शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

"हिंमत असेल तर..."; वडिलांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना मुलीने दिलं खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 18:12 IST

Kashmiri pandit makhanlal bindroo daughter shraddha bindroo : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि बांदीपोरा जिल्ह्यांमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित माखनलाल बिंद्रू यांच्यासह तीन नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली.

नवी दिल्ली - श्रीनगरचे प्रमुख फार्मासिस्ट माखनलाल बिंद्रू यांची मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर त्यांची मुलगी श्रद्धा बिंद्रूने वडिलांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्यांना थेट खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि बांदीपोरा जिल्ह्यांमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित माखनलाल बिंद्रू यांच्यासह तीन नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली. बिंद्रू यांची श्रीनगरमधील त्यांच्या बिंद्रू मेडीकेट या दुकानात हत्या करण्यात आली. श्रद्धा बिंद्रू यांनी "तुम्ही एका व्यक्तीला मारू शकता, परंतु तुम्ही माखनलाल यांच्या आत्म्याला मारू शकत नाही" असं देखील म्हटलं आहे. 

श्रद्धा बिंद्रू यांनी "माझे वडील जरी मरण पावले असतील, पण त्यांचा आत्मा सदैव जिवंत राहील. तुम्ही एका व्यक्तीला मारू शकता, परंतु तुम्ही माखनलाल यांच्या आत्म्याला मारू शकत नाही. ज्याने माझ्या वडिलांना गोळ्या घातल्या, त्याने माझ्या समोर यावं. माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिले, तर राजकारण्यांनी तुमच्या हातात बंदुका आणि दगड दिले. तुम्हाला बंदुका आणि दगडांनी लढायचे आहे? हा भ्याडपणा आहे. सर्व राजकारणी तुमचा वापर करत आहेत, या आणि शिक्षणाने लढा द्या" असं म्हटलं आहे. 

"तुम्ही फक्त दगड फेकू शकता आणि मागून गोळ्या घालू शकता"

"ज्यांनी काम करताना माझ्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आमच्याशी समोरासमोर येऊन वाद घाला. मग तुम्ही कोण आहात हे आम्ही पाहू. पण तुम्ही हे करणार नाही. कारण तुम्ही एक शब्द बोलण्यासाठीही सक्षम नाही. तुम्ही फक्त दगड फेकू शकता आणि मागून गोळ्या घालू शकता" असं देखील श्रद्धा यांनी म्हटलं आहे. तसेच "मी एक सहाय्यक प्राध्यापक आहे. मी शून्यापासून सुरुवात केली. माझ्या वडिलांनी सायकलवरून कामाला सुरुवात केली."

"माझे वडील एक काश्मिरी पंडित होते, ते कधीही मरणार नाहीत"

"माझा भाऊ एक प्रसिद्ध मधुमेह तज्ञ आहे, माझी आई मेडिकलमध्ये बसते. आम्ही आज जे आहोत ते आम्हाला माखनलाल बिंद्रू यांनी बनवले. माझे वडील एक काश्मिरी पंडित होते, ते कधीही मरणार नाहीत. हिंदू असूनही मी कुराण वाचले आहे. कुराण म्हणते की तुम्ही शरीराला मारू शकता, आत्मा जिवंत राहू शकतो. माखनलाल बिंद्रू आत्म्याने कायम जिवंत राहतील" असं देखील श्रद्धा बिंद्रू यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी