शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

काश्मीरसाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही

By admin | Updated: July 25, 2016 03:48 IST

काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही, असे सांगतानाच काश्मीरमधील जनतेशी आम्हाला भावनात्मक संबंध हवे आहेत

श्रीनगर : काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही, असे सांगतानाच काश्मीरमधील जनतेशी आम्हाला भावनात्मक संबंध हवे आहेत, असे मत गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. तथापि, भारताच्या अंंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करु नका, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. राज्यातील दोन दिवसीय दौरा पूर्ण केल्यानंतर येथे पत्रकारांशी बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, राज्यात सद्या शांततेची गरज आहे. त्यानंतर आवश्यक वाटेल त्या प्रत्येकाशी चर्चा करण्यात येईल. दरम्यान, यावेळी पाकिस्तानवर टीका करताना ते म्हणाले की, काश्मीरबाबतचा आपला दृष्टिकोन पाकिस्तानने बदलावा. काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही. पाकिस्तान स्वत:च दहशतवादाने पीडित आहे. एकीकडे दहशतवाद संपविण्यासाठी ते लाल मशिदीत प्रवेश करुन अतिरेक्यांना मारत आहेत. तर दुसरीकडे काश्मीरमध्ये आमच्या तरुणांना हत्यारे घेण्यास सांगत आहे. हे थांबायला हवे. मेहबुबा मुफ्तींसोबत चर्चा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी रविवारी येथे राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केली. यावेळी राज्य सरकारमधील काही मंत्रीही उपस्थित होते. राजनाथसिंह हे दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी येथे सत्ताधारी पीडीपी, भाजप तसेच विरोधी पक्ष नॅशनल कॉन्फ्रेसच्या प्रतिनिधींशी स्वतंत्रपणे चर्चा केली. (वृत्तसंस्था)काश्मिरात पाच जिल्ह्यांत कर्फ्यू; जनजीवन विस्कळीतचकाश्मिरात अनेक भागांत तणावपूर्ण वातावरण असून, पाच जिल्ह्यांत काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सलग १६ व्या दिवशी जनजीवन विस्कळीत आहे. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग, कुलगाम, कुपवाडा, पुलवामा व श्रीनगर येथे आठ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली. चार जिल्ह्यांत बांदीपोरा, बारामूल, बडगाम आणि गंदेरबाल येथे संचारबंदी हटविण्यात आली, पण या जिल्ह्यात चारपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र फिरण्यास बंदी आहे.