शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारसोबत - थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 03:29 IST

३७० कलम हटविल्यानंतर काश्मीरमधील लोकशाही, माणुसकी धोक्यात आली आहे. या मुद्यांवर मात्र आम्ही सरकारला धारेवर धरू, असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्पष्ट केले.

पुणे : पाकिस्तानला जम्मू काश्मीरमधील एक इंचही जमीन मिळू देणार नाही. काश्मीरप्रश्नी आंतररराष्ट्रीय पातळीवर आम्ही केंद्र सरकारसोबत आहोत. पण ३७० कलम हटविल्यानंतर काश्मीरमधील लोकशाही, माणुसकी धोक्यात आली आहे. या मुद्यांवर मात्र आम्ही सरकारला धारेवर धरू, असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्पष्ट केले.पुण्यात एका कार्यक्रमानंतर थरूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ज्या पद्धतीने ३७० कलम हटविले ते चुकीचे होते. आम्ही कधीच म्हणालो नाही की संविधान बदल होऊ शकणार नाही. माणुसकीच्या दृष्टीकोनातून हे व्हायला हवे. पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने लोकशाही व माणुसकीच्या विरोधात कलम हटविले. त्या विरोधात आम्ही बोलणारच.भाजपाचा हिंदी, हिंदुत्व आणि हिंदुस्थानचा नारा देशासाठी फायद्याचा नाही. ‘एक देश, एक भाषा’ ही कल्पना देशाच्या एकतेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्यांना दक्षिण भारतातील लोकांनी स्वीकारले नाही. राष्ट्रभाषेला राष्ट्रवादाशी जोडले जात आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच त्रिभाषेच्या सुत्राचा आदर करायला हवा, अशा शब्दांत थरूर यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या भूमिकेवर काँग्रेस भवनमध्ये बोलताना टीका केली.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370