शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सरकार पडणे होते अपरिहार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 04:22 IST

लोकसभेतील पराभवानंतर समीकरणे बदलली; येडियुरप्पांनी केला सर्व मार्गांचा अवलंब

बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसच्या पाठिंब्याने गेल्या वर्षी २३ मे रोजी कुमारस्वामी सरकार स्थापन झाले, तेव्हा भाजपविरोधातील सर्व पक्षांचे नेते बंगळुरूला आले होते आणि त्यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे भाजपविरोधात सारे विरोधक एकत्र येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते; पण लोकसभा निवडणुकांत ते एकत्र आले नाहीत आणि प्रत्यक्ष निवडणुकांत त्यांचा दणकून पराभवही झाला. त्यामुळेच भाजपने कुमारस्वामी सरकार पाडण्याची जोरदार तयारी सुरू केली आणि त्यात यशही मिळवले.

खरे तर कुमारस्वामी सरकार स्थापन झाल्यापासून ते पाडण्याचे प्रयत्न भाजप आणि विशेषत: येडियुरप्पा सतत प्रयत्न करीत होते. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री होण्याची झालेली घाई लपून राहिली नव्हती. पण लोकसभा निवडणुकांच्या काळात भाजप श्रेष्ठींनी त्यांना शांत राहायला सांगितले होते. निवडणुकांचे निकाल लागल्यावर मात्र भाजपने दक्षिणेकडील राज्य हाती मिळवण्यासाठी सारी ताकद लावली.अर्थात सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांमध्ये काँग्रेस व जनता दलाचे काही आमदारांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली होती. काही मंत्रिपद न मिळाल्याने, काही जण आपली कामे होत नसल्याने तर काही आमदार भाजपच्या येणाऱ्या आॅफर्समुळे बंडखोरीच्या तयारीत होते. लोकसभा निवडणुकांत कर्नाटकात पराभव झाल्यानंतर या आमदारांनी नेतृत्वालाच आव्हान द्यायला सुरुवात केली. कुमारस्वामी, त्यांचे वडील व माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या घराणेशाहीमुळेही अनेक जण चिडले होते. सत्ताधारी आमदारांना ५ कोटी ते १५ कोटी रुपयांपर्यंतची आॅफर्स देण्यात आल्याची ध्वनिफितही काँग्रेस नेत्यांनी उघड केली होती. मंत्रिपद हवे असल्यास ५ कोटी आणि त्यात रस नसल्यास १५ कोटी असा दर भाजपने नक्की केल्याचा आरोप काँग्रेस नेते करीत होते. विधानसभा पोटनिवडणुकांत उमेदवारी आणि निवडून आणण्याचा खर्च अशीही आॅफर भाजपने दिल्याचा काँग्रेसचा आरोप होता. 

येडियुरप्पा यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहता, त्यात तथ्य असू शकते, असे अनेकांना वाटते. आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यांनी बेल्लारीतील रेड्डी बंधूंना अवैध खाणकामात दिलेल्या साथीमुळे त्यांच्यावर भाजपचे नेतेही तेव्हा नाराज होते.

अर्थात येडियुरप्पा यांच्यासारखा साम-दाम-दंड-भेद यात निष्णात असा एकही नेता कर्नाटक भाजपकडे नसल्याने भाजपने त्यांना दूर केले नाही. किंबहुना त्यांनी तेव्हा भाजप सोडून नव्या पक्षाची स्थापना केली. तरीही बंडखोरी करणाºया या नेत्याला नंतर भाजपनेच सन्मानाने पक्षात आणले होते.