शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

काश्मीरमध्ये पाच वर्षांत ९६३ दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:56 IST

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत चकमकीत ९६३ दहशतवादी ठार, तर ४१३ सुरक्षा जवान शहीद झाले अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेमध्ये मंगळवारी दिली.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत चकमकीत ९६३ दहशतवादी ठार, तर ४१३ सुरक्षा जवान शहीद झाले अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेमध्ये मंगळवारी दिली.२०१४च्या सुरुवातीपासून ते जून २०१९पर्यंतची ही आकडेवारी आहे. जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, दहशतवाद कदापिही खपवून घेतला जाणार नाही हे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यादृष्टीने दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा दलांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. सीमेपलीकडून भारतात विशेषत: जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न होत असतात.ते म्हणाले की, घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने बहुस्तरीय धोरणाची अंमलबजावणी केली आहे. आंतरराष्ट्रीय सीमा तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या प्रदेशांमध्ये विकासाची कामे हाती घेणे, कुंपण उभारणे, सुरक्षा जवानांना अत्याधुनिक शस्त्रे देणे, गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करणे असे अनेक उपाय योजण्यात आले असून त्याचे योग्य परिणामही दिसत आहेत.> ४०० दहशतवाद्यांची घुसखोरीगृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांत सुमारे ४०० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. त्यातील १२६ दहशतवादी सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत ठार झाले. या काळात २७ सुरक्षा जवान शहीद झाले तर चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले.काश्मीरमध्ये २०१८च्या तुलनेत यंदाच्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्के कमी करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. २०१८ साली दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या १४३ घटना घडल्या होत्या. २०१६ साली हेच प्रमाण ११९ व २०१७ साली १३६ इतके होते.

टॅग्स :terroristदहशतवादी