शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

पूर आल्यावर काश्मिरींना कळते जवानांची किंमत- नरेंद्र मोदी

By admin | Updated: April 21, 2017 18:09 IST

राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात नागरी सेवा दिनाचं निमित्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रशासनातील अधिका-यांचा सन्मान केला गेला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात नागरी सेवा दिनाचं निमित्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रशासनातील अधिका-यांचा सन्मान केला गेला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिका-यांशी संवाद साधताना सांगितलं की, "तुमच्यापैकी काही लोक जेव्हा काश्मीरमध्ये पूर आल्यानंतर लोकांची मदत करतात तेव्हा टाळ्या वाजवून तुमचं कौतुक केलं जात. नंतर भलेही तुमच्यावर दगडफेक होत असेल, पण काही वेळासाठी त्यांच्याही मनात येतं की हे लोक आपल्यासाठी जीव देऊ शकतात". यावेळी मोदींनी अधिका-यांना सांगितलं की, "तुम्ही ठरवलंत तर सर्व शक्य आहे. जर एका अधिका-याने ठरवलं की गंगेत कोणताही कचरा टाकू दिला जाणार नाही, तर गंगेला कोणीही अस्वच्छ करु शकणार नाही". 
 
अधिका-यांना दिला सल्ला - 
कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना अधिका-यांना सल्ला देत जर तुम्ही तुमच्या कामाची पद्दत बदललीत तर काही आव्हानांचं रुपांतर संधीत होऊ शकतं. काही गोष्टींमध्ये बदल घडवण्यासाठी आजच्या वेळेत अधिकारी महत्वाची भूमिका बजावतात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिका-यांना सोशल मीडियाचा वापर करण्याचाही सल्ला दिला. स्वत:चा प्रचार करण्यापेक्षा जास्त आपल्या कामाची पद्दत बदलण्यावर भर दिला पाहिजे असं मोदींनी सांगितलं. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिका-यांना पुर्ण मेहनतीने काम करण्याचा सल्ला देताना सांगितलं की, सरकार बदलत राहिल पण सिस्टम नेहमीच लागू असले. "आज परिस्थिती बदलण्याची संधी मिळाली आहे. निष्ठेने काम केलं पाहिजे, आणि त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. तो दिवस आठवा जेव्हा तुम्ही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाला होतात. तेव्हा तुम्ही काय स्वप्न पाहिली होती, त्यामध्ये काही बदल झाला आहे का ?" असा विचार करायला मोदींनी सांगितलं. उदाहरण देताना मोदी बोलले की, "फक्त खड्डा खोदणं आणि भरणं याच्याने काही होणार नाही. रोपटंही लावलं पाहिजे. आपण जे काही करु त्याचा निकाल दिसला पाहिजे". 
 
केद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांना यावेळी प्रोत्साहन दिले गेले. "सुधारणांबाबत सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती अजिबात कमी नाही. त्यामुळे काहीतरी हटके विचार करा", असं आवाहनही मोदींनी यावेळी केले. "राजकीय इच्छाशक्ती केवळ सुधारणा आणू शकते. मात्र, प्रशासनाचं काम आणि जनतेचा सहभागच खरा बदल करु शकतो. त्यामुळे आपल्याला या सर्वांना एकत्र आणावं लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.