शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

कर्नाटक सरकार पडणे होते अपरिहार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 04:22 IST

लोकसभेतील पराभवानंतर समीकरणे बदलली; येडियुरप्पांनी केला सर्व मार्गांचा अवलंब

बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसच्या पाठिंब्याने गेल्या वर्षी २३ मे रोजी कुमारस्वामी सरकार स्थापन झाले, तेव्हा भाजपविरोधातील सर्व पक्षांचे नेते बंगळुरूला आले होते आणि त्यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे भाजपविरोधात सारे विरोधक एकत्र येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते; पण लोकसभा निवडणुकांत ते एकत्र आले नाहीत आणि प्रत्यक्ष निवडणुकांत त्यांचा दणकून पराभवही झाला. त्यामुळेच भाजपने कुमारस्वामी सरकार पाडण्याची जोरदार तयारी सुरू केली आणि त्यात यशही मिळवले.

खरे तर कुमारस्वामी सरकार स्थापन झाल्यापासून ते पाडण्याचे प्रयत्न भाजप आणि विशेषत: येडियुरप्पा सतत प्रयत्न करीत होते. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री होण्याची झालेली घाई लपून राहिली नव्हती. पण लोकसभा निवडणुकांच्या काळात भाजप श्रेष्ठींनी त्यांना शांत राहायला सांगितले होते. निवडणुकांचे निकाल लागल्यावर मात्र भाजपने दक्षिणेकडील राज्य हाती मिळवण्यासाठी सारी ताकद लावली.अर्थात सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांमध्ये काँग्रेस व जनता दलाचे काही आमदारांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली होती. काही मंत्रिपद न मिळाल्याने, काही जण आपली कामे होत नसल्याने तर काही आमदार भाजपच्या येणाऱ्या आॅफर्समुळे बंडखोरीच्या तयारीत होते. लोकसभा निवडणुकांत कर्नाटकात पराभव झाल्यानंतर या आमदारांनी नेतृत्वालाच आव्हान द्यायला सुरुवात केली. कुमारस्वामी, त्यांचे वडील व माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या घराणेशाहीमुळेही अनेक जण चिडले होते. सत्ताधारी आमदारांना ५ कोटी ते १५ कोटी रुपयांपर्यंतची आॅफर्स देण्यात आल्याची ध्वनिफितही काँग्रेस नेत्यांनी उघड केली होती. मंत्रिपद हवे असल्यास ५ कोटी आणि त्यात रस नसल्यास १५ कोटी असा दर भाजपने नक्की केल्याचा आरोप काँग्रेस नेते करीत होते. विधानसभा पोटनिवडणुकांत उमेदवारी आणि निवडून आणण्याचा खर्च अशीही आॅफर भाजपने दिल्याचा काँग्रेसचा आरोप होता. 

येडियुरप्पा यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहता, त्यात तथ्य असू शकते, असे अनेकांना वाटते. आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यांनी बेल्लारीतील रेड्डी बंधूंना अवैध खाणकामात दिलेल्या साथीमुळे त्यांच्यावर भाजपचे नेतेही तेव्हा नाराज होते.

अर्थात येडियुरप्पा यांच्यासारखा साम-दाम-दंड-भेद यात निष्णात असा एकही नेता कर्नाटक भाजपकडे नसल्याने भाजपने त्यांना दूर केले नाही. किंबहुना त्यांनी तेव्हा भाजप सोडून नव्या पक्षाची स्थापना केली. तरीही बंडखोरी करणाºया या नेत्याला नंतर भाजपनेच सन्मानाने पक्षात आणले होते.