शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Karnataka Political Crisis: काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा, सरकार वाचवण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 13:14 IST

लवकरच मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे.

ठळक मुद्देकर्नाटकातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे.लवकरच मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे.बंडखोर आमदारांना संधी देण्याच्या दृष्टीने काँग्रेसने हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.

कर्नाटकमधील राजकीय नाट्य सातत्याने नवनवीन वळणं घेत असून कुमारस्वामी सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. काँग्रेस-जेडीएसच्या १३ आमदारांपाठोपाठ आता काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. बंडखोर आमदारांना संधी देण्याच्या दृष्टीने काँग्रेसने हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे. परंतु, तेवढ्याने हे संकट टळेल का, की नव्या संकटाला आमंत्रण देईल, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.   

आधीपासूनच डामाडौल अवस्थेत असलेलं एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळण्याची शक्यता शनिवारपासून निर्माण झाली आहे. कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील १३ आमदारांनी राजीनामा दिल्याने कर्नाटकचे राजकारण हातघाईवर आलं आहे. सरकार वाचविण्यासाठी आघाडीचे नेते निकराचे प्रयत्न करत आहेत, तर संधी मिळताच सत्तेची खुर्ची बळकाविण्यासाठी भाजपचे नेते सज्ज आहेत. कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी ११३ आमदारांची आवश्यकता आहे. परंतु, १३ आमदारांच्या राजीनाम्यामुळे कुमारस्वामींच्या पाठीशी १०५ आमदारांचंच बळ आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी भाजपानं केली आहे. हे निमित्त साधून, काँग्रेसच्या काही नेत्यांनाही मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य भाजपा नेत्यांनीच कुमारस्वामी सरकार पाडण्याची खेळी रचल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. त्यावरून एकीकडे भाजपा-काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकी झडत आहेत. 

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून नेत्यांचे प्रयत्न सुरू असतानाच, कर्नाटक सरकारमधील अपक्ष आमदार नागेश यांनीही आज सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तेही भाजपाच्या जवळ जात असल्याचं समजतं. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या अडचणीत वाढच झालीय. 

या पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या सर्व २१ मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यानं कर्नाटकातील राजकीय नाटकाला कशी कलाटणी मिळते, याकडे लक्ष लागलंय. आज संध्याकाळपर्यंत किमान सहा ते सात आमदार घरवापसी करतील, असा दावा कर्नाटकातील मंत्री जमीर अहमद खान यांनी केला आहे. 

 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीsiddaramaiahसिद्धरामय्याYeddyurappaयेडियुरप्पा