शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरसाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही

By admin | Updated: July 25, 2016 03:48 IST

काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही, असे सांगतानाच काश्मीरमधील जनतेशी आम्हाला भावनात्मक संबंध हवे आहेत

श्रीनगर : काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही, असे सांगतानाच काश्मीरमधील जनतेशी आम्हाला भावनात्मक संबंध हवे आहेत, असे मत गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. तथापि, भारताच्या अंंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करु नका, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. राज्यातील दोन दिवसीय दौरा पूर्ण केल्यानंतर येथे पत्रकारांशी बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, राज्यात सद्या शांततेची गरज आहे. त्यानंतर आवश्यक वाटेल त्या प्रत्येकाशी चर्चा करण्यात येईल. दरम्यान, यावेळी पाकिस्तानवर टीका करताना ते म्हणाले की, काश्मीरबाबतचा आपला दृष्टिकोन पाकिस्तानने बदलावा. काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही. पाकिस्तान स्वत:च दहशतवादाने पीडित आहे. एकीकडे दहशतवाद संपविण्यासाठी ते लाल मशिदीत प्रवेश करुन अतिरेक्यांना मारत आहेत. तर दुसरीकडे काश्मीरमध्ये आमच्या तरुणांना हत्यारे घेण्यास सांगत आहे. हे थांबायला हवे. मेहबुबा मुफ्तींसोबत चर्चा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी रविवारी येथे राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केली. यावेळी राज्य सरकारमधील काही मंत्रीही उपस्थित होते. राजनाथसिंह हे दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी येथे सत्ताधारी पीडीपी, भाजप तसेच विरोधी पक्ष नॅशनल कॉन्फ्रेसच्या प्रतिनिधींशी स्वतंत्रपणे चर्चा केली. (वृत्तसंस्था)काश्मिरात पाच जिल्ह्यांत कर्फ्यू; जनजीवन विस्कळीतचकाश्मिरात अनेक भागांत तणावपूर्ण वातावरण असून, पाच जिल्ह्यांत काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सलग १६ व्या दिवशी जनजीवन विस्कळीत आहे. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग, कुलगाम, कुपवाडा, पुलवामा व श्रीनगर येथे आठ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली. चार जिल्ह्यांत बांदीपोरा, बारामूल, बडगाम आणि गंदेरबाल येथे संचारबंदी हटविण्यात आली, पण या जिल्ह्यात चारपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र फिरण्यास बंदी आहे.