शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरसाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही

By admin | Updated: July 25, 2016 03:48 IST

काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही, असे सांगतानाच काश्मीरमधील जनतेशी आम्हाला भावनात्मक संबंध हवे आहेत

श्रीनगर : काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही, असे सांगतानाच काश्मीरमधील जनतेशी आम्हाला भावनात्मक संबंध हवे आहेत, असे मत गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. तथापि, भारताच्या अंंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करु नका, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. राज्यातील दोन दिवसीय दौरा पूर्ण केल्यानंतर येथे पत्रकारांशी बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, राज्यात सद्या शांततेची गरज आहे. त्यानंतर आवश्यक वाटेल त्या प्रत्येकाशी चर्चा करण्यात येईल. दरम्यान, यावेळी पाकिस्तानवर टीका करताना ते म्हणाले की, काश्मीरबाबतचा आपला दृष्टिकोन पाकिस्तानने बदलावा. काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही. पाकिस्तान स्वत:च दहशतवादाने पीडित आहे. एकीकडे दहशतवाद संपविण्यासाठी ते लाल मशिदीत प्रवेश करुन अतिरेक्यांना मारत आहेत. तर दुसरीकडे काश्मीरमध्ये आमच्या तरुणांना हत्यारे घेण्यास सांगत आहे. हे थांबायला हवे. मेहबुबा मुफ्तींसोबत चर्चा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी रविवारी येथे राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केली. यावेळी राज्य सरकारमधील काही मंत्रीही उपस्थित होते. राजनाथसिंह हे दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी येथे सत्ताधारी पीडीपी, भाजप तसेच विरोधी पक्ष नॅशनल कॉन्फ्रेसच्या प्रतिनिधींशी स्वतंत्रपणे चर्चा केली. (वृत्तसंस्था)काश्मिरात पाच जिल्ह्यांत कर्फ्यू; जनजीवन विस्कळीतचकाश्मिरात अनेक भागांत तणावपूर्ण वातावरण असून, पाच जिल्ह्यांत काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सलग १६ व्या दिवशी जनजीवन विस्कळीत आहे. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग, कुलगाम, कुपवाडा, पुलवामा व श्रीनगर येथे आठ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली. चार जिल्ह्यांत बांदीपोरा, बारामूल, बडगाम आणि गंदेरबाल येथे संचारबंदी हटविण्यात आली, पण या जिल्ह्यात चारपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र फिरण्यास बंदी आहे.