शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

काश्मीरमध्ये पाच वर्षांत ९६३ दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:56 IST

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत चकमकीत ९६३ दहशतवादी ठार, तर ४१३ सुरक्षा जवान शहीद झाले अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेमध्ये मंगळवारी दिली.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत चकमकीत ९६३ दहशतवादी ठार, तर ४१३ सुरक्षा जवान शहीद झाले अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेमध्ये मंगळवारी दिली.२०१४च्या सुरुवातीपासून ते जून २०१९पर्यंतची ही आकडेवारी आहे. जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, दहशतवाद कदापिही खपवून घेतला जाणार नाही हे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यादृष्टीने दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा दलांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. सीमेपलीकडून भारतात विशेषत: जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न होत असतात.ते म्हणाले की, घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने बहुस्तरीय धोरणाची अंमलबजावणी केली आहे. आंतरराष्ट्रीय सीमा तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या प्रदेशांमध्ये विकासाची कामे हाती घेणे, कुंपण उभारणे, सुरक्षा जवानांना अत्याधुनिक शस्त्रे देणे, गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करणे असे अनेक उपाय योजण्यात आले असून त्याचे योग्य परिणामही दिसत आहेत.> ४०० दहशतवाद्यांची घुसखोरीगृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांत सुमारे ४०० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. त्यातील १२६ दहशतवादी सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत ठार झाले. या काळात २७ सुरक्षा जवान शहीद झाले तर चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले.काश्मीरमध्ये २०१८च्या तुलनेत यंदाच्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्के कमी करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. २०१८ साली दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या १४३ घटना घडल्या होत्या. २०१६ साली हेच प्रमाण ११९ व २०१७ साली १३६ इतके होते.

टॅग्स :terroristदहशतवादी