बोलले की, "फक्त खड्डा खोदणं आणि भरणं याच्याने काही होणार नाही. रोपटंही लावलं पाहिजे. आपण जे काही करु त्याचा निकाल दिसला पाहिजे". 
 
केद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांना यावेळी प्रोत्साहन दिले गेले. "सुधारणांबाबत सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती अजिबात कमी नाही. त्यामुळे काहीतरी हटके विचार करा", असं आवाहनही मोदींनी यावेळी केले. "राजकीय इच्छाशक्ती केवळ सुधारणा आणू शकते. मात्र, प्रशासनाचं काम आणि जनतेचा सहभागच खरा बदल करु शकतो. त्यामुळे आपल्याला या सर्वांना एकत्र आणावं लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.